ad1

Thursday, 4 June 2026


                        

                                     उबंटू 

पैशाची हाव समुद्राच्या पाण्यासारखी असते. समुद्राचे पाणी पिल्याने तहान भागत नाही. उलट त्या खाऱ्या पाण्याने तहान वाढतचं जाते. तहान वाढली तसा मनुष्य पुन्हा जास्त पाणी पितो. शेवटी शरीरात मिठाचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मग ही हाव पद, प्रतिष्ठा किंवा पैशाची असू शकते.

आज येथे हे नमूद करायचं कारण काय? आज पैशामागे जग अधाशा सारखं धावत आहे आणि हा पैसा कमीत कमी कष्ट करून कसा मिळवता येईल याचा मनुष्य विचार करत आहे. राजकारणातून मिळणारा पैसा थोडा त्याच मार्गाचा.  निवडणुकीत दहा लाख लावा पन्नास लाख काढा!  अर्थात ते पन्नास लाख किंवा कोटी हे शासनाकडून त्या त्या शहर किंवा गावासाठी निधी स्वरूपात देण्यात आलेले असतात.  थोडक्यात गावातील इतर गोर-गरीब, दिन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी, मूलभूत सुविधेसाठी आलेला निधी हा वरच्या वर लाटला जातो. मूठभर लोकांचे कल्याण होऊन संपूर्ण गाव, शहर किंवा देश आहे त्यापेक्षाही खंगुण जातो.  हा प्रकार फक्त भारत देशात नाही तर जगातील इतर सर्व देशात कमी-जास्त प्रमाणात घडत असतो. स्वार्थी भौतिक सुखाच्या नादात मनुष्यचं मन एव्हड असंवेदनशील झालं की त्याला इतरांचा किंचितसा विचार करावयास वेळ नाही.

सर्व बाबतीत प्रगत, सुशिक्षित, नितीमत्तेची जान,सद्सदविवेक बुद्धी आणि सामाजिक जबाबदारीचे भान असूनही मनुष्यजात असा स्वार्थी विचार करत असेल तर मग शहरीकरणाचा लवलेश नसलेली हजारो मैल दूर वनात राहणारी आदिवासी जमात अशाच स्वार्थीवृत्तीची असेल का? रानात वणवण भटकून मिळालेली कंद-मुळे, शिकार करून मिळालेलं मांस खातांना ते इतरांचा मुळीच विचार करत नसतील का?  

हे जाणून घेण्यासाठी एका मानवशास्त्रीय वैज्ञानिकांनी एक भन्नाट प्रयोग  केला.    त्यासाठी त्याने आफ्रिकेच्या दूर वनात जेथे खूपच अप्रगत मनुष्य वस्ती आहे अशा जागेची निवड केली. तेथे गेल्यानंतर त्याला दहा उघडी-नागडी उनाड मुलं जंगली खेळ खेळताना दिसली.  या वैज्ञानिकाने थोड्या दूर  अंतरावर एका झाडाच्या बुंध्याच्या सभोवताली गोलाकर अशी दहा फळ ठेवली.  आणि त्या दहा मुलांना 'जो पहिला येईल त्याला सर्व फळे मिळतील तेंव्हा शिट्टी वाजल्यानंतर पळत जाऊन ती फळ घेण्याचा आदेश दिला'.  वैज्ञानिकाला वाटलं की शिट्टी वाजल्यानंतर या पैकी एखादा मुलगा जोरात पुढे पळून हवे तितके फळ हातात घेऊन खात बसणार आणि मग इतरांना खायला काहीच मिळणार नाही, इतर उपाशी राहतील. पण प्रत्यक्षात घडलं उलटंच. ती सर्व दहा मुलं थोडंही न पळता एकमेकांच्या हातात हात घालून शांतपणे हळू हळू त्या झाडा जवळ गेली. प्रत्येकांनी एक एक फळ हातात घेतलं आणि एक गोलाकार रिंगण करून एकमेकांना देत ती खाऊ लागली. हा प्रकार बघून त्या वैज्ञानिकाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. असं अनपेक्षित घडलचं कसं यावर त्याचा विश्वासच बसेना. म्हणून वैज्ञानिकाने त्या आदिवासी मुलांची मानसिकता जाणून घेण्याचं ठरवलं. त्यावर मुलांनी सांगितलं की 'आमच्या समूहात जे जे मिळतं ते सर्वांचं असतं, त्यावर सर्वांचा सारखाच अधिकार असतो' इंग्रजीत यालाच ,'आय एम बीकॉज वी आर' असं म्हणतात. उबंटू नावानी हे तत्त्वज्ञानाच उदाहरण प्रसिद्ध आहे. मग मनात विचार येतो- जर हाच प्रयोग विकसित शहरातील मुलासोबत केला असता तर?

सांगायचं तात्पर्य असं की, या जगात सर्वांसाठी सर्व मुबलक प्रमाणात आहे. पण प्रत्येक्षात  ५% हावरट उद्योजक आणि राजकारणी नेत्याकडे ९५% संपती एकवटलेली आहे. आणि ९५% लोकांकडे फक्त ५% संपती आहे. याला 'संपत्तीची हाव'हे एकच कारण आहे. राजकारण्यांच्या भ्रष्ट्राचाराबदल प्रसिद्ध वक्ते शिव खेरानी खूपच छान उदाहरण दिलं आहे. एक भारतीय नेता काही कारणानिमित्त परदेशी जातो. तेथील मंत्री त्याची राहण्या, खाण्याची आणि मनोरंजनाची खूपच चांगली सोय करतो. न राहून आपला नेता त्याला विचारतो,' एक साधे राजकारणी असून तुम्ही माझी एव्हडी सोय कशी केली?' त्यावर तो मंत्री आपल्या नेत्यांना एका खिडकीजवळ घेऊन जातो. दूर एक पूल असतो त्याकडे बोट दाखवून तो आपल्या नेत्याला विचारतो, ' तो दूर पूल दिसतो का?'  हा नेता म्हणतो 'हो दिसतो की'.  त्यावर तो परदेशी मंत्री म्हणतो,' १०% मित्रा १०% !

काही वर्षानंतर तोच परदेशातील मंत्री भारतात येतो.  हा नेता परतफेड म्हणून त्याची खूपच सोयसाय करतो. भारावून जाऊन तो भारतीय नेत्यास 'एव्हड  जंगी स्वागत कसं करू शकतोस मित्रा?' याचं कारण विचारतो. त्यावर आपला नेता त्या नेत्यास एका खिडकीतून बोट दाखवत विचारतो,' तो पूल दिसतो का?' परदेशीय मंत्री म्हणतो- ' नाही दिसतं' . त्यावर आपला नेता म्हणतो,'१००% मित्रा १००% !'   मूळात तेथे पुलच नसतो!!

मग कसा विकास होईल गाव, शहर आणि देशाचा.  एकीकडे आडमाप कर आणि महागाईने जनता त्रस्त असते तर दुसरीकडे एखाद्या लाकडाला किटाणू वाळवी   जसे आतून पोखरून पोकळ करतात तसा भ्रष्ट राजकारणी, गुत्तेदार आणि त्याच्याशी लागेबंधे असलेल्या नोकरवर्गाकडून देश पोखरला जातो. उदघाटना आधीच करोडो रुपये खर्च केलेले पूल वाहून जातात. अचानक छत कोसळून हजार करोडो रुपयाचे नुकसान होते. आणि हा वाया गेलेला पैसा जनतेच्या कराद्वारे वसूल केलेला असतो. 

दहा सदस्य असलेल्या कुटुंबात आलेला पैसा जर एक दोन व्यक्ती स्वतःसाठी खर्च करून असतील तर इतर आठ सदस्याने जीवन कसं जगायचं? गाव-खेड्याच्या विकासासाठी आलेला निधी काही राजकारणी स्वतःचचं घर भरण्यासाठी खर्च करत असतील तर यासारखी 'नीच'ता नाही.  रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आरोग्य याबाबतीत गावातील इतर जनतेचे काय हाल होतील याबद्दल त्यांनी थोडी तरी संवेदना बाळगावी. आणि हिच बाब राज्य आणि देशासाठी लागू पडतं. 

गरज आहे थोडा विचार करण्याची, थोडी संवेदनशीलता जागृत करण्याची. तेंव्हाच नवा सूर्योदय होईल. सर्वसामन्याचा विकास होईल.


© प्रेम जैस्वाल, पेडगावकर 9822108775
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)

Tuesday, 26 May 2026


                  





लाल पटका ( आमचा बाप )

काही व्यक्तींची देहबोली खूप प्रभावी असते. त्यांच्या चेहऱ्यावरीलं हावभाव, देहबोली सतत संवादाचे काम करत असतात. आमचे पिताश्री शंकरलाल म्हणजे 'दादा', असंच एक व्यक्तिमत्व होतं. साडे-पाच फुटापेक्षा जास्त उंची, मध्यम कडक आंगकाठी. पांढरा सदरा-धोती, डोक्यावर लाल फेटा चढवल्यानंतर त्यांचा गोरापान चेहरा भलताच उठून दिसायचा. तशी आमच्या भितीत वाढ व्हायची. जोरात चालतांना करsss करsss असा आवाज करणारे चामडीजोडे त्यांच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावायचे. सभोवतालच्या चार गावातील लोकांत त्यांच्याविषयी आदरयुक्त भिती होती. एका हाताने बंद छत्री टेकवत जेंव्हा हि स्वारी झप झप झोकात चालायची तेंव्हा आदराने लोकांचे हात 'राम राम ठोकण्यासाठी' वर व्हायचे. त्यांना बघताच गल्लीबोलीत पत्ते, पैशाचे डाव खेळणारी पोरंसोर मंडळी धूम ठोकून पसार व्हायची. कारण चालत चालता चामडीजोडे सैल करून मारण्याच खास कसब त्यांच्याकडे होतं! शिवाय त्यांच्या भारदस्त आवाजात एक दरारा होता.  लहानपणापासून आम्ही वडिलांना 'दादा'च म्हणायचो ?  कदाचित गावातील इतर समाजातील मंडळी त्यांना 'दादा' नावांनी हाक मारत असावी, तेच पुढे चालत गेलं. हा लेेेख खास त्यांंच्या विषयी.

निजामच्या काळात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांच शिक्षण मोडी वाचण्या-लिहिण्यापूरतच झालं होतं. पण जीवनाच्या विद्यापीठातलं त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि जीवनमूल्याचे संस्कार एखाद्या पदवीधराला लाजवणारे होते. 'मग स्वतः जुजबी शिकून तुम्ही आमच्या शिक्षणाच्या पाठी का लागलात?'  या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एका घटनेची आठवण करून सांगितलं- त्याकाळी क्वचितच गावात, पोलीस निरीक्षक(चीफ साहेब), तहसीलदार, बीडीओ अशी अधिकारी मंडळी भेट द्यायची. अशा दुययम, तृतीय वर्ग कर्मचाऱ्यांचा खेडेगावात प्रचंड दरारा असायचा. गावकरी आपल्या परीने त्यांची चांगली सोयसाय करायचे. सर्व गाव त्यांना बघायला गोळा व्हायचा.  मग ती अधिकारी मंडळी जास्तीच ऐटीत येऊन बाजेवर चहाचे फुरके मारत लोकांवर इंग्रजी शब्दफेक करायची. बिचाऱ्या गावकऱ्यांना त्या शब्दातलं अ कि ढं कळत नसे. पण साहेबांच्या विंग्रजीने ते खूपच प्रभावित होतं.  बाप रे, साहेब खूपच हुशार आहेत असं त्यांना वाटे. इंग्रजी म्हणजे हुशार हा गैरसमझ तसा जुनाचं.  साहजिकच अशा घटनेने आमचे दादा बेचैन होतं. या घटनेने दादाच्या मनात शिक्षणाविषयी जिद्द निर्माण केली. शिक्षण सर्वोपरी आहे हे ते समजून गेले. दूरदृष्टी निर्माण होते ती अशी. मग काय, आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत आम्हा भावंडाना शिकविण्याची जिद्द सुरु झाली. गावातून तालुकाच्या ठिकाणी मग औरंगाबाद असं आम्ही सर्व शिक्षण घेत गेलो. त्यांच्या या ध्यासामुळे कठीण परिस्थितीत चुलत-सख्खे असे आम्ही सात भावंड उच्चशिक्षित झालो. एक जिल्हा न्यायाधीश, दोन प्राध्यापक, एक डॉक्टर, एक एम.ए., मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर सर्वात लहान भाऊ कृषी अभियांत्रिकी पदवीधर झाला. शिकलेल्या सुना येऊन 'एक उच्चशिक्षित कुटुंब' अशी समाजात वेगळी ओळख निर्माण झाली. अर्थात हजार वस्तीच्या छोट्या पेडगावासाठी हा बदल खूपच मोठा होता. समाज आणि सभोवतालच्या चार गावाला प्रेरित करणारं एक ऊर्जास्रोत होतं. अर्थात, मुलांना पारंपरिक शेती-धंद्यास न जूपता उच्च शिक्षण दिल्याचा दादांना प्रचंड अभिमान होता आणि तसं ते मोकळं बोलूनही दाखवायचे. विशेष म्हणजे , खूप शिकलेले मुलं म्हणजे मोठया पदावर नोकरी म्हणजेच अफाट पैसा, असे त्यांचे संकुचित विचार मुळीच नव्हते. धनसंपत्तीमुळे नाही तर कुटुंबाच्या उच्चशिक्षणातील प्रगतीमुळे दादांचा दरारा वाढतंच गेला. आज हा शिक्षणरूपी वटवृक्ष खूप बहरला आहे. पारंब्या फुटाव्या तसे कुटुंबातील अनेक मुलं-मुली डॉक्टर, इंजिनियर होऊन फक्त अर्थार्जनच्या पाठी न धावता समाजसेवा करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने घरातील मुलांनी फक्त सामान्य महाविद्यालयात प्रवेश नं घेता  आयआयटी, एम्स, आयआयएम, ऐनआयटी, बिट्स पिलानी सारख्या संस्थेत गरुड झेप घेतली आहे. मग या वृक्षाच्या कलमा इतर ठिकाणी लावल्या गेल्या, त्याही वृक्षात रूपांतर होऊन वाढल्या.

असं घडत असताना आमच्या कुणाच्याही शाळेत त्यांनी भेट दिलेली मला आठवत नाही. मी चौथ्या इयतेत शिकत असतानाच फक्त एक प्रकरण मला आठवतं - घटक चाचणीत भरपूर लिहूनही आमच्या मुख्याध्यापकांनी मला कमी गुण दिले होते. माझं हे गाऱ्हाणं कुठून तरी दादांना कळालं. दुसऱ्या दिवशी मोठे गुरुजी (मुख्याध्यापक) आणि दादाची सहज भेट झाली. गप्पाच्या ओघात दादाने माझं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडलं. तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी माझी कान उघाडणी केली,  'प्रेम्या, एक पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर गेला' या एका वाक्याच्या उत्तरा ऐवजी तू त्या पक्षास इतरत्र फिरवून पाच वाक्य लिहिलेत म्हणजे जास्त गुण मिळत नाहीत'!  ललीत लेेेखन म्हणजे 'वित भर जीवाला हातभर झगा!' कदाचित माझ्या लिखानाच बीज बालपणीच पेरलं गेलं असावं.

दादा वैद्य नव्हते पण गावी-परगावी कुणी आजारी आहे असं माहित होताच हातातील काम बाजूला सारून ते आधी धावायचे. त्यासाठी नात्याचे बंधन नव्हते. लगेच 'तू घाबरू नकोस तुला काही होणार नाही. वेडा आहेस का, थोडी हिम्मत राख' असा हक्काचा धीर देत त्यांचा हेकळणी, तुळस, सारख्या औषधी झाडपाल्याचा इलाज सुरु व्हायचा. पूर्वी गावात डॉक्टर-दवाखाने नव्हते. शेत-घरकाम करताना गावकऱ्यांना मार लागायचा, जख्म व्हायची.  कधी केसतोड तर कधी हाड टीचायचे. गरीब गावकऱ्यांना शहरात जाऊन इलाज करणे शक्य नसायचे त्यामुळे ते दुखणे अंगावर काढीत. दादाला हे माहित पडलं की ते स्वतः रोग्याकडे धावायचे. लगेच एखादी काच फोडून ते त्यातील पु काढून, स्वच्छ करून त्यावर झाडपाला लावून जख्म बांधून टाकायचे. बघणाऱ्याला ते किळसवानं वाटायचं पण दादांसाठी ते नेहमीच काम होतं. अशा रुग्णसेवेत त्यांचा हातखंडा होता. तूटलेलं हाड बांबूच्या कम्बड्या बांधून ते जोडलं जायचं. कालांतराने तो रोगी बरा होऊन कामाला जायचा. काय मिळत असावं त्यांना अशा सेवेत? पण ते करायचे.

त्यांचं हे रुग्णप्रेम फक्त मनुष्यजातीपुरत मर्यादित नव्हतं. एखादी गाय, म्हैस किंवा बैल प्राणि आजारी आहे हे माहित पडलं की ते जिद्दीने पेटून उठायचे. मग इतर कामे आपोआप बाजूला, प्राथमिकता फक्त तो रोगी. माझ्या बालपणीची ती घटना. भर दुपारी शेतातून वाघा गडी धावत आला होता. कंठया बैलाला पान लागला होता. आमच्या गावच्या भाषेत पान लागने म्हणजे सर्पदंश. बातमी एकूण दादाला चलबिचल होताना मी पाहिलं होतं. दुपारी गड्यानी कंठयाला बैलगाडीत टाकून घरी आणलं. धोतर खोसून गड्याला सोबत घेऊन दादाचा झाडपाल्याचा इलाज सुरु झाला. हळूहळू गावातील लोक जमा झाले. खंडीभर गुरात लाल्या-कंठया सर्वांची आवडती जोडी. बालपणी मी सुद्धा ती जोडी हाकली होती.  कंठया गेला तर जोड फुटणार होतं. धांदीन पाय बांधलेल्या कंठयाच तोंड जबरीने फाकवून त्यात काढे, औषध टाकले जात होते. कंठया दुःखाने तडफत होता. शेवटी जे नको होतं ते झालं.  विष कंठ्याच्या अंगात भिनत गेलं.  सूर्य मावळला होता, कंठयाने शेवटचा श्वास घेतला. कंठया गेला. बैलाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत दादा हरले.  दुःख अनावर होऊन दादा ढसढसा रडले. तो दिवस मला आजही आठवतो. मनाने पाषाणासारखा कठोर मनुष्य रडू शकतो, मी ते पहिल्यांदा पाहिलं होतं.

शेतीची कामं आणि इतर व्यवसायामुळे ते कधीही घरी बसलेले आम्हाला आठवत नाही. सुर्योदयापूर्वी बांड्या घोड्यावर ती स्वारी परगावी निघून जायची. ते परत येईपर्यंत आम्ही झोपी जायचो.  बालपणीचे आम्हा भावंडाचे तंटे प्रकरण 'दादाला सांगू का?' या एका वाक्याने संपायचे. त्यामुळे त्यांच्यासमोर बसून मनमोकळं बोललेलं मला आठवत नाही. दोन वेळेस मार खाल्याचं मला नक्की आठवतं. ते घरात तर आम्ही बाहेर किंवा ते परगावी तर आम्ही घरात.  गावपंचायत वगळता त्यांना गावातील राजकारणात विशेष रुची नव्हती. क्वचीत गावातील पोलीस पाटील किंवा सरपंच नेमणुकीविषयी ते आपलं मत मांडायचे. 

त्यांना सर्वात जास्त तिटकारा होता तो अंधश्रद्धा, कर्मकांड आणि त्यायोगे होणाऱ्या भक्तांच्या लुटीचा. देव मंदिराच्या नावाखाली होणारी लुट त्यांना आवडत नसे. काम सोडून रामाच्या पाठीमागे धावणारी जनता त्यांना आवडत नसे. 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' किंवा 'काय काशी करिती गंगा। भीतरी चांगा नाहीं तो।।’  असंच त्यांचं म्हणणं होत. पंढरपुर, तिरुपती बालाजी सारख्या दर्शनात लोकांना लुबाडणारी मंडळी, तेथील अस्वच्छता बघून त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर ते अध्यात्मापासून थोडं दूरचं गेले.

कर्तृत्त्ववान पूर्वजांची महती काही ओळीत सामावने कठीण जाते.  दोन ओळीच्या मध्ये सुद्धा बरंच काही बोलण्यासारखं असतं. खूप खस्ता खालेल्या असतात त्यांनी. प्रसंगी अपमान सहन केलेला असतो. अशिक्षित वातावरणात 'शिक्षण' असा चाकोरी बाहेरचा विचार करणे तसं सोपं नव्हतं. एक प्रकारचा जोखीम पत्करल्यासारखा तो प्रकार होता. क्वचीत थोडे मागे ओढण्याचे प्रयत्न झालेले असतात. शोकांतिका अशी की हे सर्व जोपर्यंत आपल्यावर तशी वेळ येत नाही तो पर्यंत कळत नाही! 

आज त्याच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गावात किती तरी तरुण मंडळी उच्चशिक्षित होऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात नोकरी करत आहेत. साहजीकच त्यामुळे आज गाव शिक्षित होऊन सुधारणा होत आहे. गरज आहे की गावातील तरुण मंडळींनी इतरांना उच्चशिक्षण घेण्यास मदत व मार्गदर्शन करण्याची. जेंव्हा केंव्हा गावात शिक्षणाविषयी चर्चा होईल, स्व. शंकरलाला म्हणजे आमच्या दादाच नाव आवर्जून घेतल्या जाईल. थोडी का होईना, 'मागे कीर्ती उरावी' ती अशी.   त्यांच्या पालखीचे भोई होऊन त्यांनी शिकविलेल्या जीवनमूल्यावर आणि दाखविलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली.

© प्रेम जैस्वाल, पेडगावकर,
    ह.मु. औरंगाबाद, मो. ९८२२१०८७७५

Saturday, 25 April 2026

गुजरा हुवा जमाना.....

                  
            

गुजरा हुवा जमाना.......

"मुस्सा मामू सायकील होना"
" कित्ते टेम के लिए होना? पछान बताव?"
"एक घंटा,  बडेभाई हमेशाच ले जाते, मैं भी लेगया पहले तुमारेसे."

लोखंडाच्या गंजलेल्या टपरीवर मलकट पांढरा कुर्ता पायजामा नेसलेले, दाढी, चेहऱ्यावर वण व कायम वैफल्यग्रस्त दिसणारें मूस्साभाई कधी अंथरलेल्या पोत्यावर तर कधी लोखंडी खुर्चीवर विराजमान असायचे. समोर एक छोटा लाकडी टेबल, त्यावर जुनं फाटकं रजिस्टर, दोऱ्याने बांधलेला पेन किंवा रिफील असे.   त्यापुढे आठ-दहा जुन्या सायकली ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभ्या असत. चैनीच कव्हर व मागच्या मडगार्डवर ठळक अक्षरात नंबर पेंट केलेलं असायचा. टपरीच्या आत सायकल रिपेरिंगसाठीचे हत्यार, जुन्या चाकांच्या रिंग, सायकल सीट घंट्या व इतर सुटे भाग अस्ताव्यस्त पडलेले असे.  टपरीच्या बाजूला मळकट बादलीत पाणी, हवेचा पम्प, पंपचरचं सामान आणि अस्ताव्यस्त पडलेले सायकलचे ट्यूब-टायर दिसे.  मुस्साभाईच्या बाजूला चहा-भज्जेच्या एक-दोन हाटेली आणि पान-टपऱ्या होत्या.  लहान मुलं ढुंकूनही त्या टपऱ्याकडे वळत नसत.  तिकडे वयस्कर मंडळीं, मोंढ्याचे व्यापारी, कर्मचारी वर्ग तेथे चहा-पान व धूर सोडतांना दिसायची. 

सकाळी मूसाभाई दुकानासमोर पाण्याचा सडा टाकून बसलेले असायचे. गावखेड्यात मुक्कामी  असलेल्या बसेस साधारण आठ वाजता वडाच्या झाडाजवळ धूळ उडवत थांबायच्या. बाजार, खरेदी, शेतमाल व कापूस विक्रीसाठी आलेली ग्रामस्थ मंडळीसाठी हा थांबा सोयीचा होता. कपडे झटकत प्रवासी बसमधून उतरायचे.  कच्च्या रस्त्याने उडणाऱ्या धुळीने ते माखलेले असायचे. बाहेर गावी जाणारे प्रवासी मात्र मुख्य बसस्टँडला जात. येथूनच सायकल भाड्याने घेऊन बाजारात, कापूस विकत घेणाऱ्या जिनिंग मिल कडे लोकं जायची. भाड्याने घेतलेल्या सायकलमुळे कामं पटपट व्हायची. जातांना सायकल परत करुन लोकं बसस्टँड गाठायची. नाहीतर 'नाईटचार्ज' लागत असे.

त्याकाळी मोजक्या लोकांकडे सायकली असायच्या. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात खोली घेऊन राहणाऱ्या तरुणानां भाड्याच्या सायकलीशिवाय पर्याय नसे. अशी काही 'शहरी' तरुण मंडळी राजेश खन्ना, अमिताभ सारखी हिप्पी वाढवून सायकल चालवीतांना, कट मारतांना दिसायची.  सायकल विकत घेण्याची आयपत नसल्यामुळेच भाड्याने सायकली घेतल्या जायच्या. किंवा दोन तीन मित्रामध्ये एक सायकल असायची. संपूर्ण गावामध्ये क्वचित एखाद्या कुटुंबाकडे ही चैनीची वस्तू असायची.  एखादा पाहुणा सायकलने गावात आला तर त्या सायकलभोवती चकरा मारून ती मालकीची आहे की भाड्याची, लोकं याची खात्री करून घेत.  रस्तेच नव्हते तेंव्हा दिवसात एक एसटी बस असे. इतर वेळेसाठी पर्याय एकच होता - भाड्याची सायकल.

मला आठवतं, ८वीत असतांना झेंडावंदन करुन आम्ही सायकल शिकण्याचं ठरवलं.  मुस्साभाईला ओळख सांगून त्याकडून दोन सायकली घेतल्या. सोबत मोठे बंधू जयभैय्या आणि मीत्र अशोक ठाकूर होता.  अंगुठ्याने टायरची हवा चेक करत त्याने आम्हांला दोन सायकली दिल्या.  पोलीस मैदानावर शिकतांना मी ब्रेक दाबायचं विसरलो.  सायकल सरळ पोलीस कार्यालयाच्या फेंसिंगला जाऊन धडकली. सायकल समोरचा एसएस स्टीलचा लोगो 'H' वाकला व मलाही थोडं लागलं. माझ्या जखमेपेक्षा मला त्या वाकलेल्या H लोगोची चिंता वाटू लागली. मुस्साच्या लक्षात आलं तर काय करायचं? ते आधीच तसं होतं 'हमने कुछ नही किया' असं सांगायचं का? पण आमचं नशीब, त्याचं लक्ष त्याकडे गेलंच नाही. भाडं भरून आम्ही सुटलो.

'संपूर्ण भारत देशात हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध होता. खरं तर आमचा तो भ्रम होता. आमचे पाऊल कधी हिंगोलीबाहेर पडलेच नसल्याने आम्हालासुद्धा ते खरंच वाटायचं. एकदा दसऱ्यात एक प्रसिद्ध सायकल कलाकार आला. त्याच्या नावावर 'अखंड सात दिवस' सायकल चालविण्याचा विक्रम होता म्हणे. अशी सर्वत्र चर्चा झाली. रामलीला मैदानावर, आम्रपालीजवळ त्याने 'शो' सुरु केला. राजेश खन्नासारखी हेअरस्टाईल असलेला तो कलाकार गोलाकार मैदानात अखंड सायकल चालवतांना दिसला. मधेच तो चालत्या सायकलीवर शर्ट बदलयाचा तर मधूनच पाणी पीत होता तर कधी दोन्ही हात सोडून हळूहळू गोलाकार सायकल फिरवत होता.  आत एका कपड्यावर प्रेक्षक पैसे टाकत होती.  एक तास हा प्रकार बघून आमच्यासारख्या नवशिक्याना खूपच आश्चर्य वाटायचं. तो कसा झोपत असेल? थकल्यानंतर विश्रांतीचं काय? जेवन आणि हो प्रात:विधि?  पण असे प्रश्न आमच्या बालबुद्धीत येण्याचा प्रश्नच नव्हता.

आठवीचं वर्ष संपता संपता मी सायकल शिकलो. अधून मधून मी सायकलने टायपिंग क्लासला जात असे. ऐके दिवशी आम्ही एसटी बसने बाहेर गावी जाणार होतो. पेडगाव ते हिंगोली आणि एक तासानंतर बाहेर गावी जाणारी एसटी बस होती. त्या एक तासात काम करून मला परत बसस्टॅन्डला यायचं होतं.  मी भाड्याची सायकल घेतली. वळनावर वाळूवर चाक जाताच स्लिप होऊन मी पडलो. खुराणा बंगल्याच्या दक्षिणेला खाली खोलगट जमिनीवर चौधरीची लॉउंड्री होती. नेहमीचा ग्राहक त्यामुळे चौधरीने मला उचलून घरी आणलं. एक तासात माझ्या गळ्यात फ्रॅक्चरचा पट्टा आला. उजव्या हाताला प्लास्टर चढविण्यात आलं होतं. ऐन परीक्षेच्या काही दिवसाआधी हा अपघात घडला होता. चिंता दोन परीक्षेची होती, टायपिंग व आठवी वार्षिक. कंदी रुग्णालयातून पैंडल रिक्षाने वर्गशिक्षक खिल्लारे सराचं घर गाठलं. 'सामायिक परीक्षेच्या मार्कांवरून वार्षिक परीक्षेचे मार्क मिळतील, चिंता करू नकोस' सरांनी असं आश्वासन दिलं. आठवी पास झालो. 30 WPM ऐवजी सरळ 40 WPM परीक्षेला बसून टायपिंग परीक्षा पास झालो.

दहावीला गणिताच्या पडोळे सरांची ट्यूशन अगदी सकाळी सहाला असायची. फटलक फटलक कव्हरला घासणाऱ्या चैनचा आवाज आणि घंटीचा गजर करत आम्ही गल्याबोळ्या पार करत ट्यूशन गाठायचो. जैन मंदिराच्या भोंग्यातून 'मैं नही माखन खायो...' अनुप जलोटाची प्रभातभजन कानी पडायचे. मधूनच ते 'हिरे मोतीsssss.ईईई ' असा लांब आलाप घ्यायचे. त्या लांब आलाप दरम्यान आपण किती सायकल चालविली ते मी मोजत असे. आता तो फालतू प्रकार आठवून माझं मलाचं हसू येतं. हिंगोली आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची झुंड सायकलने ये-जा करतांना दिसायचे. त्याकाळी महाविद्यालयाचा दर्जा नावाला साजेसा होता. याच काळात शहरापासून दूर असलेल्या शेतात पहिल्यांदाच मी एक जेन्टस आणि एक लेडीज सायकली जोडीने उभ्या बघितल्या!

कालांतराने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पगारी वाढून रस्त्यावर स्वतःची सायकल, लुना, एम-80 सुद्धा दिसू लागल्या. पण त्या 'भाड्याच्या सायकली' इतिहास जमा झाल्या. पुढे इंजिनियरिंगला असतांना विद्यार्थी आणि बरेच प्राध्यापकसुद्धा सायकलने महाविद्यालयात यायचे. आज देशातील मोठया शहरात स्वतः चालविण्यासाठी सायकलीप्रमाणे कार भाड्याने मिळतात. पुढे एआय तंत्रज्ञानावर आधारित चालकरहित कारसुद्धा मिळतील. पण आमच्यासाठी त्या भाड्याने मिळणाऱ्या सायकली कायम आठवणीत राहणार - पचास पैसे एक घंटा!

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर 
मो. 9822108775 


Tuesday, 21 April 2026

कॉर्पोरेट हॉस्पिटलचा विळखा


तीन वर्षांपूर्वीची घटना. डेंग्यूने आजारी मुलीच्या मृत्युची बातमी  कदाचित सर्वानी वाचलीच असावी. आजारी ७ वर्षाच्या मुलीचे पालक तिला दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम येथील पंच तारांकित कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एडमिट करतात. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर ती  दगावते.  हॉस्पिटलच नाव खराब होवू नये म्हणून तिला त्वरित घरी घेवून जा असे सांगण्यात येतं. सामान्य अशा 'डेंग्यू' आजाराचं १८ लाखाचं बिल त्या पालकांच्या हातात थोपवलं जातं. कळस म्हणजे ज्या शेवटच्या कपड्यात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो त्याचेसुद्धा बिल पालकाकडून वसूल केल्या जातं! विशेष म्हणजे हे बिल एकदम बरोबर कसं याचं सविस्तर विश्लेषण 'कॉर्पोरेट हॉस्पिटल' चा स्टाफ 20 लिखित पानात पटवून देतं!

या बातमीमुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघनं साहजिक होतं. सुपरसॉनिक गतीने ही बातमी जेंव्हा समाज माध्यमामधे व्हायरल झाली त्यामुळे आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांना चौकशीचे आदेश दयावे लागले. कैंसर, एखाद्या अपरीचित दुर्धर आजार, मल्टीपल सर्जरी किंवा दीर्घ काळासाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरी एकंदरित बिल एव्हड़ होवू शकत नाही, मग डेंग्यूसारख्या सामान्य आजाराच एव्हड़ अफाट बिल जनतेला खुप जास्त वाटनं साहजिक. आज गांव-तालुका पातळीवरील सामान्य दवाखान्यात शेकडो डेंग्यु रुग्ण उपचार घेताना आणि बरे होताना आपण पाहतो. क्वचितच, जेंव्हा पेशन्टला व्हेंटीलेटर गरज पड़ते तेंव्हा रुग्ण शहरातील मोठ्या किंवा शासकीय हॉस्पिटलमधे जातात किंवा त्याला 'रेफर' केल्या जातं. पण तेथील खर्च एव्हड़ झालेलं ऐकिवात नाही. विशेष म्हणजे फोर्टिसच्या बिलामधे वापरल्या गेलेल्या कन्झुमेबल्स आणि त्याचे भाव बघून कोणाचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. चौकशी अंती असं आढळलं कि या बिलामधील सर्वात मोठा हिस्सा हा 'सर्जीकल मटेरियल' चा होता. ज्यामधे एकूण ६६० डिस्पोजेबल इंजेक्शन, २७७६ हैण्डग्लोवचा खर्ज जोडण्यात आला होता. एका ₹१३/-च्या ग्लुकोस्ट्रीपसाठी त्या पालकाकडून ₹२००/- चार्ज घेण्यात आले होते.

यमो हरति प्रणान्‌, वैद्य प्राणन्‌धनानिच । सुभाषितावरून  वैद्यकीय व्यवसायावरील टीका नवीन नाही.  परंतु मागील काही दिवसात डॉक्टरावर होणाऱ्या टिका वाढत्या असून जीव घेण्या हल्ल्यानी डॉक्टर मंडली त्रस्त झाली आहेत. समाजात डॉक्टरप्रमाणे इतरही व्यवसायिक,उद्योजक किंवा राजकारणी आपन बघतो. फक्त दोन निवडणुकी दरम्यान त्यांची इनोव्हा, बंगलो, आणि इतर कमाई कितीतरी पटीने वाढलेली आपण वाचतो.     पण त्यांच्यावर लोकांनी हल्ले केले किंवा जाहीर वाच्यता केलेली कुठेच ऐकीवात नाही. किंवा त्यांना कुणी देशलुटारू, भ्रष्ट म्हणण्या इतपत कुणाची हिंमत होत नाही. किंबहुना अशी हिंमत होत नाही. कारण त्यांची प्रतिक्रिया परवडणारी नसते.  पण डॉक्टर म्हंटले कि 'एक सॉफ्ट टारगेट'! रोज एक तरी बातमी वर्तमानपत्रात वाचावयास मिळते. आधीच अशा घटनेमुळे त्रस्त, अडचणीत आणि धाकधुकीत असलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाचे हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरांसाठी वरील बातमी ऐकून 'भित्यापाठी वाघोबा' अशी स्थिति झाली.

पाण्यातील मासा 
झोपणार कैसा 
जावे त्यांच्या वंशा 
तेंव्हा कळे l 

डॉक्टरांवरील वाढते हल्ले, राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, समाजातील ढासळती प्रतिष्ठा, क्लिष्ट शासकीय नियमावली आणि शेवटी 'थँकलेस जॉब' या कारणांनी येत्या काळात वैद्यकीय क्षेत्राची अवस्था खूपच बिकट होत जाणार आहे.  एकेकाळी डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असं समीकरण होतं. पण हल्ली कोणताही डॉक्टर स्वतःच्या मुलाला किंवा मुलींना वैद्यकीय क्षेत्र निवडू देत नाही. ऐकून सर्वच डॉक्टरांची मुलं अभियांत्रिकीसाठीची जेईई परीक्षा देऊन आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी किंवा इतर महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. यामागील हेतू स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आपल्या मुलांना वैद्यकीय क्षेत्रात करियर घडवू  द्यायचं नाहीये.   आज घडीला देशातील २६ लाख विध्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात. त्यातील खूप कमी मुलं ही डॉक्टरपुत्र  असतात. 

आज मुम्बई दिल्लीसारख्या मेट्रो शहरामधे नोकरीस असलेल्या, आयटी क्षेत्रात काम करणारी सॉफ्टवेअर मण्डळी भरपूर मोठ्या पैकेजवर काम करत असते. प्रत्येक वस्तु ब्रैंडेड घेणारा पैकेजवाला हा नोकरवर्ग किरकोळ आजरासाठीसुद्धा कोर्पोरेट हॉस्पिटलमधे भरती होतात. आपल्या परिसरातील छोट्या हॉस्पिटल नर्सिंग होममधे इलाज होत असतानाही हा वर्ग एक ब्रेंड म्हणून कॉर्पोरेट हॉस्पिटलकड़ेच आकर्षित होतो. एकच छताखाली सर्व सुविधा,  'कैशलेस हॉस्पिटलायझेशन', राजीव गांधी योजना, महात्मा फुले योजनेमूळे पैशे भरायची गरज पडत नाही. पण अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलमधे त्यांच्या आजारावर इलाज करणारे डॉक्टर निष्णात आहेत कि नाही याचीही त्यांना कल्पना नसते. 

एक नफाखोरीचा उद्योग म्हणून प्रत्येक शहरात कितीतरी कॉर्पोरेट हाउस चैरिटी आणि समाजसेवेच्या नावाखाली हॉस्पिटल सुरु करत आहेत. ह्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचं कामकाज एखादया 'फाइव स्टार' व्यवसायिक हॉटेलसारखं असतं. ज्यामधे वेगवेगळे मैनेजमेंट डिपार्टमेंट आणि मोठा स्टाफ असतो ज्यांचा हॉस्पिटलला जास्तीत जास्त नफा कमवून देणे हाच मूळ हेतु असतो. कॉर्पोरेट म्हंटल तर तेथे खाजगी कंपनीचे सर्व नियम लागू पडतात. जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांच्या हाताखाली वेगवेगळे जनरल मैनेजर, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डेप्यूटी मेनेजर आणि स्टाफ असा अफाट पसारा असतो. मग त्यांचा पगार, भत्ते, कमिशन आणि इतर खर्च एव्हड़ा असतो कि हॉस्पिटलची गाड़ी सुरळीत चालून भरपूर नफा व्हावा म्हणून एकीकडे जास्तीत जास्त 'कॉस्ट कटिंग' आणि दुसरीकडे पेशंटचे 'अफाट बिल' अशी 'नफेखोरीची योजना' असते. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी दिलेलं टारगेट पूर्ण करणारे गल्लेलठ पगार असणारे 'एमबीए स्मार्ट मेनेजर' ची गरज असते. कदाचित याच कारणाने बऱ्याच नॉन-मेडिको स्टाफचा पगार अशा हॉस्पिटलमधे डॉक्टरापेक्षा जास्त असतो. अशा हॉस्पिटलचा प्रभावी 'मार्केटिंग व पब्लिसिटी' डिपार्टमेंट असतो ज्याना मंथली ठराविक पेशंट आणन्याचं टारगेट, कमीशन दिल्या जात. जवळ जवळ सर्वच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही धनाड्य आणि कोणत्यानं कोणत्या राजकिय पक्षाशी जवळीक असलेल्या उद्योजकाची आहेत. 'सेवा पेक्षा मेवा प्रिय' असलेल्या या उद्योजकात रुग्णसेवा ही फक्त तोंडाला लावण्यापूरती किंवा कागदावर दाखविण्यापुरती असते. 

प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल हे एक चैरिटेबल ट्रस्ट आणि 'रिसर्च सेंटर'ही असतात. गरीब रुग्णासाठी काही बेड येथे राखीव असावित, त्यांना कमी दरात सुविधा मिळावी तसेच मेडिकल क्षेत्रात या रिसर्च सेंटरनी नवनवीन संशोधन करावित अशी सरकारची अपेक्षा असते. पण तसे काही संशोधन किंवा प्रयोग होताना दिसत नाहीत कदाचित या उदासीनतेमुळे वैद्यकिय संशोधनात आपण इतर पाश्चात्य देशाच्या तुलनेत बरेच मागे आहोत. तसेच कॉर्पोरेट हॉस्पिटल ही एक चैरिटेबल ट्रस्ट असते आणि नियमाप्रमाने कॉरपोरेट होस्पिटलची काही बेड गरीब पेशंटसाठी राखीव ठेवावे लागते, पण प्रत्यक्षात हे सर्व कागदावर दाखवले जाते. आज किती कॉर्पोरेट हॉस्पिटल हा नियम पाळतात? दूसरा मुद्दा असा की हॉस्पिटल जरी चैरिटेबल असेल तरी तेथील मेडिकल आणि सर्जीकल स्टोरला हे चैरिटीचे नियम लागू होत नाहीत. आणि हॉस्पिटलच्या एकन्दरीत बिलात मेडिकल, डिस्पोसजेबल, सर्जिकल आणि शेवटी टैक्सचा खुप मोठा वाटा असतो. मग १५ दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन मधे २७७६ हैण्डग्लोज, ६६० सिरिंज वापरले जाते. हे किंवा अशी ओषध आणि सर्जीकल अतिशय घासाघिस करून कमीत कमी दरात मोठ्या फार्मासूटिकल किंवा सर्जीकल कम्पन्याकडून खरेदी केली जातात. त्या मोठ्या खरेदीवर मिळनारी इतर 'स्किम'चा हिशोब लावला तर ज्या ग्लुकोस्ट्रिप साठी ₹200/- हॉस्पिटल चार्ज करतात ती त्यांना फक्त ₹ 13/-ला पड़ते! अशा प्रकारे रुग्णाला चार्ज करताना त्याची किंमत अवाच्या सव्वा लावली जाते. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे पेशंटशी व्यक्तिगत सम्बन्ध नसते किंवा सम्बन्ध ठेवायची गरज नसते. त्यामुळे तो पेशंट गरीब आहे का आमिर याच्याशी त्यांचं काही देणेघेणे नसते. त्यामुळे बऱ्याचदा एकाच पेशन्टला किती तरी वेगवेगळे डॉक्टर बघून बिल वाढवत जातात, नको त्या टेस्ट, इन्वेस्टिगेशन सांगितले जाते आणि कन्झुमेबलच बिल चेपल्या जाते. उदा. एखाद्या पेशंटचा पाय दुखत असेल तर त्यास फिजिशियन,न्यूरो फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन विजिट देत बसतात. मग प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन, इन्वेस्टिगेशन आणि औषधि, कन्झुमेबल यामुळे बिल वाढत जातं. त्यातच पेशंट मेडिक्लेम पॉलिसीधारक असेल तर मग बघायची सोय नाही!

आता मुळ मुद्दा. 18 लाखाच्या या कॉर्पोरेट बिलामधे सर्व खर्च वजा जाता प्रत्येक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टराना फिस म्हणून किती रूपये मिळाले असतील? अर्थात इतर खर्चाच्या तुलनेत ही रक्कम खुपचं कमी असते. मग असे असताना प्रत्यक्ष इलाज करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राची का बदनामी व्हावी? ही फाइव स्टार हॉस्पिटल्स पेशन्टला पद्धतशिर लूटतात आणि बदनामी मात्र डॉक्टर आणि सम्पूर्ण वैद्यकिय क्षेत्राची होते. मग सर्वच डॉक्टरावर टिकेची झोड़ उड़ते. डॉक्टरविरुद्ध विचाराना हवा मिळते. खालच्या पातळीची विशेषणं लावली जातात. डॉक्टरकडून थोड़ी जरी चुक झाली तरी त्याचा 'पराचा कावळा' करण्यात जनता कसर सोडत नाही. मग अशात राजकारणीही मागे कसे राहणार, तेही आपली पोळी भाजुन घेतात. काही दिवसा अगोदर राजकारणी नेत्यांनी मुम्बई-पुण्याच्या डॉक्टरांना अशीच एक 'खळ..खटयानळ' धमकी दिली. 'डॉक्टरांनी पेशंटला वेठीस् धरु नये, गाठ आमच्याशी आहे'. त्यांचा रोख लहान हॉस्पिटल किंवा नर्सिंगहोमवर होता. कदाचित कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा तेथील 'चमत्कारिक बिल' आणि पद्दतशिर लूटीची त्याना कल्पना नसावी. 

मंगलयान, चंद्रयान, राफेल, गगनचुबी उंचच्या उंच पुतळे अशा बाबतीत देशाची प्रगती किंवा दिंडोरे पिटले जात असले तरी आरोग्यासारख्या मूलभूत क्षेत्रात पाहिजे तशी प्रगती देशाने केलेली नाही. आज जगातील सर्व प्रगत राष्ट्रे जीडीपीच्या साधारण ६% खर्च आरोग्यावर करत असताना तर आपला देश जीडीपीचा फक्त १.५% खर्च आरोग्य सेवेवर खर्च करत असतो. त्यातील ५०% रक्कमेचा भ्रष्टाचार वजा करता जीडीपीच्या साधारण ० .७५% रक्कमच आरोग्यावर खर्च होतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आरोग्यसेवेत शासनाचा सहभाग, म्हणजे सरकारी इस्पितळाचा सहभाग फक्त १७% आहे. म्हणजे देशाच ८३% आरोग्य हे खासगी डॉक्टरांच्या सेवेवर अवलंबुन आहे. आणि याचाच फायदा खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट उद्योजक घेत आहेत. कोरोनामुळे शासनाचं हे पितळ उघडं पडलं. देशात ठिकठिकाणी तात्पुरते इस्पितळं सुरु करावी लागत आहेत. आरोग्य क्षेत्रात शासनाचा टक्का वाढला तर आरोग्यावर होणारा जनतेचा खर्च , कॉर्पोरेट हॉस्पिटलची मनमानी कमी होईल.  

आज छोट्या आणि मध्यम स्वरूपच्या हॉस्पिटलमुळेच वैद्यकिय क्षेत्राची पत टिकून आहे जिथे आजही खेड्यापाड्या तील गरीब रुग्णाना कमी दरात सेवा देणारे डॉक्टर सेवाव्रती भावनेने सेवा देत आहेत. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या अशा प्रकारामुळे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कॉर्पोरेटच्या भंपक जाहिराती, त्यांचे रुग्ण ओढण्याचे प्रभावी मार्केटिंग नेटवर्क, तंत्र यामुळे उत्तम सेवा देवूनही त्यांच्याशी स्पर्धा करण्यात त्यांची दमछाक होत आहे. 

स्वतःचे हॉस्पिटल सुरु करायचे म्हन्टल तर योग्य जागा, भाड़े, मेन्टेनेन्स, स्टाफचा पगार, कीचकट शासकीय ना हरकत परवानगी, उपकरणें आणि एव्हड़ सर्व करून मोठ्या हॉस्पिटलसोबत स्पर्धा! या समस्येमुळे उच्चशिक्षित डॉक्टरमण्डली आपल्या देशात व्यवसाय सुरु न करता परदेशी जाणे पसन्द करत आहे. आयटी क्षेत्र किंवा इंजीनियरचे ब्रेनड्रेन आपन समजू शकतो पण उद्या देशाचे उच्चशिक्षित डॉक्टरच बाहेर जात असतील तर ही मोठी समस्या आहे.
आजही 70% गांव आणि तालुका जिल्ह्याचे पेशंटचा भार छोट्या शहरातील नॉन-कॉर्पोरेट आणि छोट्या-मोठ्या सरकारी हॉस्पिटलवर आहे. वैद्यकिय स्टाफ, उपकरणाची कमी आणि इतर मुलभुत सुविधा नसतानाही ते त्यांचे काम ईमानएतबारे करत आहेत. इतर लहान हॉस्पिटलमधे डॉक्टर स्वतः पेशन्टला वैयक्तिक जाणत असल्यामुळे कुठे तरी डॉक्टर-रुग्ण हे नातं टिकून आहे. भविष्यात महाराष्ट्र शासन बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार आहे त्याचा निश्चितच जनतेला होईल.

वाईट प्रवृती इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्य क्षेत्रात असतीलही पण त्यामुळे सरसगट सर्वांनाच दोषी समजणे चुक. थोडक्यात अशी लूट थांबावी म्हणून गरज आहे की अशा मोठ्या हॉस्पिटलसाठी शासनाने एक कठोर नियमावली आखुन द्यावी जेणेकरून रुग्णावर होणारा खर्च कमी होवून जनता बिलामुळे होरपळुन जाणार नाही किंवा कर्जबाजारी होणार नाही, त्यावर एक अंकुश राहील. तसेच शासनाच्या आरोग्य विभाग, मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडिया यानि वेळीच अशा प्रकाराची दखल घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून वैद्यकिय क्षेत्राबद्दल वाढती संभृमता, दुष्प्रचार कमी होईल, पेशंटचा डॉक्टर आणि हॉस्पिटलप्रती विश्वास वाढेल.


© प्रेम जैस्वाल पेडगावकर 9822108775
     ह. मु. औरंगाबाद 
 ( हा लेख नावासह सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)

Monday, 6 April 2026

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

         गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी!

सण-उत्सवाचा निखळ आंनद, मजा ही गावखेड्यात असते, असं म्हंणलं तर वावगं ठरणार नाही. शहरात आपोआपच त्यावर मर्यादा येतात. होळीची गाणी ऐकतांना याची प्रचिती येते. कोणतंही होळीच गाणं हे शहरात चित्रित झालेलं मी तरी बघितलं नाही. किंबहुना 'होळी' खेळायची तर ती गावकऱ्यानीं असं म्हणायला हरकत नाही. कारण शहरी लोकांना अशी 'खुलके होळी' खेळायला 'लुकिंग गूड लुकिंग बॅड'  अशा पुष्कळ मर्यादा असतात. या वरूनच आठवते बालपनीची होळी. 

आमच्या बालपणी पंधरा दिवसापूर्वीच होळीची चाहूल लागायची.  होळीदहनासाठी लाकडं लागायची. वयांनी मोठी आणि थोडी टवाळ मुलं गावातून 'बोंबलत' होळी दहनासाठी चावडीवर लाकडं गोळा करत फिरायची. हल्ली 'बोंब मारने' हा वाक्यप्रचार फक्त पुस्तकात वाचण्यात येतो. मुळात त्याचा उगम किंवा संबंध निश्चितच होळीसी असणार. त्याकाळी आजच्यासारखी गॅस शेगडी प्रकार नव्हता. स्वयंपाकासाठी प्रत्येक घराच्या आवारात गोवऱ्याचा थप्पी आणि फोडलेली लाकडं असायची. कित्येकांच्या घरासमोर एखादं मोठं लाकडाचं खोड असायचं. तसं आमच्याही आवारात खूप लाकडं ठेवलेली असायची. गावभर लाकडासाठी बोंबा मारत फिरणाऱ्या अशा टोळक्याच्या तोंडी खूपच अश्लील वाक्य असायची.  पण गावखेड्याच्या बोलाचालीत त्या 'शिव्या' कायम असायच्या. बऱ्याचदा अशा बोंबलनाऱ्या टोळीच्या मागे मागे आम्ही सुद्धा फिरायचो.  प्रत्येक घरातून हक्कानी लाकडं किंवा गवऱ्या घेतल्या जायच्या. मनाई करणाऱ्याच्या घरासमोर जोर जोरात बोंबा मारल्या जायच्या. मागून मिळत नसेल तर रात्रीत ती आवरातून चोरीने लाकडं पळविली जायची. मग या भितीने बऱ्याचदा लाकडं घरात आणून ठेवली जायची. अशा वेळेस एखाद्याच्या वखर नागराचं किंवा बैलगाडीच्या कामाची लाकडी सामान सरळ होळीत नेल्याचे प्रकार घडायचे. पण त्यामुळे कुठे ही भांडण तंटा झालेला मला आठवत नाही. 

प्रतिष्टीत व्यक्तींच्या समक्ष होळीपूजन आणि दहन व्हायचं. का? माहित नाही पण आमच्या काळी होळीला सुद्धा फटाके फोडले जायचे. सायंकाळी पेटविलेली होळीचा निखारा दुसऱ्या दिवशीपर्यंत असायचा. त्या होळीच्या राखेला खूप महत्व होतं. आमच्या छ संभाजीनगरमध्ये मी कारल्याच्या बिया लावत असतांना आमच्या आईने 'त्या बियाला होळीच्या राखेसोबत लावायचं असतं' असं सांगितलं होतं. बऱ्याचशा आजारासाठी होळीची राख जतन करुन ठेवल्या जायची. हल्ली शहरात होळीनिमित्त साखरेच्या गाठी विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. पण पूर्वी ह्या गाठी खोब्रा, खजूर आणि इतर मेव्यापासून तयार केलेल्या असायच्या. बताशाच्या गोड गाठी हल्ली दिसत नाही. बताश्याच्या गोड गाठीची हार गळ्यात घालून आम्ही ती खात खात खेळायचो.  आता सर्वत्र 'गोड म्हणजे विष' असा अपप्रसार सुरु आहे. होळी म्हणजेच पुरणपोळी हे समीकरण आहे. गावभर ही पुरणपोळीच जेवण व्हायचं.   डायबेटीस किंवा मधुमेह हा शब्द आम्ही ऐकला नव्हता. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी हा शब्द प्रथम ऐकला होता. त्यामुळे एका बैठकीत 'तेरा पुरणपोळ्या' किंवा 'किलोभर बुंदी' फस्त करणाऱ्या बहादरांनासुद्धा 'डायबेटीस' झालेला मी पाहिला नाही!

आम्हाला वेध दुसऱ्या दिवशीच्या धुळवडीचे लागलेले असायचे.  कृत्रिम रंगाचा इतिहास खूप अलीकडंचा. पण हजारो वर्षापासून महत्व असलेल्या होळीसाठीचे रंग मग कुठून यायचे? आमच्या बालपणी होळीच्या काही दिवस आधी आम्ही पळसाच्या लाल फुलापासून रंग तयार करायचो. शेतरानात ही फुलं सहज उपलब्ध व्हायची. भर उन्हात रानाला शोभून दिसणारी ती पळसाची टवटवीत फुलं आम्ही दगडावर वाटून तिच्यापासून रंग तयार करण्याचे प्रयोग आम्ही करायचो. पण शेवटी तो एक असफल प्रयत्न असायच. कारण पाहिजे तसा पक्का रंग त्या फुलापासून तयार होत नसे. 

पूर्वी आमच्या घरी किराणा दुकान होतं. होळी धूळवडीसाठी लहानमोठ्या पिचकाऱ्या आणि रंग विकले जायचे. लहाणाला लहान आणि मोठ्यांना मोठी पिचकारी त्यामुळे आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे असे विचार येत. अगदी बालपणी पिचकारी एकचं प्रकारची असायची. त्याचं प्लास्टिक अगदी तकलादु असायचं तिचं काम क्षणिक असायचं. काही तासात ती क्रॅक व्हायची. कालांतराने फुग्यात रंग भरून मारण्याचा प्रकार सुरु झाला. पण पाण्याची सोयीस्कर होळी तेंव्हा ही होती आणि आजही ती कायम आहे. 

पण गावातील होळीचा खरा रंग गावातील मंडळी 'पूर्णतः रिचार्ज' झाल्यानंतर दिसायचा. होळीसाठी गावकरी आधीपासूनच दारूचा 'इंतजाम' करुन ठेवत. सर्वांना देशी दारू कदाचित परवडत नसावी त्यामुळे गावभर हातभट्टीची दारू उपलब्ध असायची. जसा दिवस चढायचा तसा धूळवडीचा रंग चढत असे. रंगाने पूर्णतः माखलेलं शरीर,  फुल्ल रिचार्जमूळ चालण्याच्या अवस्थेत नसलेले गावकऱ्याचा आजचा रंगढंग, चेहऱ्याचे हावभाव जरा वेगळेच असायचे. कधी न पिणाऱ्याला आज आग्रहाणे  पाजल्यामूळ त्यांची खरी पंचायत व्हायची. विशेष म्हणजे आजच्या दिवशी पुरुष-महिला भेदभाव दूर सारून काही ठराविक महिलासुद्धा या 'रंगात' सामील व्हायच्या. त्या काळी महिलांच मद्यप्राशन हे समाजाला मान्य नव्हतं. आता जेंव्हा शहरातील दारूच्या दुकानात महिलांना दारू विकत घेतांना बघतो तेंव्हा असं वाटतं की समाजातील अनेक बंधने, नियम आणि कायदे हे फक्त गरीब आणि मागास जनतेसाठीच तयार करण्यात आले आहेत. शहरात अशा गोष्टीकडे 'मॉडर्न किंवा चेंज' म्हणून बघितल्या जातं! असो. 

गावातील होळी उत्सव साजरा करण्यात बंजारा समाज अग्रेसर असायचा. किंबहुना 'बंजारा समाजामुळेच गावातील होळीला रंग चढायचा' असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.  लेझीम, डफडा, गाणी आणि अंगीच असलेली नृत्यकला यामुळे त्यांना फक्त बहाना हवा असायचा. 'रिचार्ज' झाल्यानंतर सर्वकाही आपोआप घडत जायचं. नाचत नाचत, झुलत झुलत ही मंडळी आमच्यासमोर 'परफॉर्म'  करायची.  आमचे काका कधी बकेटीत कालवलेला रंग तर कधी बकीटभर पाणी नाचणाऱ्या मंडळीवर ओतून दयायचे. अर्थात नंतर आमच्या दादा(वडील) किंवा काकांकडे दारूची मागणी ठरलेली असायची. दारू दिली नाही ते भांडायचे. त्यातही मजा असायची. लवकर मागणीची पुर्तता केली नाही की बंजारा समाजाचं पथक जोरात सुरु व्हायचे -

'गामेरो लाला बेपारी रंग लायोच कोनी....'

हे अस्सल आणि निखळ मनोरंजन होतं. काही दिखावा नाही की कृत्रिमपणा नाही. लोकं पित असले तरी त्यातही वयोमर्यादा असायची. नशेतही सर्वांचा आदर आणि मानसन्मान राखल्या जायचा. भांडण सुद्धा व्हायची पण गावातच ती मिटविली जायची. 'तशव्या' हा शब्द मी आमच्या वडिलांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकायचो. त्या शब्दाचा अर्थ मी वयस्कर झाल्यानंतर मला कळाला. गावातील मोहनसिंग ठाकूरकाका, बाबुसिंग ठाकूरकाका, हिरामण पटेलकाका,  किसन आमरू राठोडकाका, गनाजी गव्हाळेमामा , सरपंच, पाटील आमचे वडील आणि अशी बरीचशी प्रतिष्टीत मंडळी गावातील भांडण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याआधीच मिटवून टाकत असत. शब्दाला मान तर मोठयाचा सन्मान असायचा. बासंबा सर्कलमध्ये कदाचित पेडगाव हे मोठं गाव असावं.  त्यामुळे जत्रा, पोळा असो की धूळवड, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावात नेहमी पोलीस बंदोबस्त असायचा. किमान एक तरी पोलीस गावात फिरत असे.  शेवटी तो ही माणूसच, बऱ्याचदा धूळवडीच्या रंगात तो सुद्धा 'रंगून' जायचा!

अशीच एक धूळवड मला आठवते. गावात नुकतच विजेचं काम चालू होतं. पेडगावच्या मार्गावर इलेक्ट्रिकचे पोल रोवण्याचं आणि तार ओढण्याचं काम चालू होतं. विजेच्या पोल आणि इतर सामानाच्या रंगरंगोटीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चमचम चमकणारा रंग आणून ठेवला होता. एका धूळवडीमध्ये पारंपारिक रंग फिके पडून गावभर हाच रंगाचा वापर झाला होता. विशेष म्हणजे त्या दिवशी बासंबा पोलीस स्टेशनचे कडक जमादार 'बेग' बंदोबस्तासाठी आले होते.  मला आठवतं, त्यांनी बंदोबस्त प्रकार बाजूला सारून त्यादिवशी पुढाकार घेऊन गावातील सर्व लोकांना चमकीचा रंग लावला होता. दुपार होता होता संपूर्ण गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर ती चमकी दिसत होती. 

कुठे गेले ते दिवस? बदल कायम होतात आणि या पुढेही ते होत राहणार. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण जो निखळ आणि असल आनंद आम्ही खिशात खडकू नसतांनासुद्धा आम्ही आमच्या बालपणी अनुभवला तो आता नाही.   असं म्हणतात,' जसं जशी आर्थिक परिस्थिती संपन्न होत जाते तस तसा तुमचा आनंद महाग होत जातो'. हल्ली गावातून शहरात आलेली श्रीमंत मंडळी या आनंदापासून वंचित आहे. आनंदासाठी ती दूर वरची मोठी ठिकाण ती शोधत असतात. इतर ठिकाणी पर्यटन केल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही.  पण तिथल्या मुंग्यासारख्या गर्दीत त्यांना हवा असलेला आनंद मिळतोच असं नाही! विशेष म्हणजे आता हिच लागन गावाकडील लोकांमध्ये सुद्धा होत आहे. 

आज ती लोकं नाहीत, तो रंग नाही, ती रंगत नाही.  गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी, आठवणी!!


©प्रेमकुमार जैस्वाल (पेडगावकर)

Monday, 30 March 2026

कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा वाली कोण ?






'सक्सेस हॅज मेनी फादर, फेल्युर इज अल्व्वेज ओर्फन'


भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी नाही. पूर्वी परीक्षा म्हंटल तर दहावी किंवा बारावी बोर्डाची, आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षेला अनन्यसाधारण महत्व होत आणि एक वलय होता. जसजसे शिक्षण क्षेत्रात बदल होत गेले आणि स्पर्धा वाढली तसे नवनव्या परीक्षेचा जन्म झाला. हल्ली दहावी, बारावी बोर्डाव्यतिरिक्त दहावी शिष्यवृत्ती, एनटीएसई, केव्हीपीआय, आरएमओ तसेच बारावीत एमएच-सीईटी, जेईई-मेन, जेईई-ऍडव्हान्स, बिटसॅट, नीट, जीपमार नाटासारख्या अनेक देशपातळीवरील स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता काही वर्षा आधीपासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात. काही अपवाद सोडले, तर या परीक्षेचा अभ्यास स्वतः हुन करणे विध्यार्थ्यांना जमत नाही म्हणून विध्यार्थी या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतात.

पूर्वी शाळेत शिक्षकांना एखादा विध्यार्थी एखाद्या विषयात कमजोर वाटला तर त्याकाळचे 'गुरुजी' त्याकडे खास लक्ष देऊन शाळेतच वेगळा वेळ देऊन शिकवायचे. ह्या मागील शिक्षकाचा हेतू खूप प्रामाणिक होता. काही शिक्षक शाळेतच 'एक्स्ट्रा क्लास' घेऊन काही कमजोर विध्यार्थ्याचा विषय पक्का करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे. कालांतराने शाळेच्या वेळापत्रकात हे बसत नसल्यामुले शिक्षकांनी घरी क्लास घ्यायला सुरुवात केली. यातच अर्थकारण येऊन त्याचे रूपांतर पुढे 'ट्युशन क्लास' आणि नंतर भरमसाठ फी घेणाऱ्या 'कोचिंग क्लास' मध्ये झाले. सुरुवातीच्या काळात ट्युशनच्या 'कुबड्या' घेऊन चालणारा विध्यार्थी म्हणजे 'ढ' समजल्या जायचा. पण कालांतराने कमी मार्क मिळण्याची भिती तसेच शालेय शिक्षकाच्या हातातील 'हातचे मार्क' या भितीने सर्वच विध्यार्थ्याने कोचिंग लावायला सुरुवात केली आणि हे क्षेत्र भरभराटीस आलं.


आज मूलं जन्मल्यापासून दहावी, बारावी, सर्व पदव्यासहीत सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोचिंग क्लास आपल्या जवळपास उपलब्ध आहेत. आपण रोज हया फोटो-जाहिराती वृत्तपत्रात बघतच असतो. जाहिरातीचा भरणा असलेल्या वर्तमानपत्रात अर्ध्याहुन जास्त जाहिराती ह्या कोचिंग क्लासेसच्या असतात. कधी कधी वाटते कि यास वृत्तमानपत्र म्हणावं कि जाहिरातपत्र! इतर संस्थेप्रमाणे वर्तमानपत्रालाही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पीटीआय ने आखून दिलेली एक नियमावली आहे पण पैशाच्या बाजारात पीटीआयच्या नियमाला बगल देऊन सरळसरळ मोठमोठ्या जाहिराती पुढच्या पानावर छापल्या जातात. वेळप्रसंगी मुख्य बातमीला बाजूला किंवा छोटी बनवून, जॅकेट चढवून जाहीराती छापल्या जातात. संपूर्ण जगाला अक्कलेच डोज पाजणारा वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला स्वतःची नियमावली पाळणे मात्र जमत नाही, असो.


मूळ मुद्दा असा की आज कोणत्याही क्लासेसच्या जाहिरातीकडे जर आपण पाहिल तर लक्षात येईल कि त्यात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच छायाचित्र छापलेले आपल्याला दिसतील, का ? जर जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचेच फोटो आणि सत्कार होत असतील तर कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ते आपल्या जीवनात काहीच चांगलं करणार नाहीत का ? त्यांचा वाली कोण ? का एखादे कोचिंगक्लासवाले हे सांगत नाही की आमच्या कडे हे अमुक अमुक विध्यार्थी होते पण त्यांना हि परीक्षा काही जमली नाही पण ते इतर क्षेत्रात खूपकाही चांगले काम करू शकतात. काही वर्षापूर्वी आपल्याकडील वृत्तपत्रात फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच फोटो छापले जायचे. त्यांची मुलाखत घेतली जायची. त्यामुळे इतर विध्यार्थ्याचे खच्चीकरणं व्हायचे. विध्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन नैराश्य, आत्महत्यासारखे प्रकार घडत असत. असे होऊ नये म्हणून शासनाने मेरिटलिस्ट छापण्यावरच बंदी आणली. आज कोणत्याही वृत्तपत्रात दहावी किंवा बारावीची मेरिटलीस्ट छापली जात नाही.


इतिहासातील धडे शिकूनच आपण वर्तमानातील वाटचाल करत असतो. मायक्रोसॉफ्टचे बिलगेटस् हे इतर विध्यार्थ्याप्रमाणे हुशार नव्हते पण आज जगातील सर्वोच्च विध्यापीठातील गुणवंत त्यांच्यासोबत काम करत आहेत. क्रिकेटचा सम्राट भारतरत्न सचिन तेंडुलकर इयत्ता आठवीत नापास झाला होता. सैराट सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे नागराज मंजुळे विपरीत परिस्थितीत लहानाचे मोठे झाले, दहावीत नापास झाले. अर्थात त्या काळच्या शाळा किंवा कोचिंग क्लासने बिलगेटस, सचिन आणि नागराज मंजुळे सारख्यांचे फोटो छापले नसतील, हार-तुरे देऊन सत्कार केला नसेल पण आज ही लोक यशाच्या एव्हडया उच्च शिखरावर पोहचली आहे की त्यांचा साधा ऑटोग्राफ मिळणे कठीण आहे. कदाचित चांगले १०० पैकी १०० गुण मिळवनारे 'परीक्षार्थी' बनण्यात ते नापास झाले असतील पण आज आवडीच्या क्षेत्रातील चांगले विद्यार्थी होऊन त्यांनी यश गाठलं आहे.


मुळात शासनमान्य शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंगक्लास याच्या शिकवणीची पद्धत समजण्यात पालक गल्लत करतात. खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शाळा-महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांच्या वर्गातील तळागाळातील विध्यार्थ्याकडेसुद्धा तेव्हढेच लक्ष देतात जेव्हढे लक्ष ते हुशार विध्यार्थ्याकडे देत असतात. शिक्षकांची ही प्रामाणिक इच्छा आणि जिद्द असते की त्यांनी शिकवलेला विषय हा वर्गातील सर्व स्तरावरील विध्यार्थ्यांना समजावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे. कोणी एकच विध्यार्थी मेरिटमध्ये आणणे असा ' फोटो-जाहिरात आणि मार्केटिंग' वाला हेतू त्यांचा नसतो. थोडक्यात जो विध्यार्थी बसलेला आहे त्याने उठून चालण्यासाठी तयार करणे, जो चालत आहे त्याची गती वाढवणे आणि जो गतीने चालत आहे त्याची गती वाढवणे असा शुद्ध हेतू असतो. त्यामुळे शाळेत एकूण सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. आणि कदाचित अधोगती झाली तरी शालेय शिक्षक तो आमचाच विध्यार्थी आहे असं म्हणायला लाजत नाही.


या उलट कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाच सर्व लक्ष हे पुढील बाकावर बसलेल्या दोन-तीन रांगेपर्यंत मर्यादित असत. कारण या रांगेमधील विद्यार्थीच पुढे क्लासेसला 'रँक' देणारे असतात आणि त्यांचेच 'फोटो' क्लासेसच्या बिजनेसच्या जाहिरातीसाठी उपयुक्त असतात. कोचिंग शिक्षकाचा पगारही त्या रँकनुसार वाढत असतो. हया पुढील बाकावरील हुशार विध्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासच्या शिक्षकाच्या डोक्याला ताप नसतात, आणि त्यांना व्यवस्थित शिकवणे, शँका निरसरन करणे त्यांना भाग असते. या उलट मागील बाकावरील विध्यार्थी ज्यांचा विषय खूप कच्चा असतो असे विद्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासेस शिक्षकांसाठी ताप असतात. अशा विध्यर्थ्याच्या खालच्या पातळीवर येऊन शिकवण्याइतका संयम सर्व क्लासेस शिक्षकात नसतो. त्यामुळे ते वाऱ्यावर सोडले जातात. अशा पद्धतीत पुढचे विध्यार्थी खूप पुढे जातात आणि मागचे खूप मागे. थोडक्यात पुढील बाकावरील विध्यार्थी म्हणजे लग्नातील 'मानकरी' सारखे असतात त्यांना दुःखवून चालत नाही. काही पुढील बाकावरील विध्यार्थी वगळता मागच्या विद्यार्थ्यांच्या फोटोची क्लासेसला गरज नसते. मग एकूण जेईईसाठी कोचिंग घेणारे २५०० विध्यार्थी आणि पात्र मात्र १५ असे प्रकार घडतात, मग उरलेल्या २४८५ विद्यार्थ्यांनी काय करावं एव्हढ साधं मार्गदर्शनही कोचिंगवाले करत नाहीत.


मग आपल्या जाहिरातीत जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विध्यार्थ्याचे फोटो दिसावे म्हणून बरेच क्लासेसवाले वेगवेगळे उद्योग करत असतात. वेळप्रसंगी इतर क्लासेसच्या विध्यार्थ्यांना लाखो-करोडो रुपयाची ऑफर देऊन फोटो घेतले जातात. हा आमदार-खासदार फोडण्याचाच प्रकार असतो. किंवा बळेच मोठा धनादेश, हारतुरे आणि पेढे देऊन फोटो काढून घेतले जातात, असे अनेक प्रकार अलीकडे घडत आहेत. 'रँक विकण्याचा घोडेबाजार' कोटासारख्या कोचिंगक्लासच्या पंढरीस नवीन नाही. एकंदरीत पैशाच्या या खेळात सर्वांकडून पैसे उकळून फक्त काही विध्यार्थ्याच भलं होत असताना दिसत आहे. उदाहरण दयायच असल्यास, संपूर्ण भारतात जेईई परीक्षेमध्ये उत्तीर्ण विध्यार्त्याची एकूण संख्या ३९०० असेल तर या तुलनेत भारतातील सर्व कोचिंगच्या उत्तीर्ण विध्यार्थ्याच्या फोटो-संख्येची बेरीज हि ७००० पेक्षा जास्त असणार, कारण एकाच विद्यार्थ्यांचे फोटो आपल्याला विविध क्लासेसच्या जाहिरातीत तसेच होर्डिंगवर बघायला मिळतात. थोडक्यात म्हणायचे तर -

सक्सेस हॅज मेनी फादर
फेल्युर इज अल्वेज ओर्फन


एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवणे ही शासनाची जबाबदारी आहे. कालच वृत्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंत्र्यांनी ११वी, १२वी विज्ञानशाखेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती आवश्यक केली आहे. 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे उशिरा का होत नाही पण हा एक आशेचा किरण दिसत आहे. कारण त्यामुळे सर्वसाधारण तसेच तळागाळातील विद्यार्थ्याला फायदाच होईल. कारण कोचिंग क्लासेसची फी सर्वांना परवडणारी नसते. मुलांसाठी वाटेल ते करणारे पालक वेळप्रसंगी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून कर्ज काढतात आणि त्यांच्या हाती काही लागत नाही. महाविद्यालयातच दर्जेदार शिक्षण मिळाल्यास गरीब आणि सर्वांचा फायदाच होईल. 'गुरु' म्हणजे काय, त्यांची शिकवण्याची पद्धत माहित पडेल. महाविद्यालयातील फक्त शिक्षण नाही तर महाविध्यालयीन वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार होतील जे आज होताना दिसत नाहीत. वार्षिक स्नेहसम्मेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांचं व्यक्तिमत्वही उजळेल. थोडक्यात फक्त हुशार मुलांचा कोचिंग क्लासचा बाजार कमी होईल.


फक्त गरज आहे सरकारी आदेश तंतोतंत लागू होण्याची. कारण आपल्याकडे पळवाट शोधणाऱ्या हुशार 'बिरबल' ची कमी नाही. उद्या चक्क महाविद्यालयातील बायोमेट्रिकच रिमोटने कोचिंग क्लासेसला जोडलेली आढळल्यास आश्चर्य वाटू नये. दिवसातून तीन वेळेसची बायोमॅट्रिक आवश्यक केल्यास त्यास संस्थाचालकापासून सर्वच स्तरातुन विरोध होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांशी सोयरसुतक नसलेल्या शिक्षकाचे श्रम वाढतील. मागील कितीतरी वर्षांपासून एकाच रुळावर चालणारी गाडी जेंव्हा पटरी बदलेल तेंव्हा थोडा खडखडाट होणे साहजिक आहे. त्यातल्या त्यात श्रीमंत पालक जे आपले पाल्य कोटासारख्या इतर ठिकाणी कोचिंगसाठी ठेवतात त्यांचाही या बदलास विरोध होईल, क्लासेसवाल्यांचीही वेळेची थोडी सर्कस होईल. पण महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने इमानेइतबारे शिकवल्यास सर्वच विषयाची कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही आणि खरोखरच विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. पण हा बदल होणे आवश्यक आहे.


शिक्षणातील ह्या बाबीस फक्त शासनास जबाबदार धरणे चूक होईल, पालकही तेव्हढेच जबाबदार आहेत. त्यांनाही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी इतर मुलांचे अनुकरण न करता वेगळी शाखा, क्षेत्र निवडावे कारण प्रत्येकाचा पालकाचा पाल्यामध्ये एक वेगळा टेलेन्ट असतोच. जाहिरातीतील मेरिटचे फोटो आणि आमिषाचा गळाला लागून पालक आणि विद्यार्थी नको ते क्लास लावतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती न होता आर्थिक नुकसान होते. गरज आहे त्यांनी आपल्या मुलांचा वेळीच कल ओळखण्याची आणि मेरिटचा अट्टाहास न करता पाल्याची एकूण खरी प्रगती ज्या क्षेत्रात होऊ शकते तेच क्षेत्र निवडण्याची आणि त्याच क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यास त्यास मदत करण्याची.

©
प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह.मु. औरंगाबाद ९८२२१०८७७५

एडिट

एडिट 


सोबतचा फोटो एडिट केलेला आहे. पहिला कृष्ण-धवल तर दुसरा रंगीन! हल्ली फोटो एडिट करणं म्हणजे 'बायें हाथ का खेल'. हात कशाला लागतं, ऐआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला फक्त आदेश (प्रोम्प्ट) द्या आणि पाहिजे तसा फोटो एडिट करुन घ्या. एव्हढंच काय फोटो नसतांनासुद्धा फक्त एखाद्या व्यक्तीच सविस्तर वर्णन दया हा अल्लाउदीनचा जादूई चिराग तुम्हाला वाटेल तशा इमेजेस बनवून देतो. त्या फोटोला बोलता करतो. साजेसा आवाज देतो आणि बरंच काही. प्रत्येक आऊटपुटनंतर स्वतःहून ' जहाँपनां, अजुन काही चांगले बदल हवेत का?' असंही विचारतो. 'देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी' सारखं होऊन जातं. 

सोबतचा फोटो १९८१ चा आहे. त्याकाळी फोटो प्रकार दुर्मिळ होता. तालुक्याच्या ठिकाणी एखादं फोटो स्टुडिओ असायचं. १९७५ पर्यंत शाळेतील प्रवेशासाठी पासपोर्ट अट नव्हती कारण फोटो हा प्रकार तेव्हढा चलनात नव्हता. पण मी आठवीत म्हणजे १९८१ मध्ये झेडपी मध्ये प्रथमचं प्रवेश अर्जाला फोटो लागत होता. त्यामुळे आपण फोटो काढणार हा आनंद. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाप्रमाणे सुरुवातीला कलर फोटोग्राफी हा प्रकार नव्हता. पण ठराविक फोटोग्राफरकडे दोन रुपये जास्त देऊन ब्लॅक अँड व्हाईट फोटोला 'एडिट' करुन रंगीन करुन देण्याची सोय मात्र होती. फोटोग्राफर सरळ सरळ त्या फोटोवर ब्रशने रंग चढवून त्याचा रंगीत फोटो तयार करायचे. शरीराला स्किन कलर, केसांना काळा तर कपड्यांना पाहिजे तो कलर देऊन मोकळे! मग असा रंगीन फोटो घेऊन आम्ही मिरवायचो. थोडक्यात एडिट हा प्रकार पूर्वी सुद्धा होता. एडिटचे जसे फायदे तसे नुकसान सुद्धा.  पेशवे इतिहासातील 'ध' चा 'मा' हा आनंदीबाईने केलेला एक एडिट सर्वांनी वाचला असेन ज्यामूळे नारायणराव पेशव्याचा खून झाला. 

इतर क्षेत्राप्रमाणे फोटोग्राफी मध्ये सतत बदल होत गेले. गाव-खेड्यात असूनही आमच्या घरी वर्ष १९७५ मध्ये 'अगफा' कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. नंतर त्या कॅमेराचे रोल मिळत नव्हते म्हणून तो पडीत झाला. त्याकाळी कॅमेराचे रोल अगदी अंधारात कॅमेऱ्यामध्ये फिट केल्या जायचे. फोटो काढून झालेले रोल(निगेटिव्ह), एखाद्या स्टुडिओमध्ये धुवून मिळायचे, म्हणजे पॉसिटीव्ह फोटो मिळायचे. काही फोटो वाया जायचे. रोल महाग असल्यामुळे फोटो काढतानाच खूप काळजीपूर्वक शॉट घेतल्या जायचा. काही वर्षानी रंगीन फोटो घेण्याची सोय झाली. फ्लॅश हा प्रकार खूप नंतर आला. 

आजच्यासारखं प्रत्येक शासकीय कामासाठी त्याकाळी फोटोची गरज नव्हती. शहरातील जत्रेत फोटोवाल्याचा स्टॉल असायचा. त्याच्याकडे छान 'बॅकग्राउंड' साठी काही रंगबिरंगी पडदे किंवा एका उघड्या कारची प्रतिकृती असायची. त्या प्रतिकृतीमागे बेंचवर बसलेल्या व्यक्ती उघड्या कारमध्ये बसल्यासारख्या भासायच्या. सर्वच भन्नाट! असे ब्लॅक अँड व्हाईट लाकडी फ्रेममध्ये मढविलेले लहान आकाराचे फोटो आजही एखाद्या मातीच्या जुन्या घराच्या भिंतीवर टांगलेले नजरी पडतात.

मला आठवतं. मी बारावी इयतेत शिकत असतांना छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील स.भू. महाविद्यालयाच्या स्नेह-संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते परीक्षित सहानी (3इडियट, फरहानचा बाप) आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर त्यांना आमच्या हॉस्टेलचे रेकटर डॉ बोरीकर सर हॉस्टेलला घेऊन आलेत. मग सर्व हॉस्टेलमधील विध्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढला. आमचा तो ग्रुपफोटो घेण्यासाठी त्याकाळी कॅमेऱ्यामनने तो कॅमेरा एका मोठ्या पडदयाने झाकला होता. असा मोठा कॅमेरा मी पहिल्यांदाच बघितला होता. 

डिजिटल क्रांतीनंतर फोटोग्राफीमध्ये बदल घडले. रील प्रकार बंद होऊन डिजिटल कॅमेरे अवतरले. रिल्सची जागा मेमरीकार्डने घेतली. एक्सट्रा मेमरीकार्ड वापरून हजारो फोटो, शूटिंग घेण्याची सोय झाली. पूर्वी फोटोसोबत फोटोग्राफर रिल्सचे नेगेटिव्ह परत करायचे. त्या निगेटिव्हवरून परत फोटो काढले जायचे. आता हा प्रकार बंद झाला. पूर्वी जत्रेच्या खेळणीत छोटे कॅमेरा विकत मिळायचा. या कॅमेऱ्याच्या पुढे चित्रपटाच्या छोटया नेगेटिव्हची फिल्म लावून बघण्याची सोय असायची. कॅमेऱ्यासोबत काही निगेटिव्ह फ्री मिळायच्या. जत्रेत हा हमखास विकला जाणारी खेळणी होती. पुढे पुढे या कॅमेऱ्यामध्ये दोन फिल्म बघण्याची सोय झाली. 

हल्ली फोटो व्हिडीओ तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली. प्रत्येक मोबाईल धारक फोटोग्राफर झाला आहे. पाहिजे तसा सुंदर फोटो तो काढू शकतो. रोज डीपी बदलू शकतो.ऐआयच्या मदतीने पाहिजे त्या ठिकाणी स्वतःचा फोटो काढू शकतो. अगदी अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प महोदयासोबतसुद्धा! सेल्फी, टाईमर लावून फोटो घेऊ शकता. टीबी मेमरीमध्ये हजारो व्हिडीओ सेव्ह करण्याची सोय झाली. पण आता हे सर्व क्षणिक वाटतं. काढलेले फोटोज, व्हिडीओ मेमरी स्वरूपात सेव्ह होतात. नंतर त्याला कुणी बघत नाही. किंवा त्याचं अप्रूप नसतं. एक गोष्ट मात्र नक्की. एव्हढ सर्व डिजिटल आणि सहज सर्व गोष्टी उपलब्ध असूनही कोणत्याच व्यक्तिकडे स्वतःचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो मात्र उपलब्ध नसतात!

©प्रेमकुमार जैस्वाल 
9822108775

हिंदी-उर्दू: दो बहनोकी बात



अब तो यह रिवाज सा बन गया है के हिन्दुस्तान के पार्लमेन्ट में जब भी कोई मंत्री या एमपी, फिर वह किसी भी पार्टी के क्यों न हो अपनी बात रखते है तो बात बात में एक शेर जरूर सुनाते है। असल बात यह कि किसी भी बात या मुददो का वजन बढाने के लिए शेर की सहायता जरुरी ली जाती है l इतना ही नही श्रोताओ का दिल जीतने के कई सभा-सम्मेलन में अपने भाषण में नेता या वक्ता एक शेर जरूर सुनाते है और लोगों का दिल जीत लेते है। और ये दिल जितने वाले शेर अक्सर उर्दू भाषा में  हि लिखे होते है। एक सर्वे के मुताबिक हिन्दुस्तान के पार्लमेंट में आज तक जितने भी शेर सुनाए गये वो तकरीबन ९०% उर्दू में थे।


जी हां, हम बात हिंदी-उर्दू भाषा की कर रहे है। जो दो सग्गी बहने है। हम सब एक बडी गलत फ़हमी है के उर्दू हमारी नहीं बल्की पडोसी मुल्क की भाषा है। हालांकि यह सरासर गलत है, झूठ है। इस में लोंगों की कोई गलती नही क्यों कि हिन्दू लोग उर्दू को मुश्किल और मुस्लिम की भाषा समझकर बोलने से परहेज रखते आये है । 'रिलिजियस पॉलिटिक्स' ने इस भाषाका बटवारा कर दिया हैं । हालांकी हिंदी में उर्दू इस तरह घुली है जैसे दूध में शक्कर जिन्हे एक दुसरे से १००% अलग करना मुश्किल है l शब्दो का परहेज कर के आप ना तो 'शुद्ध हिंदी' बात कर सकते ना 'शुद्ध उर्दू!' और हिंदी में सिर्फ उर्दू नहीं बल्की पारसी, अफगाणि, गुजराती, कनडा, पोर्तुगीज और अंग्रेजी शब्द भी घुलमील गये है l 


हालांकि कोई भी भाषा 'रिजनल' होती है 'रिलिजनल' नही । जैसे पंजाब की पंजाबी, तमिलनाडु की तमिल, गुजरातकी गुजराथी, कर्नाटक की कन्नडी। कहने का मतलब जो मुस्लिम पंजाब में रहते है वो पंजाबी बोलते है। जो गुजरात में रहते है वो गुजराती बोलते है। जो तमिलनाडु में रहते है वो तमिल बोलते है। इस हिसाब से उर्दू को मुस्लिम समाज की भाषा कहना बहोत गलत होगा। वैसे शुरु से उर्दू नॉन-रिलीजस भाषा रही है।


आज लोग भले ही उर्दू भाषा बोलने मे परहेज करते होंगे लेकिन यही उर्दू के शेर, नज्म या शायरी आप जब गुलजार(संपूर्ण सिंग कालरा) के गीतों में, अमिताभ बच्चन (असली नाम इन्कलाब श्रीवास्तव) के डायलोग मे या फिर लता मंगेशकर के गीतों में सुनते तो बड़ा मजा आता है। आप यह समझ ले कि हिंदी-उर्दू सग्गी बहने-बहने है। हिंदी मां है तो उर्दू मौसी। हिंदी नग्मे तभी अच्छे लगते है जब उन्हें उर्दू की झालर लगाई जाती है। जो भी बॉलीवुड की फिल्में हिट हुयी उसका बड़ा श्रेय उर्दू को जाता है। हिंदी फिल्में नयी हो या पुरानी उसके संवाद और गीत उर्दू शब्द के बगैर आप सोच भी नही सकते। इश्क, मोहब्बत, सनम,मेहबूब, जुल्फे, गेसू, दास्ताँ, जमीन, हुजूर,झील,कयामत,मजबूर,सर्द, आरजू, फिझा, जिस्म और ऐसे कई हजार शब्द होंगे जो अक्सर उर्दू से लिये गये। हिंदी फिल्मों के कलाकार फिर वो दिलीप कुमार, प्राण, राजेश खन्ना, राजकपूर, बलराज साहनी, परीक्षित साहनी, देवानन्द,अमिताभ हो या मीना कुमारी, वहीदा रहमान, हेमा मालिनी, नूतन जैसी अभिनेत्रीयाँ इन सभी को कामयाब और मशहूर बनाने में उर्दू का बड़ा हाथ है। इतना ही नही फिल्में हिट होने में गीतों का बड़ा योगदान होता है इसलिये उर्दू के सही उच्चारन के लिए महान गायिका लता दीदी ने भी उर्दू सिखी थी। आज हम सिर्फ हिंदी नही बल्कि मराठी में भी उर्दू के कई शब्दों का इस्तेमाल करते है। एक ऎसा भी दौर था जब मशहूर होने के लिए हिंदी शायर खुद अपना नाम भी बदल देते थे l उदाहरन : गुलजार, फिराख गोरखपुरी, मनोज मुंतशीर, नाजीर बनारसी ऐसे कई हिंदी शायर उर्दू नाम धारन करने के बाद मशहूर हुये l 


वैसे उर्दू की पैदास हिन्दुस्तान मे ही हुयी है। कहा जाता है के जब मुगलो का आक्रमण हुवा उस वक्त फ़ारसी का ज्यादा चलन था। जब मुगल शासक आये तब उनके साथ साथ फ़ारसी, अरेबिक और तुर्की यह सब भाषा भारत मे आयी। इन भाषाओं का जब दिल्ली के ब्रज या खड़ी बोली के साथ मिश्रण हुवा तो नयी भाषा का जन्म हुवा। दिल्ली मे जब फारशी शासक के सेनाने शेकडो वर्ष तक डेरा लगाया था तब कुछ सैनिको की भाषा पारसी,कुछ अरेबिक और कुछ तुर्की थी। फिर उनकी भाषा को संबंध दिल्ली के खड़ी बोलि बोलने वाले लोगों से हुवा। आपस के इस बोलि भाषा को 'ओरडु'(सैनिक की भाषा) ऎसा नाम दिया गया l १७८० से पहले उर्दू को रेक्ता, रेक्ती, हिंदवी कहा जाता था और बाद में 'उर्दू' ऐसा नामकरण हुवा। १८ वे सदी तक उर्दू और हिंदीमे बिल्कुल भी फर्क नही था। हालाँकि उर्दू यह शब्द तुर्की से लिया गया। कई किताबें पारसी,तुर्की और अरेबिक मे लिखी गयी। चूँकि उर्दू बादमें बोलि भाषा बन गयी वह तेजी से आगे बढि, बहते गयी और आगे बढी और बाकी भाषाएँ पीछे रह गयी। जब आप कोई भाषामें सिर्फ लिखते हो तो वह 'स्टैटिक' बनती है या थमसी जाती है। लेकिन वही भाषा जब बोली भाषा बनती है तो वह बहाव के साथ 'डायनामिक' बन जाती है। उर्दू के साथ यही हुवा, वह जोरसे बहती चली गयी। बाद में महान कवि आमिर खुसरों ने उसे नये मुकामपर पहुंचाया। उर्दू मे कई शब्द दिल्ली के हिंदी खड़ी बोलीसे लिए गये। दोनों भाषा का व्याकरन एक जैसा है। हिंदी और उर्दू एक दुसरे के इतने करीब है के जब आप हिंदी बोलते हो हो उसमें कई शब्द उर्दू के होते है और आप जब उर्दू बात करते हो तो पच्चास प्रतिशत सेभी ज्यादा शब्द हिंदी होते है। जब हिंदी के शब्द पढने में दिक्कत होती है तो हम सोचते है 'कहीं ये उर्दू शब्द तो नहीं?' इसलिये हिंदी फिल्में नयी हो या पुराणी उसके संवाद और गीत उर्दूके बगैर अधूरे है। आज भारत के ५ स्टेट में उर्दू को राजभाषा का दर्जा है जैसे हैदराबाद, यूपी, बिहार, झारखंड और जम्मू-कश्मीर। आज भारतके कुछ दक्षिण इलाखों में बहोत ही शुद्ध उर्दू बोली जाती है। चूँकि दक्षिणमे तेलगु, कनडा, मलयालम और तमिल जैसे भाषा का ज्यादा प्रभाव है, उर्दू मे कई लोकल शब्द शामिल हुए है।


यह कहना भी सरासर गलत होगा के उर्दू पाकिस्तानी भाषा है। क्योंकि वहाँ उर्दू कम और बाकि भाषाऐ जैसे के बलूची, कश्मीरी, पाशतु, अरबी इ ज्यादा बोली जाती है।उर्दू जबान को १० करोड़ पूर्व पाकिस्तानी मुस्लिम याने आज के 'बांग्लादेश'  ने भी कभी नही अपनाया फिर वो पाकिस्तानी भाषा कैसे हो सकती है? पुरब पाकिस्तान याने आज के बांगलादेश की भाषा बांगला है, उर्दू नहीं l पाकिस्तान से जादा हिन्दुस्तान मे उर्दू बोली जाती है। हिन्दुस्तानमे ५ करोड़ तो पाकिस्तान में सिर्फ 1.25 करोड़ जनता उर्दू बोलती है। 'मोहाजिर' याने बटवारे के वक्त जीन मुस्लिमों को यूपी, पंजाब,हरियाणा, कश्मीर और दिल्ली जैसे ईलाखो से पाकिस्तान जाना पड़ा सिर्फ वही मुस्लिम उर्दू भाषा का इस्तेमाल करते है।। 'हम अलग तो हमारी भाषा भी कुछ अलग होना चाहिये' इसलिये पाकिस्तान ने भले ही उर्दू को राष्ट्रीय भाषा का दर्जा दिया हो लेकिन वो सरासर गलत है क्योंकि वहाँ बोलि भाषा मे उर्दू 'दूसरे स्थान' पर है।


दिलचस्व बात यह है कि १८वे सदि तक सिर्फ और सिर्फ अच्छे जानकार हि इन भाषाको पढ़ और समझ सकते थे। १९वे सदि मे ये दोनों भाषाएँ बहोत विकसित हुई। हिंदी को आगे बढाने मे मुंशी प्रेमचंद, संत कालिदास्, संत तुलसीदास, संत सूरदास और सन्त कबीर जैसे महान संत और साहित्य लेखक का बहोत बड़ा योगदान रहा। आज संपूर्णसिंग कालरा (गुलजार), रघुपति सहाय (फ़िराक़ गोरखबादी), रामप्रसाद बिस्मिल और महाराजा चंदूलाल जैसे गैर-मुस्लीम लेखक या कवि भी है जिन का उर्दूको आगे बढानेमे बढ़ा सहयोग रहा है।


भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग का जन्म अब के पाकिस्तान में हुवा था। बहोत कम लोग यह जानते है के उनकी शिक्षा उर्दू में हुई। जब वो प्रधान मंत्री बने तब ६० बरस के  रिवाज के मुताबिक उन्हें हिंदी मे भाषण देना जरूरी था। उन्होंने कुल ४८ मिनट भाषण दिया लेकिन बहोत कम लोग यह जानते है के उस भाषण की स्क्रिप्ट उर्दू भाषा में लिखी गयी थी ! क्योंकि डॉ. मनमोहन सिंग को उर्दू पढ़ना ज्यादा आसान लगता है।उर्दू का बहोत सा साहित्य पंजाब से आया है। विशेष बात यह कि उर्दू के कई शायर-लेखक पंजाब से आये है।


सिर्फ सियासत के लिए भाषा को बाटा जाता है l इसलिये जब कोई अगली बार आप से उर्दू में कुछ कहे या कुछ लिखे तो गलतफहमी में ना रहे, क्यों कि वह भी हमारी याने हिन्दुस्तान में पैदा हुई भाषा हैं l सिर्फ मुस्लिम समाज या किसी और देश की तो कतई नही।

तभी तो 
उर्दू के मशहूर शायर मुनावर राणा ने एक शेर में सही कहा, 

'लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है,
मैं उर्दूमें गझल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है।'




© प्रेमकुमार जैस्वाल
(आप यह लेख नाम के साथ शेअर कर सकते है। )