ad1

Monday, 30 March 2026

कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा वाली कोण ?






'सक्सेस हॅज मेनी फादर, फेल्युर इज अल्व्वेज ओर्फन'


भर उन्हाळ्यात घाम गाळत दिलेल्या एकूण सर्वच परीक्षेचे निकाल साधारण जूनमध्ये लागतात. आपल्याकडे हल्ली परीक्षेची कमी नाही. पूर्वी परीक्षा म्हंटल तर दहावी किंवा बारावी बोर्डाची, आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षेला अनन्यसाधारण महत्व होत आणि एक वलय होता. जसजसे शिक्षण क्षेत्रात बदल होत गेले आणि स्पर्धा वाढली तसे नवनव्या परीक्षेचा जन्म झाला. हल्ली दहावी, बारावी बोर्डाव्यतिरिक्त दहावी शिष्यवृत्ती, एनटीएसई, केव्हीपीआय, आरएमओ तसेच बारावीत एमएच-सीईटी, जेईई-मेन, जेईई-ऍडव्हान्स, बिटसॅट, नीट, जीपमार नाटासारख्या अनेक देशपातळीवरील स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता काही वर्षा आधीपासून विध्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात. काही अपवाद सोडले, तर या परीक्षेचा अभ्यास स्वतः हुन करणे विध्यार्थ्यांना जमत नाही म्हणून विध्यार्थी या परीक्षेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतात.

पूर्वी शाळेत शिक्षकांना एखादा विध्यार्थी एखाद्या विषयात कमजोर वाटला तर त्याकाळचे 'गुरुजी' त्याकडे खास लक्ष देऊन शाळेतच वेगळा वेळ देऊन शिकवायचे. ह्या मागील शिक्षकाचा हेतू खूप प्रामाणिक होता. काही शिक्षक शाळेतच 'एक्स्ट्रा क्लास' घेऊन काही कमजोर विध्यार्थ्याचा विषय पक्का करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे. कालांतराने शाळेच्या वेळापत्रकात हे बसत नसल्यामुले शिक्षकांनी घरी क्लास घ्यायला सुरुवात केली. यातच अर्थकारण येऊन त्याचे रूपांतर पुढे 'ट्युशन क्लास' आणि नंतर भरमसाठ फी घेणाऱ्या 'कोचिंग क्लास' मध्ये झाले. सुरुवातीच्या काळात ट्युशनच्या 'कुबड्या' घेऊन चालणारा विध्यार्थी म्हणजे 'ढ' समजल्या जायचा. पण कालांतराने कमी मार्क मिळण्याची भिती तसेच शालेय शिक्षकाच्या हातातील 'हातचे मार्क' या भितीने सर्वच विध्यार्थ्याने कोचिंग लावायला सुरुवात केली आणि हे क्षेत्र भरभराटीस आलं.


आज मूलं जन्मल्यापासून दहावी, बारावी, सर्व पदव्यासहीत सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोचिंग क्लास आपल्या जवळपास उपलब्ध आहेत. आपण रोज हया फोटो-जाहिराती वृत्तपत्रात बघतच असतो. जाहिरातीचा भरणा असलेल्या वर्तमानपत्रात अर्ध्याहुन जास्त जाहिराती ह्या कोचिंग क्लासेसच्या असतात. कधी कधी वाटते कि यास वृत्तमानपत्र म्हणावं कि जाहिरातपत्र! इतर संस्थेप्रमाणे वर्तमानपत्रालाही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे पीटीआय ने आखून दिलेली एक नियमावली आहे पण पैशाच्या बाजारात पीटीआयच्या नियमाला बगल देऊन सरळसरळ मोठमोठ्या जाहिराती पुढच्या पानावर छापल्या जातात. वेळप्रसंगी मुख्य बातमीला बाजूला किंवा छोटी बनवून, जॅकेट चढवून जाहीराती छापल्या जातात. संपूर्ण जगाला अक्कलेच डोज पाजणारा वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला स्वतःची नियमावली पाळणे मात्र जमत नाही, असो.


मूळ मुद्दा असा की आज कोणत्याही क्लासेसच्या जाहिरातीकडे जर आपण पाहिल तर लक्षात येईल कि त्यात परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच छायाचित्र छापलेले आपल्याला दिसतील, का ? जर जास्त मार्कानी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याचेच फोटो आणि सत्कार होत असतील तर कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? ते आपल्या जीवनात काहीच चांगलं करणार नाहीत का ? त्यांचा वाली कोण ? का एखादे कोचिंगक्लासवाले हे सांगत नाही की आमच्या कडे हे अमुक अमुक विध्यार्थी होते पण त्यांना हि परीक्षा काही जमली नाही पण ते इतर क्षेत्रात खूपकाही चांगले काम करू शकतात. काही वर्षापूर्वी आपल्याकडील वृत्तपत्रात फक्त मेरिटवाल्या विध्यार्थ्याचेच फोटो छापले जायचे. त्यांची मुलाखत घेतली जायची. त्यामुळे इतर विध्यार्थ्याचे खच्चीकरणं व्हायचे. विध्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन नैराश्य, आत्महत्यासारखे प्रकार घडत असत. असे होऊ नये म्हणून शासनाने मेरिटलिस्ट छापण्यावरच बंदी आणली. आज कोणत्याही वृत्तपत्रात दहावी किंवा बारावीची मेरिटलीस्ट छापली जात नाही.


इतिहासातील धडे शिकूनच आपण वर्तमानातील वाटचाल करत असतो. मायक्रोसॉफ्टचे बिलगेटस् हे इतर विध्यार्थ्याप्रमाणे हुशार नव्हते पण आज जगातील सर्वोच्च विध्यापीठातील गुणवंत त्यांच्यासोबत काम करत आहेत. क्रिकेटचा सम्राट भारतरत्न सचिन तेंडुलकर इयत्ता आठवीत नापास झाला होता. सैराट सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे नागराज मंजुळे विपरीत परिस्थितीत लहानाचे मोठे झाले, दहावीत नापास झाले. अर्थात त्या काळच्या शाळा किंवा कोचिंग क्लासने बिलगेटस, सचिन आणि नागराज मंजुळे सारख्यांचे फोटो छापले नसतील, हार-तुरे देऊन सत्कार केला नसेल पण आज ही लोक यशाच्या एव्हडया उच्च शिखरावर पोहचली आहे की त्यांचा साधा ऑटोग्राफ मिळणे कठीण आहे. कदाचित चांगले १०० पैकी १०० गुण मिळवनारे 'परीक्षार्थी' बनण्यात ते नापास झाले असतील पण आज आवडीच्या क्षेत्रातील चांगले विद्यार्थी होऊन त्यांनी यश गाठलं आहे.


मुळात शासनमान्य शाळा, कॉलेज आणि खाजगी कोचिंगक्लास याच्या शिकवणीची पद्धत समजण्यात पालक गल्लत करतात. खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शाळा-महाविद्यालयातील शिक्षक हे त्यांच्या वर्गातील तळागाळातील विध्यार्थ्याकडेसुद्धा तेव्हढेच लक्ष देतात जेव्हढे लक्ष ते हुशार विध्यार्थ्याकडे देत असतात. शिक्षकांची ही प्रामाणिक इच्छा आणि जिद्द असते की त्यांनी शिकवलेला विषय हा वर्गातील सर्व स्तरावरील विध्यार्थ्यांना समजावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे. कोणी एकच विध्यार्थी मेरिटमध्ये आणणे असा ' फोटो-जाहिरात आणि मार्केटिंग' वाला हेतू त्यांचा नसतो. थोडक्यात जो विध्यार्थी बसलेला आहे त्याने उठून चालण्यासाठी तयार करणे, जो चालत आहे त्याची गती वाढवणे आणि जो गतीने चालत आहे त्याची गती वाढवणे असा शुद्ध हेतू असतो. त्यामुळे शाळेत एकूण सर्वच विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. आणि कदाचित अधोगती झाली तरी शालेय शिक्षक तो आमचाच विध्यार्थी आहे असं म्हणायला लाजत नाही.


या उलट कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाच सर्व लक्ष हे पुढील बाकावर बसलेल्या दोन-तीन रांगेपर्यंत मर्यादित असत. कारण या रांगेमधील विद्यार्थीच पुढे क्लासेसला 'रँक' देणारे असतात आणि त्यांचेच 'फोटो' क्लासेसच्या बिजनेसच्या जाहिरातीसाठी उपयुक्त असतात. कोचिंग शिक्षकाचा पगारही त्या रँकनुसार वाढत असतो. हया पुढील बाकावरील हुशार विध्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासच्या शिक्षकाच्या डोक्याला ताप नसतात, आणि त्यांना व्यवस्थित शिकवणे, शँका निरसरन करणे त्यांना भाग असते. या उलट मागील बाकावरील विध्यार्थी ज्यांचा विषय खूप कच्चा असतो असे विद्यार्थी म्हणजे कोचिंग क्लासेस शिक्षकांसाठी ताप असतात. अशा विध्यर्थ्याच्या खालच्या पातळीवर येऊन शिकवण्याइतका संयम सर्व क्लासेस शिक्षकात नसतो. त्यामुळे ते वाऱ्यावर सोडले जातात. अशा पद्धतीत पुढचे विध्यार्थी खूप पुढे जातात आणि मागचे खूप मागे. थोडक्यात पुढील बाकावरील विध्यार्थी म्हणजे लग्नातील 'मानकरी' सारखे असतात त्यांना दुःखवून चालत नाही. काही पुढील बाकावरील विध्यार्थी वगळता मागच्या विद्यार्थ्यांच्या फोटोची क्लासेसला गरज नसते. मग एकूण जेईईसाठी कोचिंग घेणारे २५०० विध्यार्थी आणि पात्र मात्र १५ असे प्रकार घडतात, मग उरलेल्या २४८५ विद्यार्थ्यांनी काय करावं एव्हढ साधं मार्गदर्शनही कोचिंगवाले करत नाहीत.


मग आपल्या जाहिरातीत जास्तीत जास्त गुणवत्ताधारक विध्यार्थ्याचे फोटो दिसावे म्हणून बरेच क्लासेसवाले वेगवेगळे उद्योग करत असतात. वेळप्रसंगी इतर क्लासेसच्या विध्यार्थ्यांना लाखो-करोडो रुपयाची ऑफर देऊन फोटो घेतले जातात. हा आमदार-खासदार फोडण्याचाच प्रकार असतो. किंवा बळेच मोठा धनादेश, हारतुरे आणि पेढे देऊन फोटो काढून घेतले जातात, असे अनेक प्रकार अलीकडे घडत आहेत. 'रँक विकण्याचा घोडेबाजार' कोटासारख्या कोचिंगक्लासच्या पंढरीस नवीन नाही. एकंदरीत पैशाच्या या खेळात सर्वांकडून पैसे उकळून फक्त काही विध्यार्थ्याच भलं होत असताना दिसत आहे. उदाहरण दयायच असल्यास, संपूर्ण भारतात जेईई परीक्षेमध्ये उत्तीर्ण विध्यार्त्याची एकूण संख्या ३९०० असेल तर या तुलनेत भारतातील सर्व कोचिंगच्या उत्तीर्ण विध्यार्थ्याच्या फोटो-संख्येची बेरीज हि ७००० पेक्षा जास्त असणार, कारण एकाच विद्यार्थ्यांचे फोटो आपल्याला विविध क्लासेसच्या जाहिरातीत तसेच होर्डिंगवर बघायला मिळतात. थोडक्यात म्हणायचे तर -

सक्सेस हॅज मेनी फादर
फेल्युर इज अल्वेज ओर्फन


एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवणे ही शासनाची जबाबदारी आहे. कालच वृत्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंत्र्यांनी ११वी, १२वी विज्ञानशाखेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती आवश्यक केली आहे. 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे उशिरा का होत नाही पण हा एक आशेचा किरण दिसत आहे. कारण त्यामुळे सर्वसाधारण तसेच तळागाळातील विद्यार्थ्याला फायदाच होईल. कारण कोचिंग क्लासेसची फी सर्वांना परवडणारी नसते. मुलांसाठी वाटेल ते करणारे पालक वेळप्रसंगी मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून कर्ज काढतात आणि त्यांच्या हाती काही लागत नाही. महाविद्यालयातच दर्जेदार शिक्षण मिळाल्यास गरीब आणि सर्वांचा फायदाच होईल. 'गुरु' म्हणजे काय, त्यांची शिकवण्याची पद्धत माहित पडेल. महाविद्यालयातील फक्त शिक्षण नाही तर महाविध्यालयीन वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार होतील जे आज होताना दिसत नाहीत. वार्षिक स्नेहसम्मेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांचं व्यक्तिमत्वही उजळेल. थोडक्यात फक्त हुशार मुलांचा कोचिंग क्लासचा बाजार कमी होईल.


फक्त गरज आहे सरकारी आदेश तंतोतंत लागू होण्याची. कारण आपल्याकडे पळवाट शोधणाऱ्या हुशार 'बिरबल' ची कमी नाही. उद्या चक्क महाविद्यालयातील बायोमेट्रिकच रिमोटने कोचिंग क्लासेसला जोडलेली आढळल्यास आश्चर्य वाटू नये. दिवसातून तीन वेळेसची बायोमॅट्रिक आवश्यक केल्यास त्यास संस्थाचालकापासून सर्वच स्तरातुन विरोध होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांशी सोयरसुतक नसलेल्या शिक्षकाचे श्रम वाढतील. मागील कितीतरी वर्षांपासून एकाच रुळावर चालणारी गाडी जेंव्हा पटरी बदलेल तेंव्हा थोडा खडखडाट होणे साहजिक आहे. त्यातल्या त्यात श्रीमंत पालक जे आपले पाल्य कोटासारख्या इतर ठिकाणी कोचिंगसाठी ठेवतात त्यांचाही या बदलास विरोध होईल, क्लासेसवाल्यांचीही वेळेची थोडी सर्कस होईल. पण महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने इमानेइतबारे शिकवल्यास सर्वच विषयाची कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही आणि खरोखरच विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. पण हा बदल होणे आवश्यक आहे.


शिक्षणातील ह्या बाबीस फक्त शासनास जबाबदार धरणे चूक होईल, पालकही तेव्हढेच जबाबदार आहेत. त्यांनाही आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी इतर मुलांचे अनुकरण न करता वेगळी शाखा, क्षेत्र निवडावे कारण प्रत्येकाचा पालकाचा पाल्यामध्ये एक वेगळा टेलेन्ट असतोच. जाहिरातीतील मेरिटचे फोटो आणि आमिषाचा गळाला लागून पालक आणि विद्यार्थी नको ते क्लास लावतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती न होता आर्थिक नुकसान होते. गरज आहे त्यांनी आपल्या मुलांचा वेळीच कल ओळखण्याची आणि मेरिटचा अट्टाहास न करता पाल्याची एकूण खरी प्रगती ज्या क्षेत्रात होऊ शकते तेच क्षेत्र निवडण्याची आणि त्याच क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यास त्यास मदत करण्याची.

©
प्रेम जैस्वाल, पेडगावकर
ह.मु. औरंगाबाद ९८२२१०८७७५

एडिट

एडिट 


सोबतचा फोटो एडिट केलेला आहे. पहिला कृष्ण-धवल तर दुसरा रंगीन! हल्ली फोटो एडिट करणं म्हणजे 'बायें हाथ का खेल'. हात कशाला लागतं, ऐआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला फक्त आदेश (प्रोम्प्ट) द्या आणि पाहिजे तसा फोटो एडिट करुन घ्या. एव्हढंच काय फोटो नसतांनासुद्धा फक्त एखाद्या व्यक्तीच सविस्तर वर्णन दया हा अल्लाउदीनचा जादूई चिराग तुम्हाला वाटेल तशा इमेजेस बनवून देतो. त्या फोटोला बोलता करतो. साजेसा आवाज देतो आणि बरंच काही. प्रत्येक आऊटपुटनंतर स्वतःहून ' जहाँपनां, अजुन काही चांगले बदल हवेत का?' असंही विचारतो. 'देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी' सारखं होऊन जातं. 

सोबतचा फोटो १९८१ चा आहे. त्याकाळी फोटो प्रकार दुर्मिळ होता. तालुक्याच्या ठिकाणी एखादं फोटो स्टुडिओ असायचं. १९७५ पर्यंत शाळेतील प्रवेशासाठी पासपोर्ट अट नव्हती कारण फोटो हा प्रकार तेव्हढा चलनात नव्हता. पण मी आठवीत म्हणजे १९८१ मध्ये झेडपी मध्ये प्रथमचं प्रवेश अर्जाला फोटो लागत होता. त्यामुळे आपण फोटो काढणार हा आनंद. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाप्रमाणे सुरुवातीला कलर फोटोग्राफी हा प्रकार नव्हता. पण ठराविक फोटोग्राफरकडे दोन रुपये जास्त देऊन ब्लॅक अँड व्हाईट फोटोला 'एडिट' करुन रंगीन करुन देण्याची सोय मात्र होती. फोटोग्राफर सरळ सरळ त्या फोटोवर ब्रशने रंग चढवून त्याचा रंगीत फोटो तयार करायचे. शरीराला स्किन कलर, केसांना काळा तर कपड्यांना पाहिजे तो कलर देऊन मोकळे! मग असा रंगीन फोटो घेऊन आम्ही मिरवायचो. थोडक्यात एडिट हा प्रकार पूर्वी सुद्धा होता. एडिटचे जसे फायदे तसे नुकसान सुद्धा.  पेशवे इतिहासातील 'ध' चा 'मा' हा आनंदीबाईने केलेला एक एडिट सर्वांनी वाचला असेन ज्यामूळे नारायणराव पेशव्याचा खून झाला. 

इतर क्षेत्राप्रमाणे फोटोग्राफी मध्ये सतत बदल होत गेले. गाव-खेड्यात असूनही आमच्या घरी वर्ष १९७५ मध्ये 'अगफा' कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. नंतर त्या कॅमेराचे रोल मिळत नव्हते म्हणून तो पडीत झाला. त्याकाळी कॅमेराचे रोल अगदी अंधारात कॅमेऱ्यामध्ये फिट केल्या जायचे. फोटो काढून झालेले रोल(निगेटिव्ह), एखाद्या स्टुडिओमध्ये धुवून मिळायचे, म्हणजे पॉसिटीव्ह फोटो मिळायचे. काही फोटो वाया जायचे. रोल महाग असल्यामुळे फोटो काढतानाच खूप काळजीपूर्वक शॉट घेतल्या जायचा. काही वर्षानी रंगीन फोटो घेण्याची सोय झाली. फ्लॅश हा प्रकार खूप नंतर आला. 

आजच्यासारखं प्रत्येक शासकीय कामासाठी त्याकाळी फोटोची गरज नव्हती. शहरातील जत्रेत फोटोवाल्याचा स्टॉल असायचा. त्याच्याकडे छान 'बॅकग्राउंड' साठी काही रंगबिरंगी पडदे किंवा एका उघड्या कारची प्रतिकृती असायची. त्या प्रतिकृतीमागे बेंचवर बसलेल्या व्यक्ती उघड्या कारमध्ये बसल्यासारख्या भासायच्या. सर्वच भन्नाट! असे ब्लॅक अँड व्हाईट लाकडी फ्रेममध्ये मढविलेले लहान आकाराचे फोटो आजही एखाद्या मातीच्या जुन्या घराच्या भिंतीवर टांगलेले नजरी पडतात.

मला आठवतं. मी बारावी इयतेत शिकत असतांना छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील स.भू. महाविद्यालयाच्या स्नेह-संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते परीक्षित सहानी (3इडियट, फरहानचा बाप) आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर त्यांना आमच्या हॉस्टेलचे रेकटर डॉ बोरीकर सर हॉस्टेलला घेऊन आलेत. मग सर्व हॉस्टेलमधील विध्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढला. आमचा तो ग्रुपफोटो घेण्यासाठी त्याकाळी कॅमेऱ्यामनने तो कॅमेरा एका मोठ्या पडदयाने झाकला होता. असा मोठा कॅमेरा मी पहिल्यांदाच बघितला होता. 

डिजिटल क्रांतीनंतर फोटोग्राफीमध्ये बदल घडले. रील प्रकार बंद होऊन डिजिटल कॅमेरे अवतरले. रिल्सची जागा मेमरीकार्डने घेतली. एक्सट्रा मेमरीकार्ड वापरून हजारो फोटो, शूटिंग घेण्याची सोय झाली. पूर्वी फोटोसोबत फोटोग्राफर रिल्सचे नेगेटिव्ह परत करायचे. त्या निगेटिव्हवरून परत फोटो काढले जायचे. आता हा प्रकार बंद झाला. पूर्वी जत्रेच्या खेळणीत छोटे कॅमेरा विकत मिळायचा. या कॅमेऱ्याच्या पुढे चित्रपटाच्या छोटया नेगेटिव्हची फिल्म लावून बघण्याची सोय असायची. कॅमेऱ्यासोबत काही निगेटिव्ह फ्री मिळायच्या. जत्रेत हा हमखास विकला जाणारी खेळणी होती. पुढे पुढे या कॅमेऱ्यामध्ये दोन फिल्म बघण्याची सोय झाली. 

हल्ली फोटो व्हिडीओ तंत्रज्ञानात अफाट प्रगती झाली. प्रत्येक मोबाईल धारक फोटोग्राफर झाला आहे. पाहिजे तसा सुंदर फोटो तो काढू शकतो. रोज डीपी बदलू शकतो.ऐआयच्या मदतीने पाहिजे त्या ठिकाणी स्वतःचा फोटो काढू शकतो. अगदी अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस'मध्ये ट्रम्प महोदयासोबतसुद्धा! सेल्फी, टाईमर लावून फोटो घेऊ शकता. टीबी मेमरीमध्ये हजारो व्हिडीओ सेव्ह करण्याची सोय झाली. पण आता हे सर्व क्षणिक वाटतं. काढलेले फोटोज, व्हिडीओ मेमरी स्वरूपात सेव्ह होतात. नंतर त्याला कुणी बघत नाही. किंवा त्याचं अप्रूप नसतं. एक गोष्ट मात्र नक्की. एव्हढ सर्व डिजिटल आणि सहज सर्व गोष्टी उपलब्ध असूनही कोणत्याच व्यक्तिकडे स्वतःचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो मात्र उपलब्ध नसतात!

©प्रेमकुमार जैस्वाल 
9822108775

हिंदी-उर्दू: दो बहनोकी बात



अब तो यह रिवाज सा बन गया है के हिन्दुस्तान के पार्लमेन्ट में जब भी कोई मंत्री या एमपी, फिर वह किसी भी पार्टी के क्यों न हो अपनी बात रखते है तो बात बात में एक शेर जरूर सुनाते है। असल बात यह कि किसी भी बात या मुददो का वजन बढाने के लिए शेर की सहायता जरुरी ली जाती है l इतना ही नही श्रोताओ का दिल जीतने के कई सभा-सम्मेलन में अपने भाषण में नेता या वक्ता एक शेर जरूर सुनाते है और लोगों का दिल जीत लेते है। और ये दिल जितने वाले शेर अक्सर उर्दू भाषा में  हि लिखे होते है। एक सर्वे के मुताबिक हिन्दुस्तान के पार्लमेंट में आज तक जितने भी शेर सुनाए गये वो तकरीबन ९०% उर्दू में थे।


जी हां, हम बात हिंदी-उर्दू भाषा की कर रहे है। जो दो सग्गी बहने है। हम सब एक बडी गलत फ़हमी है के उर्दू हमारी नहीं बल्की पडोसी मुल्क की भाषा है। हालांकि यह सरासर गलत है, झूठ है। इस में लोंगों की कोई गलती नही क्यों कि हिन्दू लोग उर्दू को मुश्किल और मुस्लिम की भाषा समझकर बोलने से परहेज रखते आये है । 'रिलिजियस पॉलिटिक्स' ने इस भाषाका बटवारा कर दिया हैं । हालांकी हिंदी में उर्दू इस तरह घुली है जैसे दूध में शक्कर जिन्हे एक दुसरे से १००% अलग करना मुश्किल है l शब्दो का परहेज कर के आप ना तो 'शुद्ध हिंदी' बात कर सकते ना 'शुद्ध उर्दू!' और हिंदी में सिर्फ उर्दू नहीं बल्की पारसी, अफगाणि, गुजराती, कनडा, पोर्तुगीज और अंग्रेजी शब्द भी घुलमील गये है l 


हालांकि कोई भी भाषा 'रिजनल' होती है 'रिलिजनल' नही । जैसे पंजाब की पंजाबी, तमिलनाडु की तमिल, गुजरातकी गुजराथी, कर्नाटक की कन्नडी। कहने का मतलब जो मुस्लिम पंजाब में रहते है वो पंजाबी बोलते है। जो गुजरात में रहते है वो गुजराती बोलते है। जो तमिलनाडु में रहते है वो तमिल बोलते है। इस हिसाब से उर्दू को मुस्लिम समाज की भाषा कहना बहोत गलत होगा। वैसे शुरु से उर्दू नॉन-रिलीजस भाषा रही है।


आज लोग भले ही उर्दू भाषा बोलने मे परहेज करते होंगे लेकिन यही उर्दू के शेर, नज्म या शायरी आप जब गुलजार(संपूर्ण सिंग कालरा) के गीतों में, अमिताभ बच्चन (असली नाम इन्कलाब श्रीवास्तव) के डायलोग मे या फिर लता मंगेशकर के गीतों में सुनते तो बड़ा मजा आता है। आप यह समझ ले कि हिंदी-उर्दू सग्गी बहने-बहने है। हिंदी मां है तो उर्दू मौसी। हिंदी नग्मे तभी अच्छे लगते है जब उन्हें उर्दू की झालर लगाई जाती है। जो भी बॉलीवुड की फिल्में हिट हुयी उसका बड़ा श्रेय उर्दू को जाता है। हिंदी फिल्में नयी हो या पुरानी उसके संवाद और गीत उर्दू शब्द के बगैर आप सोच भी नही सकते। इश्क, मोहब्बत, सनम,मेहबूब, जुल्फे, गेसू, दास्ताँ, जमीन, हुजूर,झील,कयामत,मजबूर,सर्द, आरजू, फिझा, जिस्म और ऐसे कई हजार शब्द होंगे जो अक्सर उर्दू से लिये गये। हिंदी फिल्मों के कलाकार फिर वो दिलीप कुमार, प्राण, राजेश खन्ना, राजकपूर, बलराज साहनी, परीक्षित साहनी, देवानन्द,अमिताभ हो या मीना कुमारी, वहीदा रहमान, हेमा मालिनी, नूतन जैसी अभिनेत्रीयाँ इन सभी को कामयाब और मशहूर बनाने में उर्दू का बड़ा हाथ है। इतना ही नही फिल्में हिट होने में गीतों का बड़ा योगदान होता है इसलिये उर्दू के सही उच्चारन के लिए महान गायिका लता दीदी ने भी उर्दू सिखी थी। आज हम सिर्फ हिंदी नही बल्कि मराठी में भी उर्दू के कई शब्दों का इस्तेमाल करते है। एक ऎसा भी दौर था जब मशहूर होने के लिए हिंदी शायर खुद अपना नाम भी बदल देते थे l उदाहरन : गुलजार, फिराख गोरखपुरी, मनोज मुंतशीर, नाजीर बनारसी ऐसे कई हिंदी शायर उर्दू नाम धारन करने के बाद मशहूर हुये l 


वैसे उर्दू की पैदास हिन्दुस्तान मे ही हुयी है। कहा जाता है के जब मुगलो का आक्रमण हुवा उस वक्त फ़ारसी का ज्यादा चलन था। जब मुगल शासक आये तब उनके साथ साथ फ़ारसी, अरेबिक और तुर्की यह सब भाषा भारत मे आयी। इन भाषाओं का जब दिल्ली के ब्रज या खड़ी बोली के साथ मिश्रण हुवा तो नयी भाषा का जन्म हुवा। दिल्ली मे जब फारशी शासक के सेनाने शेकडो वर्ष तक डेरा लगाया था तब कुछ सैनिको की भाषा पारसी,कुछ अरेबिक और कुछ तुर्की थी। फिर उनकी भाषा को संबंध दिल्ली के खड़ी बोलि बोलने वाले लोगों से हुवा। आपस के इस बोलि भाषा को 'ओरडु'(सैनिक की भाषा) ऎसा नाम दिया गया l १७८० से पहले उर्दू को रेक्ता, रेक्ती, हिंदवी कहा जाता था और बाद में 'उर्दू' ऐसा नामकरण हुवा। १८ वे सदी तक उर्दू और हिंदीमे बिल्कुल भी फर्क नही था। हालाँकि उर्दू यह शब्द तुर्की से लिया गया। कई किताबें पारसी,तुर्की और अरेबिक मे लिखी गयी। चूँकि उर्दू बादमें बोलि भाषा बन गयी वह तेजी से आगे बढि, बहते गयी और आगे बढी और बाकी भाषाएँ पीछे रह गयी। जब आप कोई भाषामें सिर्फ लिखते हो तो वह 'स्टैटिक' बनती है या थमसी जाती है। लेकिन वही भाषा जब बोली भाषा बनती है तो वह बहाव के साथ 'डायनामिक' बन जाती है। उर्दू के साथ यही हुवा, वह जोरसे बहती चली गयी। बाद में महान कवि आमिर खुसरों ने उसे नये मुकामपर पहुंचाया। उर्दू मे कई शब्द दिल्ली के हिंदी खड़ी बोलीसे लिए गये। दोनों भाषा का व्याकरन एक जैसा है। हिंदी और उर्दू एक दुसरे के इतने करीब है के जब आप हिंदी बोलते हो हो उसमें कई शब्द उर्दू के होते है और आप जब उर्दू बात करते हो तो पच्चास प्रतिशत सेभी ज्यादा शब्द हिंदी होते है। जब हिंदी के शब्द पढने में दिक्कत होती है तो हम सोचते है 'कहीं ये उर्दू शब्द तो नहीं?' इसलिये हिंदी फिल्में नयी हो या पुराणी उसके संवाद और गीत उर्दूके बगैर अधूरे है। आज भारत के ५ स्टेट में उर्दू को राजभाषा का दर्जा है जैसे हैदराबाद, यूपी, बिहार, झारखंड और जम्मू-कश्मीर। आज भारतके कुछ दक्षिण इलाखों में बहोत ही शुद्ध उर्दू बोली जाती है। चूँकि दक्षिणमे तेलगु, कनडा, मलयालम और तमिल जैसे भाषा का ज्यादा प्रभाव है, उर्दू मे कई लोकल शब्द शामिल हुए है।


यह कहना भी सरासर गलत होगा के उर्दू पाकिस्तानी भाषा है। क्योंकि वहाँ उर्दू कम और बाकि भाषाऐ जैसे के बलूची, कश्मीरी, पाशतु, अरबी इ ज्यादा बोली जाती है।उर्दू जबान को १० करोड़ पूर्व पाकिस्तानी मुस्लिम याने आज के 'बांग्लादेश'  ने भी कभी नही अपनाया फिर वो पाकिस्तानी भाषा कैसे हो सकती है? पुरब पाकिस्तान याने आज के बांगलादेश की भाषा बांगला है, उर्दू नहीं l पाकिस्तान से जादा हिन्दुस्तान मे उर्दू बोली जाती है। हिन्दुस्तानमे ५ करोड़ तो पाकिस्तान में सिर्फ 1.25 करोड़ जनता उर्दू बोलती है। 'मोहाजिर' याने बटवारे के वक्त जीन मुस्लिमों को यूपी, पंजाब,हरियाणा, कश्मीर और दिल्ली जैसे ईलाखो से पाकिस्तान जाना पड़ा सिर्फ वही मुस्लिम उर्दू भाषा का इस्तेमाल करते है।। 'हम अलग तो हमारी भाषा भी कुछ अलग होना चाहिये' इसलिये पाकिस्तान ने भले ही उर्दू को राष्ट्रीय भाषा का दर्जा दिया हो लेकिन वो सरासर गलत है क्योंकि वहाँ बोलि भाषा मे उर्दू 'दूसरे स्थान' पर है।


दिलचस्व बात यह है कि १८वे सदि तक सिर्फ और सिर्फ अच्छे जानकार हि इन भाषाको पढ़ और समझ सकते थे। १९वे सदि मे ये दोनों भाषाएँ बहोत विकसित हुई। हिंदी को आगे बढाने मे मुंशी प्रेमचंद, संत कालिदास्, संत तुलसीदास, संत सूरदास और सन्त कबीर जैसे महान संत और साहित्य लेखक का बहोत बड़ा योगदान रहा। आज संपूर्णसिंग कालरा (गुलजार), रघुपति सहाय (फ़िराक़ गोरखबादी), रामप्रसाद बिस्मिल और महाराजा चंदूलाल जैसे गैर-मुस्लीम लेखक या कवि भी है जिन का उर्दूको आगे बढानेमे बढ़ा सहयोग रहा है।


भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग का जन्म अब के पाकिस्तान में हुवा था। बहोत कम लोग यह जानते है के उनकी शिक्षा उर्दू में हुई। जब वो प्रधान मंत्री बने तब ६० बरस के  रिवाज के मुताबिक उन्हें हिंदी मे भाषण देना जरूरी था। उन्होंने कुल ४८ मिनट भाषण दिया लेकिन बहोत कम लोग यह जानते है के उस भाषण की स्क्रिप्ट उर्दू भाषा में लिखी गयी थी ! क्योंकि डॉ. मनमोहन सिंग को उर्दू पढ़ना ज्यादा आसान लगता है।उर्दू का बहोत सा साहित्य पंजाब से आया है। विशेष बात यह कि उर्दू के कई शायर-लेखक पंजाब से आये है।


सिर्फ सियासत के लिए भाषा को बाटा जाता है l इसलिये जब कोई अगली बार आप से उर्दू में कुछ कहे या कुछ लिखे तो गलतफहमी में ना रहे, क्यों कि वह भी हमारी याने हिन्दुस्तान में पैदा हुई भाषा हैं l सिर्फ मुस्लिम समाज या किसी और देश की तो कतई नही।

तभी तो 
उर्दू के मशहूर शायर मुनावर राणा ने एक शेर में सही कहा, 

'लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है,
मैं उर्दूमें गझल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है।'




© प्रेमकुमार जैस्वाल
(आप यह लेख नाम के साथ शेअर कर सकते है। )