ad1

Monday, 10 September 2018






भारतीय रेल्वे स्थानकावरील बोर्डवर समुद्रसपाटीपासून उंची (Mean Sea Level, MSL) का लिहिलेली असते?
                          
                            -प्रेम जैस्वाल

    - - - - - - - - - - - - - -

भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आपण नेहमी बघतो कि प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या बोर्डवर हिंदी आणि इंग्रजीत 'समुद्र तल से उंचाई' --- मी. असं लिहिलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी ती साईड-पोलवर सुद्धा लिहिलेली असते.

खरं तर ही माहिती आपल्यासाठी लिहिलेली नसते तर ती माहिती रेल्वेच्या मोटरमन(ड्राइवर), गार्ड  आणि रेल्वेच्या अभियंत्यासाठी खूप महत्त्वाची असते.

उदाहरणार्थ, जर मुंबईहुन नाशिक जाणारी जनशताब्दी ट्रेन 10 मीटर समुद्रसपाटीपासून पुढं 100 मीटर उंची (समजा इगतपुरी) असलेल्या ठिकाणावर चढणार असेल तर त्या ट्रेनचा मोटरमन उंचीचा बोर्ड बघून त्या रेल्वेच्या इंजिनाचा जोर वाढवेल (आपल्या भाषेत ऍक्सेकेटर!) आणि ट्रेनची गती त्याप्रमाणे नियंत्रित ठेवेल.

त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात ट्रेन इगतपुरीहुन मुंबईकडं उतारावर जाताना मोटरमन समुद्रसपाटीपासूनची उंची बघून किती 'ब्रेक' लावला पाहिजे याचा विचार करेल. रेल्वेला दुचाकी-चारचाकीसारखं अर्जंट ब्रेक लावता येत नाही.  त्यामुळं मोटरमनला उंची-खोली आणि अंतराचा अंदाज बांधून आधीच निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला त्या ठिकाणच्या उंचीच्या फलकाची मदत होते.

हल्ली जास्तीत जास्त भारतीय रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आहे. रेल्वे चालताना आपण बघतो कि विद्युततारा ह्या कायम रेल्वेच्या संपर्कात येत असतात. जर उंची कमी-जास्त असेल तर रेल्वेचा ताराशी व्यवस्थित संपर्कचं होणार नाही. थोडक्यात, विद्युतीकरनचं काम करताना विजेच्या तारांची उंची सगळीकडे समान राखणे आवश्यक आहे जेणेकरून रेल्वे मार्गावरील विजेच्या तारांचा रेल्वेवरील तारांशी सतत संपर्क होत राहील आणि विद्युतप्रवाह सुरळीत चालू राहील.

त्यामुळं विद्युतीकरनच काम करतानाही रेल्वेच्या अभियंत्यांना त्या त्या ठिकाणची अचूक उंची माहित असणे आवश्यक असते.

हेच कारण आहे की प्रत्येक रेल्वे स्थानकावर अशी उंची नमूद केलेली असते.

No comments:

Post a Comment