(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)
CHATURTH STAMBH
Note on Social Behaviour
ad1
Thursday, 4 June 2026
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)
Tuesday, 26 May 2026
कर्तृत्त्ववान पूर्वजांची महती काही ओळीत सामावने कठीण जाते. दोन ओळीच्या मध्ये सुद्धा बरंच काही बोलण्यासारखं असतं. खूप खस्ता खालेल्या असतात त्यांनी. प्रसंगी अपमान सहन केलेला असतो. अशिक्षित वातावरणात 'शिक्षण' असा चाकोरी बाहेरचा विचार करणे तसं सोपं नव्हतं. एक प्रकारचा जोखीम पत्करल्यासारखा तो प्रकार होता. क्वचीत थोडे मागे ओढण्याचे प्रयत्न झालेले असतात. शोकांतिका अशी की हे सर्व जोपर्यंत आपल्यावर तशी वेळ येत नाही तो पर्यंत कळत नाही!
ह.मु. औरंगाबाद, मो. ९८२२१०८७७५
Saturday, 25 April 2026
गुजरा हुवा जमाना.....
Tuesday, 21 April 2026
कॉर्पोरेट हॉस्पिटलचा विळखा
या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघनं साहजिक होतं. सुपरसॉनिक गतीने ही बातमी जेंव्हा समाज माध्यमामधे व्हायरल झाली त्यामुळे आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांना चौकशीचे आदेश दयावे लागले. कैंसर, एखाद्या अपरीचित दुर्धर आजार, मल्टीपल सर्जरी किंवा दीर्घ काळासाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरी एकंदरित बिल एव्हड़ होवू शकत नाही, मग डेंग्यूसारख्या सामान्य आजाराच एव्हड़ अफाट बिल जनतेला खुप जास्त वाटनं साहजिक. आज गांव-तालुका पातळीवरील सामान्य दवाखान्यात शेकडो डेंग्यु रुग्ण उपचार घेताना आणि बरे होताना आपण पाहतो. क्वचितच, जेंव्हा पेशन्टला व्हेंटीलेटर गरज पड़ते तेंव्हा रुग्ण शहरातील मोठ्या किंवा शासकीय हॉस्पिटलमधे जातात किंवा त्याला 'रेफर' केल्या जातं. पण तेथील खर्च एव्हड़ झालेलं ऐकिवात नाही. विशेष म्हणजे फोर्टिसच्या बिलामधे वापरल्या गेलेल्या कन्झुमेबल्स आणि त्याचे भाव बघून कोणाचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. चौकशी अंती असं आढळलं कि या बिलामधील सर्वात मोठा हिस्सा हा 'सर्जीकल मटेरियल' चा होता. ज्यामधे एकूण ६६० डिस्पोजेबल इंजेक्शन, २७७६ हैण्डग्लोवचा खर्ज जोडण्यात आला होता. एका ₹१३/-च्या ग्लुकोस्ट्रीपसाठी त्या पालकाकडून ₹२००/- चार्ज घेण्यात आले होते.
यमो हरति प्रणान्, वैद्य प्राणन्धनानिच । सुभाषितावरून वैद्यकीय व्यवसायावरील टीका नवीन नाही. परंतु मागील काही दिवसात डॉक्टरावर होणाऱ्या टिका वाढत्या असून जीव घेण्या हल्ल्यानी डॉक्टर मंडली त्रस्त झाली आहेत. समाजात डॉक्टरप्रमाणे इतरही व्यवसायिक,उद्योजक किंवा राजकारणी आपन बघतो. फक्त दोन निवडणुकी दरम्यान त्यांची इनोव्हा, बंगलो, आणि इतर कमाई कितीतरी पटीने वाढलेली आपण वाचतो. पण त्यांच्यावर लोकांनी हल्ले केले किंवा जाहीर वाच्यता केलेली कुठेच ऐकीवात नाही. किंवा त्यांना कुणी देशलुटारू, भ्रष्ट म्हणण्या इतपत कुणाची हिंमत होत नाही. किंबहुना अशी हिंमत होत नाही. कारण त्यांची प्रतिक्रिया परवडणारी नसते. पण डॉक्टर म्हंटले कि 'एक सॉफ्ट टारगेट'! रोज एक तरी बातमी वर्तमानपत्रात वाचावयास मिळते. आधीच अशा घटनेमुळे त्रस्त, अडचणीत आणि धाकधुकीत असलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाचे हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरांसाठी वरील बातमी ऐकून 'भित्यापाठी वाघोबा' अशी स्थिति झाली.
आज मुम्बई दिल्लीसारख्या मेट्रो शहरामधे नोकरीस असलेल्या, आयटी क्षेत्रात काम करणारी सॉफ्टवेअर मण्डळी भरपूर मोठ्या पैकेजवर काम करत असते. प्रत्येक वस्तु ब्रैंडेड घेणारा पैकेजवाला हा नोकरवर्ग किरकोळ आजरासाठीसुद्धा कोर्पोरेट हॉस्पिटलमधे भरती होतात. आपल्या परिसरातील छोट्या हॉस्पिटल नर्सिंग होममधे इलाज होत असतानाही हा वर्ग एक ब्रेंड म्हणून कॉर्पोरेट हॉस्पिटलकड़ेच आकर्षित होतो. एकच छताखाली सर्व सुविधा, 'कैशलेस हॉस्पिटलायझेशन', राजीव गांधी योजना, महात्मा फुले योजनेमूळे पैशे भरायची गरज पडत नाही. पण अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमधे त्यांच्या आजारावर इलाज करणारे डॉक्टर निष्णात आहेत कि नाही याचीही त्यांना कल्पना नसते.
एक नफाखोरीचा उद्योग म्हणून प्रत्येक शहरात कितीतरी कॉर्पोरेट हाउस चैरिटी आणि समाजसेवेच्या नावाखाली हॉस्पिटल सुरु करत आहेत. ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचं कामकाज एखादया 'फाइव स्टार' व्यवसायिक हॉटेलसारखं असतं. ज्यामधे वेगवेगळे मैनेजमेंट डिपार्टमेंट आणि मोठा स्टाफ असतो ज्यांचा हॉस्पिटलला जास्तीत जास्त नफा कमवून देणे हाच मूळ हेतु असतो. कॉर्पोरेट म्हंटल तर तेथे खाजगी कंपनीचे सर्व नियम लागू पडतात. जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांच्या हाताखाली वेगवेगळे जनरल मैनेजर, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेप्यूटी मेनेजर आणि स्टाफ असा अफाट पसारा असतो. मग त्यांचा पगार, भत्ते, कमिशन आणि इतर खर्च एव्हड़ा असतो कि हॉस्पिटलची गाड़ी सुरळीत चालून भरपूर नफा व्हावा म्हणून एकीकडे जास्तीत जास्त 'कॉस्ट कटिंग' आणि दुसरीकडे पेशंटचे 'अफाट बिल' अशी 'नफेखोरीची योजना' असते. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी दिलेलं टारगेट पूर्ण करणारे गल्लेलठ पगार असणारे 'एमबीए स्मार्ट मेनेजर' ची गरज असते. कदाचित याच कारणाने बऱ्याच नॉन-मेडिको स्टाफचा पगार अशा हॉस्पिटलमधे डॉक्टरापेक्षा जास्त असतो. अशा हॉस्पिटलचा प्रभावी 'मार्केटिंग व पब्लिसिटी' डिपार्टमेंट असतो ज्याना मंथली ठराविक पेशंट आणन्याचं टारगेट, कमीशन दिल्या जात. जवळ जवळ सर्वच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही धनाड्य आणि कोणत्यानं कोणत्या राजकिय पक्षाशी जवळीक असलेल्या उद्योजकाची आहेत. 'सेवा पेक्षा मेवा प्रिय' असलेल्या या उद्योजकात रुग्णसेवा ही फक्त तोंडाला लावण्यापूरती किंवा कागदावर दाखविण्यापुरती असते.
प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल हे एक चैरिटेबल ट्रस्ट आणि 'रिसर्च सेंटर'ही असतात. गरीब रुग्णासाठी काही बेड येथे राखीव असावित, त्यांना कमी दरात सुविधा मिळावी तसेच मेडिकल क्षेत्रात या रिसर्च सेंटरनी नवनवीन संशोधन करावित अशी सरकारची अपेक्षा असते. पण तसे काही संशोधन किंवा प्रयोग होताना दिसत नाहीत कदाचित या उदासीनतेमुळे वैद्यकिय संशोधनात आपण इतर पाश्चात्य देशाच्या तुलनेत बरेच मागे आहोत. तसेच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही एक चैरिटेबल ट्रस्ट असते आणि नियमाप्रमाने कॉरपोरेट होस्पिटलची काही बेड गरीब पेशंटसाठी राखीव ठेवावे लागते, पण प्रत्यक्षात हे सर्व कागदावर दाखवले जाते. आज किती कॉर्पोरेट हॉस्पिटल हा नियम पाळतात? दूसरा मुद्दा असा की हॉस्पिटल जरी चैरिटेबल असेल तरी तेथील मेडिकल आणि सर्जीकल स्टोरला हे चैरिटीचे नियम लागू होत नाहीत. आणि हॉस्पिटलच्या एकन्दरीत बिलात मेडिकल, डिस्पोसजेबल, सर्जिकल आणि शेवटी टैक्सचा खुप मोठा वाटा असतो. मग १५ दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन मधे २७७६ हैण्डग्लोज, ६६० सिरिंज वापरले जाते. हे किंवा अशी ओषध आणि सर्जीकल अतिशय घासाघिस करून कमीत कमी दरात मोठ्या फार्मासूटिकल किंवा सर्जीकल कम्पन्याकडून खरेदी केली जातात. त्या मोठ्या खरेदीवर मिळनारी इतर 'स्किम'चा हिशोब लावला तर ज्या ग्लुकोस्ट्रिप साठी ₹200/- हॉस्पिटल चार्ज करतात ती त्यांना फक्त ₹ 13/-ला पड़ते! अशा प्रकारे रुग्णाला चार्ज करताना त्याची किंमत अवाच्या सव्वा लावली जाते. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पेशंटशी व्यक्तिगत सम्बन्ध नसते किंवा सम्बन्ध ठेवायची गरज नसते. त्यामुळे तो पेशंट गरीब आहे का आमिर याच्याशी त्यांचं काही देणेघेणे नसते. त्यामुळे बऱ्याचदा एकाच पेशन्टला किती तरी वेगवेगळे डॉक्टर बघून बिल वाढवत जातात, नको त्या टेस्ट, इन्वेस्टिगेशन सांगितले जाते आणि कन्झुमेबलच बिल चेपल्या जाते. उदा. एखाद्या पेशंटचा पाय दुखत असेल तर त्यास फिजिशियन,न्यूरो फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन विजिट देत बसतात. मग प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन, इन्वेस्टिगेशन आणि औषधि, कन्झुमेबल यामुळे बिल वाढत जातं. त्यातच पेशंट मेडिक्लेम पॉलिसीधारक असेल तर मग बघायची सोय नाही!
आता मुळ मुद्दा. 18 लाखाच्या या कॉर्पोरेट बिलामधे सर्व खर्च वजा जाता प्रत्येक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टराना फिस म्हणून किती रूपये मिळाले असतील? अर्थात इतर खर्चाच्या तुलनेत ही रक्कम खुपचं कमी असते. मग असे असताना प्रत्यक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राची का बदनामी व्हावी? ही फाइव स्टार हॉस्पिटल्स पेशन्टला पद्धतशिर लूटतात आणि बदनामी मात्र डॉक्टर आणि सम्पूर्ण वैद्यकिय क्षेत्राची होते. मग सर्वच डॉक्टरावर टिकेची झोड़ उड़ते. डॉक्टरविरुद्ध विचाराना हवा मिळते. खालच्या पातळीची विशेषणं लावली जातात. डॉक्टरकडून थोड़ी जरी चुक झाली तरी त्याचा 'पराचा कावळा' करण्यात जनता कसर सोडत नाही. मग अशात राजकारणीही मागे कसे राहणार, तेही आपली पोळी भाजुन घेतात. काही दिवसा अगोदर राजकारणी नेत्यांनी मुम्बई-पुण्याच्या डॉक्टरांना अशीच एक 'खळ..खटयानळ' धमकी दिली. 'डॉक्टरांनी पेशंटला वेठीस् धरु नये, गाठ आमच्याशी आहे'. त्यांचा रोख लहान हॉस्पिटल किंवा नर्सिंगहोमवर होता. कदाचित कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा तेथील 'चमत्कारिक बिल' आणि पद्दतशिर लूटीची त्याना कल्पना नसावी.
आजही 70% गांव आणि तालुका जिल्ह्याचे पेशंटचा भार छोट्या शहरातील नॉन-कॉर्पोरेट आणि छोट्या-मोठ्या सरकारी हॉस्पिटलवर आहे. वैद्यकिय स्टाफ, उपकरणाची कमी आणि इतर मुलभुत सुविधा नसतानाही ते त्यांचे काम ईमानएतबारे करत आहेत. इतर लहान हॉस्पिटलमधे डॉक्टर स्वतः पेशन्टला वैयक्तिक जाणत असल्यामुळे कुठे तरी डॉक्टर-रुग्ण हे नातं टिकून आहे. भविष्यात महाराष्ट्र शासन बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार आहे त्याचा निश्चितच जनतेला होईल.
वाईट प्रवृती इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्य क्षेत्रात असतीलही पण त्यामुळे सरसगट सर्वांनाच दोषी समजणे चुक. थोडक्यात अशी लूट थांबावी म्हणून गरज आहे की अशा मोठ्या हॉस्पिटलसाठी शासनाने एक कठोर नियमावली आखुन द्यावी जेणेकरून रुग्णावर होणारा खर्च कमी होवून जनता बिलामुळे होरपळुन जाणार नाही किंवा कर्जबाजारी होणार नाही, त्यावर एक अंकुश राहील. तसेच शासनाच्या आरोग्य विभाग, मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडिया यानि वेळीच अशा प्रकाराची दखल घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून वैद्यकिय क्षेत्राबद्दल वाढती संभृमता, दुष्प्रचार कमी होईल, पेशंटचा डॉक्टर आणि हॉस्पिटलप्रती विश्वास वाढेल.
Monday, 6 April 2026
'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'
Monday, 30 March 2026
कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा वाली कोण ?
'सक्सेस हॅज मेनी फादर, फेल्युर इज अल्व्वेज ओर्फन'
भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी नाही. पूर्वी परीक्षा म्हंटल तर दहावी किंवा बारावी बोर्डाची, आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षेला अनन्यसाधारण महत्व होत आणि एक वलय होता. जसजसे शिक्षण क्षेत्रात बदल होत गेले आणि स्पर्धा वाढली तसे नवनव्या परीक्षेचा जन्म झाला. हल्ली दहावी, बारावी बोर्डाव्यतिरिक्त दहावी शिष्यवृत्ती, एनटीएसई, केव्हीपीआय, आरएमओ तसेच बारावीत एमएच-सीईटी, जेईई-मेन, जेईई-ऍडव्हान्स, बिटसॅट, नीट, जीपमार नाटासारख्या अनेक देशपातळीवरील स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता काही वर्षा आधीपासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात. काही अपवाद सोडले, तर या परीक्षेचा अभ्यास स्वतः हुन करणे विध्यार्थ्यांना जमत नाही म्हणून विध्यार्थी या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतात.
पूर्वी शाळेत शिक्षकांना एखादा विध्यार्थी एखाद्या विषयात कमजोर वाटला तर त्याकाळचे 'गुरुजी' त्याकडे खास लक्ष देऊन शाळेतच वेगळा वेळ देऊन शिकवायचे. ह्या मागील शिक्षकाचा हेतू खूप प्रामाणिक होता. काही शिक्षक शाळेतच 'एक्स्ट्रा क्लास' घेऊन काही कमजोर विध्यार्थ्याचा विषय पक्का करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे. कालांतराने शाळेच्या वेळापत्रकात हे बसत नसल्यामुले शिक्षकांनी घरी क्लास घ्यायला सुरुवात केली. यातच अर्थकारण येऊन त्याचे रूपांतर पुढे 'ट्युशन क्लास' आणि नंतर भरमसाठ फी घेणाऱ्या 'कोचिंग क्लास' मध्ये झाले. सुरुवातीच्या काळात ट्युशनच्या 'कुबड्या' घेऊन चालणारा विध्यार्थी म्हणजे 'ढ' समजल्या जायचा. पण कालांतराने कमी मार्क मिळण्याची भिती तसेच शालेय शिक्षकाच्या हातातील 'हातचे मार्क' या भितीने सर्वच विध्यार्थ्याने कोचिंग लावायला सुरुवात केली आणि हे क्षेत्र भरभराटीस आलं.
आज मूलं जन्मल्यापासून दहावी, बारावी, सर्व पदव्यासहीत सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोचिंग क्लास आपल्या जवळपास उपलब्ध आहेत. आपण रोज हया फोटो-जाहिराती वृत्तपत्रात बघतच असतो. जाहिरातीचा भरणा असलेल्या वर्तमानपत्रात अर्ध्याहुन जास्त जाहिराती ह्या कोचिंग क्लासेसच्या असतात. कधी कधी वाटते कि यास वृत्तमानपत्र म्हणावं कि जाहिरातपत्र! इतर संस्थेप्रमाणे वर्तमानपत्रालाही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पीटीआय ने आखून दिलेली एक नियमावली आहे पण पैशाच्या बाजारात पीटीआयच्या नियमाला बगल देऊन सरळसरळ मोठमोठ्या जाहिराती पुढच्या पानावर छापल्या जातात. वेळप्रसंगी मुख्य बातमीला बाजूला किंवा छोटी बनवून, जॅकेट चढवून जाहीराती छापल्या जातात. संपूर्ण जगाला अक्कलेच डोज पाजणारा वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला स्वतःची नियमावली पाळणे मात्र जमत नाही, असो.
मूळ मुद्दा असा की आज कोणत्याही क्लासेसच्या जाहिरातीकडे जर आपण पाहिल तर लक्षात येईल कि त्यात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच छायाचित्र छापलेले आपल्याला दिसतील, का ? जर जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचेच फोटो आणि सत्कार होत असतील तर कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ते आपल्या जीवनात काहीच चांगलं करणार नाहीत का ? त्यांचा वाली कोण ? का एखादे कोचिंगक्लासवाले हे सांगत नाही की आमच्या कडे हे अमुक अमुक विध्यार्थी होते पण त्यांना हि परीक्षा काही जमली नाही पण ते इतर क्षेत्रात खूपकाही चांगले काम करू शकतात. काही वर्षापूर्वी आपल्याकडील वृत्तपत्रात फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच फोटो छापले जायचे. त्यांची मुलाखत घेतली जायची. त्यामुळे इतर विध्यार्थ्याचे खच्चीकरणं व्हायचे. विध्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन नैराश्य, आत्महत्यासारखे प्रकार घडत असत. असे होऊ नये म्हणून शासनाने मेरिटलिस्ट छापण्यावरच बंदी आणली. आज कोणत्याही वृत्तपत्रात दहावी किंवा बारावीची मेरिटलीस्ट छापली जात नाही.
इतिहासातील धडे शिकूनच आपण वर्तमानातील वाटचाल करत असतो. मायक्रोसॉफ्टचे बिलगेटस् हे इतर विध्यार्थ्याप्रमाणे हुशार नव्हते पण आज जगातील सर्वोच्च विध्यापीठातील गुणवंत त्यांच्यासोबत काम करत आहेत. क्रिकेटचा सम्राट भारतरत्न सचिन तेंडुलकर इयत्ता आठवीत नापास झाला होता. सैराट सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे नागराज मंजुळे विपरीत परिस्थितीत लहानाचे मोठे झाले, दहावीत नापास झाले. अर्थात त्या काळच्या शाळा किंवा कोचिंग क्लासने बिलगेटस, सचिन आणि नागराज मंजुळे सारख्यांचे फोटो छापले नसतील, हार-तुरे देऊन सत्कार केला नसेल पण आज ही लोक यशाच्या एव्हडया उच्च शिखरावर पोहचली आहे की त्यांचा साधा ऑटोग्राफ मिळणे कठीण आहे. कदाचित चांगले १०० पैकी १०० गुण मिळवनारे 'परीक्षार्थी' बनण्यात ते नापास झाले असतील पण आज आवडीच्या क्षेत्रातील चांगले विद्यार्थी होऊन त्यांनी यश गाठलं आहे.
मुळात शासनमान्य शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंगक्लास याच्या शिकवणीची पद्धत समजण्यात पालक गल्लत करतात. खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शाळा-महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांच्या वर्गातील तळागाळातील विध्यार्थ्याकडेसुद्धा तेव्हढेच लक्ष देतात जेव्हढे लक्ष ते हुशार विध्यार्थ्याकडे देत असतात. शिक्षकांची ही प्रामाणिक इच्छा आणि जिद्द असते की त्यांनी शिकवलेला विषय हा वर्गातील सर्व स्तरावरील विध्यार्थ्यांना समजावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे. कोणी एकच विध्यार्थी मेरिटमध्ये आणणे असा ' फोटो-जाहिरात आणि मार्केटिंग' वाला हेतू त्यांचा नसतो. थोडक्यात जो विध्यार्थी बसलेला आहे त्याने उठून चालण्यासाठी तयार करणे, जो चालत आहे त्याची गती वाढवणे आणि जो गतीने चालत आहे त्याची गती वाढवणे असा शुद्ध हेतू असतो. त्यामुळे शाळेत एकूण सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. आणि कदाचित अधोगती झाली तरी शालेय शिक्षक तो आमचाच विध्यार्थी आहे असं म्हणायला लाजत नाही.
या उलट कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाच सर्व लक्ष हे पुढील बाकावर बसलेल्या दोन-तीन रांगेपर्यंत मर्यादित असत. कारण या रांगेमधील विद्यार्थीच पुढे क्लासेसला 'रँक' देणारे असतात आणि त्यांचेच 'फोटो' क्लासेसच्या बिजनेसच्या जाहिरातीसाठी उपयुक्त असतात. कोचिंग शिक्षकाचा पगारही त्या रँकनुसार वाढत असतो. हया पुढील बाकावरील हुशार विध्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासच्या शिक्षकाच्या डोक्याला ताप नसतात, आणि त्यांना व्यवस्थित शिकवणे, शँका निरसरन करणे त्यांना भाग असते. या उलट मागील बाकावरील विध्यार्थी ज्यांचा विषय खूप कच्चा असतो असे विद्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासेस शिक्षकांसाठी ताप असतात. अशा विध्यर्थ्याच्या खालच्या पातळीवर येऊन शिकवण्याइतका संयम सर्व क्लासेस शिक्षकात नसतो. त्यामुळे ते वाऱ्यावर सोडले जातात. अशा पद्धतीत पुढचे विध्यार्थी खूप पुढे जातात आणि मागचे खूप मागे. थोडक्यात पुढील बाकावरील विध्यार्थी म्हणजे लग्नातील 'मानकरी' सारखे असतात त्यांना दुःखवून चालत नाही. काही पुढील बाकावरील विध्यार्थी वगळता मागच्या विद्यार्थ्यांच्या फोटोची क्लासेसला गरज नसते. मग एकूण जेईईसाठी कोचिंग घेणारे २५०० विध्यार्थी आणि पात्र मात्र १५ असे प्रकार घडतात, मग उरलेल्या २४८५ विद्यार्थ्यांनी काय करावं एव्हढ साधं मार्गदर्शनही कोचिंगवाले करत नाहीत.
मग आपल्या जाहिरातीत जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विध्यार्थ्याचे फोटो दिसावे म्हणून बरेच क्लासेसवाले वेगवेगळे उद्योग करत असतात. वेळप्रसंगी इतर क्लासेसच्या विध्यार्थ्यांना लाखो-करोडो रुपयाची ऑफर देऊन फोटो घेतले जातात. हा आमदार-खासदार फोडण्याचाच प्रकार असतो. किंवा बळेच मोठा धनादेश, हारतुरे आणि पेढे देऊन फोटो काढून घेतले जातात, असे अनेक प्रकार अलीकडे घडत आहेत. 'रँक विकण्याचा घोडेबाजार' कोटासारख्या कोचिंगक्लासच्या पंढरीस नवीन नाही. एकंदरीत पैशाच्या या खेळात सर्वांकडून पैसे उकळून फक्त काही विध्यार्थ्याच भलं होत असताना दिसत आहे. उदाहरण दयायच असल्यास, संपूर्ण भारतात जेईई परीक्षेमध्ये उत्तीर्ण विध्यार्त्याची एकूण संख्या ३९०० असेल तर या तुलनेत भारतातील सर्व कोचिंगच्या उत्तीर्ण विध्यार्थ्याच्या फोटो-संख्येची बेरीज हि ७००० पेक्षा जास्त असणार, कारण एकाच विद्यार्थ्यांचे फोटो आपल्याला विविध क्लासेसच्या जाहिरातीत तसेच होर्डिंगवर बघायला मिळतात. थोडक्यात म्हणायचे तर -
सक्सेस हॅज मेनी फादर
फेल्युर इज अल्वेज ओर्फन
एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवणे ही शासनाची जबाबदारी आहे. कालच वृत्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंत्र्यांनी ११वी, १२वी विज्ञानशाखेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती आवश्यक केली आहे. 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे उशिरा का होत नाही पण हा एक आशेचा किरण दिसत आहे. कारण त्यामुळे सर्वसाधारण तसेच तळागाळातील विद्यार्थ्याला फायदाच होईल. कारण कोचिंग क्लासेसची फी सर्वांना परवडणारी नसते. मुलांसाठी वाटेल ते करणारे पालक वेळप्रसंगी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून कर्ज काढतात आणि त्यांच्या हाती काही लागत नाही. महाविद्यालयातच दर्जेदार शिक्षण मिळाल्यास गरीब आणि सर्वांचा फायदाच होईल. 'गुरु' म्हणजे काय, त्यांची शिकवण्याची पद्धत माहित पडेल. महाविद्यालयातील फक्त शिक्षण नाही तर महाविध्यालयीन वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार होतील जे आज होताना दिसत नाहीत. वार्षिक स्नेहसम्मेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांचं व्यक्तिमत्वही उजळेल. थोडक्यात फक्त हुशार मुलांचा कोचिंग क्लासचा बाजार कमी होईल.
फक्त गरज आहे सरकारी आदेश तंतोतंत लागू होण्याची. कारण आपल्याकडे पळवाट शोधणाऱ्या हुशार 'बिरबल' ची कमी नाही. उद्या चक्क महाविद्यालयातील बायोमेट्रिकच रिमोटने कोचिंग क्लासेसला जोडलेली आढळल्यास आश्चर्य वाटू नये. दिवसातून तीन वेळेसची बायोमॅट्रिक आवश्यक केल्यास त्यास संस्थाचालकापासून सर्वच स्तरातुन विरोध होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांशी सोयरसुतक नसलेल्या शिक्षकाचे श्रम वाढतील. मागील कितीतरी वर्षांपासून एकाच रुळावर चालणारी गाडी जेंव्हा पटरी बदलेल तेंव्हा थोडा खडखडाट होणे साहजिक आहे. त्यातल्या त्यात श्रीमंत पालक जे आपले पाल्य कोटासारख्या इतर ठिकाणी कोचिंगसाठी ठेवतात त्यांचाही या बदलास विरोध होईल, क्लासेसवाल्यांचीही वेळेची थोडी सर्कस होईल. पण महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने इमानेइतबारे शिकवल्यास सर्वच विषयाची कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही आणि खरोखरच विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. पण हा बदल होणे आवश्यक आहे.
शिक्षणातील ह्या बाबीस फक्त शासनास जबाबदार धरणे चूक होईल, पालकही तेव्हढेच जबाबदार आहेत. त्यांनाही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी इतर मुलांचे अनुकरण न करता वेगळी शाखा, क्षेत्र निवडावे कारण प्रत्येकाचा पालकाचा पाल्यामध्ये एक वेगळा टेलेन्ट असतोच. जाहिरातीतील मेरिटचे फोटो आणि आमिषाचा गळाला लागून पालक आणि विद्यार्थी नको ते क्लास लावतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती न होता आर्थिक नुकसान होते. गरज आहे त्यांनी आपल्या मुलांचा वेळीच कल ओळखण्याची आणि मेरिटचा अट्टाहास न करता पाल्याची एकूण खरी प्रगती ज्या क्षेत्रात होऊ शकते तेच क्षेत्र निवडण्याची आणि त्याच क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यास त्यास मदत करण्याची.
एडिट
हिंदी-उर्दू: दो बहनोकी बात
अब तो यह रिवाज सा बन गया है के हिन्दुस्तान के पार्लमेन्ट में जब भी कोई मंत्री या एमपी, फिर वह किसी भी पार्टी के क्यों न हो अपनी बात रखते है तो बात बात में एक शेर जरूर सुनाते है। असल बात यह कि किसी भी बात या मुददो का वजन बढाने के लिए शेर की सहायता जरुरी ली जाती है l इतना ही नही श्रोताओ का दिल जीतने के कई सभा-सम्मेलन में अपने भाषण में नेता या वक्ता एक शेर जरूर सुनाते है और लोगों का दिल जीत लेते है। और ये दिल जितने वाले शेर अक्सर उर्दू भाषा में हि लिखे होते है। एक सर्वे के मुताबिक हिन्दुस्तान के पार्लमेंट में आज तक जितने भी शेर सुनाए गये वो तकरीबन ९०% उर्दू में थे।
जी हां, हम बात हिंदी-उर्दू भाषा की कर रहे है। जो दो सग्गी बहने है। हम सब एक बडी गलत फ़हमी है के उर्दू हमारी नहीं बल्की पडोसी मुल्क की भाषा है। हालांकि यह सरासर गलत है, झूठ है। इस में लोंगों की कोई गलती नही क्यों कि हिन्दू लोग उर्दू को मुश्किल और मुस्लिम की भाषा समझकर बोलने से परहेज रखते आये है । 'रिलिजियस पॉलिटिक्स' ने इस भाषाका बटवारा कर दिया हैं । हालांकी हिंदी में उर्दू इस तरह घुली है जैसे दूध में शक्कर जिन्हे एक दुसरे से १००% अलग करना मुश्किल है l शब्दो का परहेज कर के आप ना तो 'शुद्ध हिंदी' बात कर सकते ना 'शुद्ध उर्दू!' और हिंदी में सिर्फ उर्दू नहीं बल्की पारसी, अफगाणि, गुजराती, कनडा, पोर्तुगीज और अंग्रेजी शब्द भी घुलमील गये है l
हालांकि कोई भी भाषा 'रिजनल' होती है 'रिलिजनल' नही । जैसे पंजाब की पंजाबी, तमिलनाडु की तमिल, गुजरातकी गुजराथी, कर्नाटक की कन्नडी। कहने का मतलब जो मुस्लिम पंजाब में रहते है वो पंजाबी बोलते है। जो गुजरात में रहते है वो गुजराती बोलते है। जो तमिलनाडु में रहते है वो तमिल बोलते है। इस हिसाब से उर्दू को मुस्लिम समाज की भाषा कहना बहोत गलत होगा। वैसे शुरु से उर्दू नॉन-रिलीजस भाषा रही है।
आज लोग भले ही उर्दू भाषा बोलने मे परहेज करते होंगे लेकिन यही उर्दू के शेर, नज्म या शायरी आप जब गुलजार(संपूर्ण सिंग कालरा) के गीतों में, अमिताभ बच्चन (असली नाम इन्कलाब श्रीवास्तव) के डायलोग मे या फिर लता मंगेशकर के गीतों में सुनते तो बड़ा मजा आता है। आप यह समझ ले कि हिंदी-उर्दू सग्गी बहने-बहने है। हिंदी मां है तो उर्दू मौसी। हिंदी नग्मे तभी अच्छे लगते है जब उन्हें उर्दू की झालर लगाई जाती है। जो भी बॉलीवुड की फिल्में हिट हुयी उसका बड़ा श्रेय उर्दू को जाता है। हिंदी फिल्में नयी हो या पुरानी उसके संवाद और गीत उर्दू शब्द के बगैर आप सोच भी नही सकते। इश्क, मोहब्बत, सनम,मेहबूब, जुल्फे, गेसू, दास्ताँ, जमीन, हुजूर,झील,कयामत,मजबूर,सर्द
वैसे उर्दू की पैदास हिन्दुस्तान मे ही हुयी है। कहा जाता है के जब मुगलो का आक्रमण हुवा उस वक्त फ़ारसी का ज्यादा चलन था। जब मुगल शासक आये तब उनके साथ साथ फ़ारसी, अरेबिक और तुर्की यह सब भाषा भारत मे आयी। इन भाषाओं का जब दिल्ली के ब्रज या खड़ी बोली के साथ मिश्रण हुवा तो नयी भाषा का जन्म हुवा। दिल्ली मे जब फारशी शासक के सेनाने शेकडो वर्ष तक डेरा लगाया था तब कुछ सैनिको की भाषा पारसी,कुछ अरेबिक और कुछ तुर्की थी। फिर उनकी भाषा को संबंध दिल्ली के खड़ी बोलि बोलने वाले लोगों से हुवा। आपस के इस बोलि भाषा को 'ओरडु'(सैनिक की भाषा) ऎसा नाम दिया गया l १७८० से पहले उर्दू को रेक्ता, रेक्ती, हिंदवी कहा जाता था और बाद में 'उर्दू' ऐसा नामकरण हुवा। १८ वे सदी तक उर्दू और हिंदीमे बिल्कुल भी फर्क नही था। हालाँकि उर्दू यह शब्द तुर्की से लिया गया। कई किताबें पारसी,तुर्की और अरेबिक मे लिखी गयी। चूँकि उर्दू बादमें बोलि भाषा बन गयी वह तेजी से आगे बढि, बहते गयी और आगे बढी और बाकी भाषाएँ पीछे रह गयी। जब आप कोई भाषामें सिर्फ लिखते हो तो वह 'स्टैटिक' बनती है या थमसी जाती है। लेकिन वही भाषा जब बोली भाषा बनती है तो वह बहाव के साथ 'डायनामिक' बन जाती है। उर्दू के साथ यही हुवा, वह जोरसे बहती चली गयी। बाद में महान कवि आमिर खुसरों ने उसे नये मुकामपर पहुंचाया। उर्दू मे कई शब्द दिल्ली के हिंदी खड़ी बोलीसे लिए गये। दोनों भाषा का व्याकरन एक जैसा है। हिंदी और उर्दू एक दुसरे के इतने करीब है के जब आप हिंदी बोलते हो हो उसमें कई शब्द उर्दू के होते है और आप जब उर्दू बात करते हो तो पच्चास प्रतिशत सेभी ज्यादा शब्द हिंदी होते है। जब हिंदी के शब्द पढने में दिक्कत होती है तो हम सोचते है 'कहीं ये उर्दू शब्द तो नहीं?' इसलिये हिंदी फिल्में नयी हो या पुराणी उसके संवाद और गीत उर्दूके बगैर अधूरे है। आज भारत के ५ स्टेट में उर्दू को राजभाषा का दर्जा है जैसे हैदराबाद, यूपी, बिहार, झारखंड और जम्मू-कश्मीर। आज भारतके कुछ दक्षिण इलाखों में बहोत ही शुद्ध उर्दू बोली जाती है। चूँकि दक्षिणमे तेलगु, कनडा, मलयालम और तमिल जैसे भाषा का ज्यादा प्रभाव है, उर्दू मे कई लोकल शब्द शामिल हुए है।
यह कहना भी सरासर गलत होगा के उर्दू पाकिस्तानी भाषा है। क्योंकि वहाँ उर्दू कम और बाकि भाषाऐ जैसे के बलूची, कश्मीरी, पाशतु, अरबी इ ज्यादा बोली जाती है।उर्दू जबान को १० करोड़ पूर्व पाकिस्तानी मुस्लिम याने आज के 'बांग्लादेश' ने भी कभी नही अपनाया फिर वो पाकिस्तानी भाषा कैसे हो सकती है? पुरब पाकिस्तान याने आज के बांगलादेश की भाषा बांगला है, उर्दू नहीं l पाकिस्तान से जादा हिन्दुस्तान मे उर्दू बोली जाती है। हिन्दुस्तानमे ५ करोड़ तो पाकिस्तान में सिर्फ 1.25 करोड़ जनता उर्दू बोलती है। 'मोहाजिर' याने बटवारे के वक्त जीन मुस्लिमों को यूपी, पंजाब,हरियाणा, कश्मीर और दिल्ली जैसे ईलाखो से पाकिस्तान जाना पड़ा सिर्फ वही मुस्लिम उर्दू भाषा का इस्तेमाल करते है।। 'हम अलग तो हमारी भाषा भी कुछ अलग होना चाहिये' इसलिये पाकिस्तान ने भले ही उर्दू को राष्ट्रीय भाषा का दर्जा दिया हो लेकिन वो सरासर गलत है क्योंकि वहाँ बोलि भाषा मे उर्दू 'दूसरे स्थान' पर है।
दिलचस्व बात यह है कि १८वे सदि तक सिर्फ और सिर्फ अच्छे जानकार हि इन भाषाको पढ़ और समझ सकते थे। १९वे सदि मे ये दोनों भाषाएँ बहोत विकसित हुई। हिंदी को आगे बढाने मे मुंशी प्रेमचंद, संत कालिदास्, संत तुलसीदास, संत सूरदास और सन्त कबीर जैसे महान संत और साहित्य लेखक का बहोत बड़ा योगदान रहा। आज संपूर्णसिंग कालरा (गुलजार), रघुपति सहाय (फ़िराक़ गोरखबादी), रामप्रसाद बिस्मिल और महाराजा चंदूलाल जैसे गैर-मुस्लीम लेखक या कवि भी है जिन का उर्दूको आगे बढानेमे बढ़ा सहयोग रहा है।
भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग का जन्म अब के पाकिस्तान में हुवा था। बहोत कम लोग यह जानते है के उनकी शिक्षा उर्दू में हुई। जब वो प्रधान मंत्री बने तब ६० बरस के रिवाज के मुताबिक उन्हें हिंदी मे भाषण देना जरूरी था। उन्होंने कुल ४८ मिनट भाषण दिया लेकिन बहोत कम लोग यह जानते है के उस भाषण की स्क्रिप्ट उर्दू भाषा में लिखी गयी थी ! क्योंकि डॉ. मनमोहन सिंग को उर्दू पढ़ना ज्यादा आसान लगता है।उर्दू का बहोत सा साहित्य पंजाब से आया है। विशेष बात यह कि उर्दू के कई शायर-लेखक पंजाब से आये है।
सिर्फ सियासत के लिए भाषा को बाटा जाता है l इसलिये जब कोई अगली बार आप से उर्दू में कुछ कहे या कुछ लिखे तो गलतफहमी में ना रहे, क्यों कि वह भी हमारी याने हिन्दुस्तान में पैदा हुई भाषा हैं l सिर्फ मुस्लिम समाज या किसी और देश की तो कतई नही।
तभी तो उर्दू के मशहूर शायर मुनावर राणा ने एक शेर में सही कहा,
'लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है,
मैं उर्दूमें गझल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है।'
© प्रेमकुमार जैस्वाल
Thursday, 25 December 2025
सायकल पंप
सायकल पंप
१९९६ ची घटना. नुकताच चार दिवसांचा बिजनेस टुर करून मी ऑफिसला पोहचलो होतो. रिपोर्टींग करून आता टूर वर नं जाता काही दिवस लोकल(मुंबई) मध्येच काम करायचं असं ठरवलं होतं. थकलेलो असलो तरी ऑफिस स्टाफ सोबत टुरबद्दल गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात आमच्या मार्केटिंग मॅनेजरनी मला कॅबिनमध्ये बोलावलं. आत जाताच -
"तुला आताच्या आता टुरवर जावं लागेल", एखादा मोठा बॉम्ब पडावा तसे त्यांचे शब्द माझा कानावर पडले!
"पण... सर मी आताच टुरवरनं आलोय... थकलोय आनं कपडे...., सर उद्या गेलं तर चालेल का?"
" ते मला काही माहित नाही, व्हॉईस-प्रेसिडेंट साहेबांचा फोन आला आहे, एक पेशन्ट ऑक्सिजनवर आहे आणि त्याच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं कॉम्प्रेसर बंद पडलंय, रुग्ण दगावू शकतं, तुला जावंच लागेल. कपडे, ट्रेन तिकीट वगैरे ते सर्व बघून घे...वाटल्यास... टुर खर्च क्लेम करतांना तू थोडं जास्तीचं क्लेम कर, मी मंजूर करीन!" थोडं गोडगोड बोलत त्यांनी मला पटवलंच.
आता विचार करण्यासाठी वेळ नव्हता. सर्विस इंजिनियर असल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. लायका लॅब या मुंबई स्थित फार्मा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण विभागात मी नोकरीला होतो. भारतात वातावरणापासून ऑक्सिजन तयार करणाऱ्या 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन' चा मी पहिला सर्विस इंजिनियर, असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. त्या काळी आम्ही फक्त ५ लिटर/मिनिट देणाऱ्या मशीन विकायचो. सीओपीडी म्हणजे जुनाट फुफुस दम्याचे आजार असलेले रुग्ण ते मशीन वापरायचे. त्यांच्यासाठी ऑक्सिजन हेच जीवन असतं. किंमत थोडी जास्त असल्याने फक्त श्रीमंतचं ती मशीन घेत असत. सततची सिलेंडरची कटकट नको म्हणून हा उत्तम पर्याय होता. वीज जोडल्याबरोबर हवेतील ऑक्सिजन वेगळं करून हि मशीन रुग्णाला देते, एव्हड इन्स्टंट, सोपं!
अशीच एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुरत जवळच्या खेड्यातील एका पटेल कुटुंबाने आमच्याकडून खरेदी केली होती. त्यांच्या पत्नीला चाळीशीच्या आतच फुफुसाचा मोठा आजार झाला होता. फुफुसतज्ञ डॉक्टरांनी त्यांना या पुढील जीवनात नेहमीसाठी २४ तास २ लिटर ऑक्सिजन घेण्याचा सल्ला दिला होता. सिलिंडरची उपलब्धता, अदलाबदलीची कटकट टाळण्यासाठी त्यांनी आमच्याकडून विजेवर चालणारी हि मशीन घेतली होती. तरी असे रुग्ण आणीबाणी काळात लागेल यासाठी एक सिलेंडर ते घरी ठेवतातच.
आका का हुकूम सरआंखोपे! समजून एक वजनदार कॉम्प्रेसर रिक्षमध्ये घेऊन मी अंधेरी ऑफिस ते गोरेगाव रूमवर, तेथून लोकलने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहचलो. आरक्षित तिकीट नसल्यामुळे हमालाला पैसे देऊन जुगाड करत सुरत ट्रेन पकडली. एक कॉम्प्रेसर, सर्विस बॅग आणि स्वतःची बॅग अशी सर्कस सांभाळत रात्री १२ ला सुरतला पोहचलो. बाहेर तुफान पाऊस पडत असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशाने तुफान गर्दी केली होती. कसाबसा त्यातून मार्ग काढत स्टेशन बाहेर पडलो.
धो धो पावसात बाहेर पडताच ऑटोरिक्षावाल्यानी मला घेरलं. माझ्याकडील सामान, चेहऱ्यावरील हावभाव बघून एक ' मोटा ग्राहक' मिळतोय असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण ज्या ठिकाणी मी जाणार त्या ठिकाणच नाव घेताच ती रिक्षाड्रायव्हर मंडळी दूर दूर होत गेली. काही ' भाई बद्दा दूर छे, नथी जवानू' असं काही म्हणतं तोंड वाकडं करू लागली. पण त्यापैकी एका म्हाताऱ्या रिक्षावाल्याला माझी किव आली, '८० रुपिया देना पडेगा, है तो बोलो' मी घासाघीसच्या भानगडीत न पडता सरळ होकार दिला आणि निघालो.
सुरत स्टेशन पासून ते गाव साधारण १४-१५ किमी लांब असावं. तुफान पावसामुळे सुरत शहराच्या रस्त्यावर खच्च पाणी साचलं होतं. त्यातच पाणी रिक्षाच्या फुटरेस्टवरून वाहत असल्याने सामानाची सर्कस होतं होती. रिक्षावाला गुजराती भाषेत काय बडबड करत होता, काहीच कळत नव्हतं. पावसातचं गाव गाठलं. मध्य रात्रीची वेळ असल्याने फक्त एक घर सोडून संपूर्ण गाव गाढ झोपी गेलं होतं. पाऊस, वीज बंद झाल्यामुळे अंधारात घरचा पत्ता विचारत कसाबसा रात्री १ ला आम्ही त्यांच्या घरी पोहचलो. मी आलो बघून पटेल कुटुंबाला हायसं वाटलं. घरातील एका वृद्ध महिलेने हात जोडून गुजराती भाषेत माझं स्वागत केलं, नंतर कळालं की ती रुग्णाची सासू होती. ती काय बोलली ते मला नाही कळालं पण त्यांच्या भावना मी समजू शकत होतो. एक मुलगा माझी बॅग आणि कॉम्प्रेसर घेऊन मला आत रुग्णाजवळ घेवून गेला. घरातील रुग्णाची अवस्था बघून मी चक्रावून गेलो.
मशीन तर बंदच होतं आणि स्टॅन्डबाय सिलिंडरचं ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनवायू मिळत नव्हता. ऑक्सिजन अभावी ती महिला 'पाण्याविन माशा' सारखी तडफडत होती. तिला ऑक्सिजन नितांत गरज होती. थोडा तरी प्राणवायू मिळून ती मी येईपर्यंत जिवंत राहावी म्हणून त्याच्या जीवनाचा जोडीदार पतीने एक युक्ती केली. सायकलच्या चाकात हवा भरणाऱ्या पम्पला एक रबरी नळी जोडून त्याद्वारे तो पत्नीच्या नाकात हवा ढकलण्याचा प्रयत्न करत होता. बाबाचा हा प्रयत्न त्यांची छोटी छोटी मुलं कावऱ्या-बावऱ्या केविलवाणी नजरेने बघत होती. ते दृश्य खूपच ह्रदयद्रावक होतं. नाव 'पटेल' असं गर्भश्रीमंत असलं तरी त्यांची परिस्थिती अत्यन्त बेताची होती.
मी क्षणाचाही विलंब न करता कंदिलाच्या उजेडात दहा मिनिटात ऑक्सिजन मशीनचं कॉम्प्रेसर बदललं आणि विजेची वाट बघत बसलो. आता रात्रीचे २ वाजले होते. जाम थकल्यामुळे मी क्षणात झोपी गेलो असतो पण रुग्णाची अवस्था आणि तिला वाचविणाऱ्या पतीची धडपड बघून माझी झोपंच उडाली. वीज येईपर्यंत त्याचा तो सायकलमध्ये हवा मारण्याचा पंप चालूच होता. लवकरात लवकर वीज यावी म्हणून मी प्रार्थना करत होतो. माझी थकलेली अवस्था बघून रुग्णाचा पती पटेल मला 'भाई, तमे अंय्या सोजावं' म्हणत होता. पण मी न झोपता बसल्याजागी गुंगत होतो.
तेव्हड्यात चमत्कार व्हावा तसा ओसरीतला विजेचा पिवळा ब्लब चमकला. विज आल्याचा आनंद त्या 'पती' च्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मी कव्हर पॅक न करता लगेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन चालू केली आणि रुग्णाच्या नाकाला रबरी 'नोजल कॅनुला' लावला. आता 99% शुद्ध प्राणवायू रुग्णाच्या शरीरात धावत होता. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता, आभार प्रगट करण्यासाठी शब्दाची गरज नव्हती.
टेस्टिंगसाठी मशिनचं कव्हर मी मुद्दाम उघडं ठेवलं होतं. मशीन चालू, त्यामुळे थोडं अंग टाकण्यासाठी मी आता मोकळा झालो होतो. कशी तरी २-३ तास झोप घ्यावी म्हणून बाहेर ओसरीत आंथरलेल्या गोदडीवर मी झोपी गेलो. सकाळी सहा वाजता उठून मशीनचं कव्हर लावलं. चहा पित सर्विस रिपोर्ट व बिल तयार करून मी चालता झालो.
वैद्यकीय उपकरण नोकरी-व्यवसायात असताना अशा किती तरी सीओपीडी, अस्थमा रुग्णांशी माझा जवळून संबंध आला आणि अनेक बरेवाईट अनुभव आले. डॉ नितु मांडके, डॉ उडवाडियासारख्या किती तरी निष्णात तज्ञ डॉक्टर्स, पॅराशूट ऑइलचे मालक श्री मरिवाला, हेक्स्टचे डायरेकटर सारखे किती तरी उद्योगपतीकडे आमच्या मशीन्स होत्या. त्या मशिनच्या सर्व्हिसिंग निमित्ताने मी त्यांना भेटत असे. आज कोरोना महामारीत ऑक्सिजनच्या भिषण टंचाईला पर्यायी व्यवस्था म्हणून जगभर ऑक्सिजन मशीन किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सर्वत्र वापरल्या जात आहे. खरं तर ऑक्सिजन सिलेंडरला उत्तम पर्याय म्हणून हे वैद्यकीय उपकरण मागील २५ वर्षापूर्वी देशात उपलब्ध होतं आणि देशातील सर्व मिलिटरी रुग्णालयं ती वापरत होती. वर्ष १९९७ मध्ये या मशीनची विस्तृत माहिती देणारा 'मोडॅलिटीज ऑफ ऑक्सिजन इनरीचमेन्ट' हा माझा लेख 'बायो-मेड' या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाला होता. त्यावेळी मी 'कोअर हेल्थकेअर' या गुजरातमधील उद्योगसमूहात टेरियरी मॅनेजर या पदावर कार्यरत होतो.
एक अनुभव म्हणून मी हा लेख शेअर केला आहे.
- प्रेम जैस्वाल, छ संभाजीनगर (औरंगाबाद)
9822108775
Monday, 24 November 2025
आर्ट ऑफ गिव्हिंग
प्राचिन काळापासून मनुष्य हा कळपात राहणारा प्राणि होता. जेंव्हा शेती व्यवसाय विकसित नव्हता आणि मनुष्य परावलंबी होता, तेंव्हा जंगलात शिकार करण्यासाठी मनुष्य कळपात फिरायचा आणि मिळालेल्या शिकारीवर त्याची उपजीविका चालायची. अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय, हिंस्र प्राण्यापासून रक्षण, संकटकाळी धावून जाण्यासाठी, सुखदुःखात एकमेकाला मदत आदी कारणामुळे मनुष्याला कळपात राहणे आवश्यक होते. अड़ीअडचणीत एक दुसऱ्यांना देवून-घेवून लोक मदत करायचे. अनेक सण-उत्सवात धान्य, कपड्यांची देवान-घेवान व्हायची. त्यामुळे आपापसतील प्रेम-संबंध, नाते वृंदिगत व्हायचे. अडचणीत त्याचा फायदा होता. आणि त्यातुनच पुढे वेगवेगळ्या समाजाची निर्मिति झाली. गावखेड्यात आजही शेतातिल दूध,भाज्या-फळे, हुरड़ा, आंबे इ. शेजाऱ्याना वाटण्याची प्रथा आहे. कदाचित त्यामुळेच गावात भिक्षुक कमी आढळतात. शहरात यदा कदाचित असे कुणी केलेच तर त्याला 'शेअरिंग' असे 'सोफिस्टिकेटेड' नाव आहे. परंतु विज्ञानातील शोध आणि आर्थिक प्रगतिमुळे मनुष्य आता एव्हड़ा स्वावलंबी झाला आहे कि त्याला आता कळपात राहण्याची गरज उरली नाही. भौतिक सुखात तो गुरफटून गेल्यामुळे त्याला इतरांशी काही देने-घेणे, कुणाच्या सुखदुःखात, अडचणीत जाण्याची गरज वाटत नाही. जन्मदाते आई-वडील, जवळचे नातेसंबन्धी आणि समाजाचा येण्याजाण्याचा 'त्रास' नको म्हणून आज उच्चशिक्षित नोकरदार दूर नोकरी शोधत आहे. अशा असंवेदनशील आत्मकेंद्री वर्गाची संख्या दिवसंदिवस वाढून एक आत्मकेंद्री, चंगळवादी समाजाची निर्मिति होत आहे. ज्या समाजात राहून मनुष्य लहानाचा मोठा होतो, ज्या समाजाकडून संस्कार, जीवनमूल्य शिकलो तोच समाज आता त्यास नकोस वाटन, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पाऊस संपल्यानंतर छत्री अडचणीची होते, असा तो प्रकार आहे. सामाजिक बांधीलकी आणि संवाद फक्त व्हाट्सप आणि फेसबुकपुरते मर्यादित झाले आहे. हल्ली व्हाट्सप्प फेसबुकवरील हजारो मित्रातच मनुष्य मशगूल आहे. त्याला शेजारच्या 'व्हाट्सप' मित्राशी दोन मिनिटे बोलण्यासाठी वेळ नाही आणि गरजही वाटत नाही. थोडक्यात कळपात राहनारा प्राणि आज कुलुपात राहणे पसंद करत आहे. आपल्या गरजा पूर्ण होऊन स्वावलंबी झाल्याचा हा परिणाम आहे. विज्ञानाच्या प्रगतिमुळे जग जरी अगदी एका खेड्यासारखे वाटत असले तरी ह्या प्रगतिमुळे मनुष्य एकमेकापासून दुरावला गेला आहे, हेही तितकेच खरे. असो, 'कालाय तस्मै नमः'
काळानुरूप मनुष्यात कितीही बदल झाले तरी त्यामुळे 'आर्ट ऑफ गिव्हिंग' चे महत्व कमी झालेले नाही. पण हल्ली धावपळीच्या युगात मनुष्य आपले काम आणि अर्थार्जनामध्ये खुप व्यस्त आहे. कुणास काही देणे तर दूर पण घेण्यासाठीही त्याच्याकड़े वेळ नाही. व्हाट्सप, फेसबुकवरील 'मित्रांना' गुड़ मॉर्निंग, गुड़ नाईट आणि मोठमोठे अवजड सुविचार (जे इतरांचे असतात) देण्याघेण्यामध्येच धन्यता मानतो. खऱ्या आर्ट ऑफ गिव्हिंगला आपल्या धनाच्या श्रीमंतीपेक्षा 'मनाशी श्रीमंती' लागते. याची प्रचिती घ्यायची असेल तर एक वेळेस हे करून तर बघा. त्यासाठी अगदी गावखेड्यातच जाण्याची गरज नाही. आपल्या शहरी जीवनात राहूनही 'आर्ट ऑफ' गिव्हिंग' चा अनुभव घेऊ शकता.
औरंगाबादला माझा वैद्यकीय उपकरणाचा व्यवसाय होता तेंव्हाची ही घटना. प्रसूतिनंतर बालरुग्णाना लागणारे वार्मर, फोटोथेरपी ज्याना सामान्यजनता 'काचेची पेटी' म्हणतात अशा उपकरणाची हॉस्पिटलला विक्री आणि दुरुस्ती आम्ही करायचो. कमी वजनाच्या, जन्मताच काविळ झालेल्या नवजात बाळाना ह्या उपकरणामध्ये उपचारासाठी ठेवल्या जाते. त्यावेळेस आमचं ऑफिस नव्हतं म्हणुन सर्व कामकाज घरूनच चालायच. मला आठवते सकाळची कामे, हॉस्पिटल-व्हिजीट आटोपूण मी दुपारी आरामात पहुडलो होतो. तेव्हड्यात कुणीतरी बेल वाजवून माझी झोपमोड़ केली. बाहेर बघतो तर एक नीटनेटक्या ड्रेसमध्ये ऑफिस एग्जीक्यूटिव वाटावे असे गृहस्थ उभे होते. अवकाळी पावसात ते थोड़े भिजलेही होते. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघता ते खुप घाबरलेले आणि गोंधळलेले वाटत होते. विचारपूस केल्यानंतर कळाल कि त्यांच नवजात बाळ शासकीय रुग्णालयाच्या अतिव दक्षता विभागात भरती होत. त्या बाळाला काविळ झाला होता आणि शासकीय रुग्नालयाच्या काविळ कमी करणाऱ्या फोटोथेरपी मशिनीची निळी ट्यूब काम करत नव्हती त्यामुळे इलाज होत नव्हता. अशा रुग्णालयात एखादा सुटाभाग खरेदी करायचा असल्यास एका वेळखाऊ दिव्यचक्रातुन जावे लागते. म्हणून ते स्वतः डॉक्टराकडून माझा पत्ता घेवून स्वखर्चाने माझ्याकडे ती ट्यूब खरेदी करण्यासाठी आले होते. इमर्जन्सी व त्यांची आर्थिक परिस्थिति बघून मी त्यांना ती ट्यूब मला आली त्या किमतीत देवून टाकली. पण पुढचा प्रश्न ती ट्यूब मशीनमध्ये बसवनार कोण? शासकीय रुग्णालयात काम करायच म्हणजे त्यांच्या लांबलचक, वेळखाऊ नियमाने जावे लागते. सर्विस चार्जेस तर मिळनार नव्हतेच, परन्तु नवजात बाळ आणि त्यांची अड़चन लक्षात घेवून पड़त्या पावसात मी ते उपकरण चालू करून दिले. फोटोथेरपी चालू झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आंनद बघण्यासारखा होता. पूर्ण व्यवहारात सरकारी नियम बाजूला ठेवून 'सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड' या भावनेने मी त्यांना निस्वार्थ मदत केली. कालांतराने मी ते सर्व विसरूनही गेलो होतो.
तीन वर्षानंतर औरंगाबादच्या रामा इंटरनेशनल या पंचतारांकित हॉटेलमध्ये बालरोगतज्ञानची कॉन्फ्रन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये आमच्या कंपनीचाही स्टॉल होता. पहिल्याच दिवशी स्टॉलची व्यवस्थित मांडणी करताना एक हॉटेल स्टाफ मला स्वतः येऊन विचारतो, 'साहब आपको कुछ ठंडा, पेप्सी कुछ चाहिये तो आप मुझे जरूर कहेना?', मला थोड़ आश्चर्यच वाटल की येथे कुणाशी माझा काही परिचय नसताना अस अचानक कुणी मला असं का विचाराव. मग त्याने मला स्वतःहुन आठवण करून दिली कि मी तोच व्यक्ती आहे ज्याच बाळ आजारी असताना तुम्ही भर पावसात मदत केली होती. ते महाशय रामा इंटरनेशनल पंचतारांकित हॉटेलचे 'कॅॅप्टन' होते.
कॉन्फ्रन्सच्या शेवटच्या रात्री रामा हॉटेलच्या लॉनवर बैंक्वेट होती. कंपनीस्टाफ व डिलरचे मिळून आम्ही आठजण होतो. आयोजकाने प्रत्येक स्टॉलला जेवणाच्या फक्त दोनच पासेस दिल्या होत्या. नियमानुसार आमच्यापैकी दोन जण बेंकवेटला जावू शकत होतो बाकी आम्ही बाहेर जेवन्याचं ठरवत होतो. कारण इतर सहा जणाना पंचतारंकित हॉटेलमध्ये पैसे देवून जेवने परवडणारे नव्हते. कोण बेनक़्वेट ज्वाइन करणार आणि बाहेर कोण जेवनार या द्विधेत असताना तेच रामा हॉटेलचे कैप्टन माझ्याकड़े येवून मला आस्थेने विचारतात की आपणास काही प्रोब्लेम आहे का. मी त्यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बैंकवेटच्या पासेसचा अख्खा गठ्ठाच माझ्या पुढे आणून ठेवला. 'सर, तुम्हाला हव्या तेव्हडया पासेस बिनधास्त घ्या!' मी त्यांच्याकडून बैंकवेटच्या सहा पासेस घेतल्या. शासकीय नियम आणि पैशाचा विचार न करता मी त्याला मदत केली होती आणि विसरून गेलो होतो पण त्याच्या ते पक्क लक्षात होत. 'रिटर्न गिफ्ट' म्हणून तेही पंचतारांकित हॉटेलचे सर्व नियम बाजूला करून किंवा आपले अधिकार वापरून आम्हास मदत करत करण्यास तयार होते. 'आर्ट ऑफ गिव्हिग' चा तो परिणाम होता. असं म्हणतात कि 'जे आपण इतराना देतो ते व्याजासहित परत मिळतं '.
निसर्गही आपल्याला भरभरुन देत असतो. प्रकाश, पाणी, हवा, पाऊस, ऊन, वारा, माती, जमीन, सावली, फूल, फळे, वृक्ष, इंद्रधनुष्य, पक्ष्यांची किलबिल अशा कितीतरी गोष्टी तो आपल्याला फुकटात घेतो. एखाद्या फळाचे बी चुकीने जरी शेतात पडल तर काही वर्षानी तिथे रसाळ फळाचे झाड़ उभे दिसते. सर्वच फळ-फुलांचे झाड़ आपण लावत नाही. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी निसर्गाकडून काहीही घेत नाही. मग निसर्गाकडून सर्वच गोष्टी फूकटात घेत असताना आपण फुकटात इतराना काय देतो, हे महत्वाचे आहे. म्हणूनच 'घेता' या कवितेत प्रसिद्ध कवि विन्दा करंदिकर म्हणतात -
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ।।





