ad1

Friday, 22 November 2019



बाऊन्सर नको, कौन्सेलर हवे!


एकदा प्रबोधनकार ठाकरेकडे शाळेचे शिक्षक तक्रार घेऊन गेले की तुमचा मुलगा शाळेत खूप खोड्या करतो. आता शिक्षकाला वाटलं की प्रबोधनकार ठाकरे आपल्या मुलाला मोठी शिक्षा करतील. पण झालं भलतंच, प्र. ठाकरे म्हणाले,' अहो गुरुजी या साठीच तर मी त्याला शाळेत पाठवलं!' तो मुलगा म्हणजेच हिंदू ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे!!

येथे हे नमूद करण्याचं कारण म्हणजे परवाच वृत्तमानपत्रात  एक बातमी वाचली. शालेय मुलं खोड्या करतात म्हणून शिक्षणाच माहेरघर असलेल्या पुण्यातील एका शाळेय व्यवस्थापनाने मुलांना शिक्षा देण्यासाठी  चक्क बॉउन्सर नेमले. बायन्सर म्हणजे उत्तम देहयष्टी असलेले, सहसा गडद कपडे परिधान केलेले धिप्पाड, उग्र चेहरा असलेले भितीदायक मानवप्राणी. सिने कलाकार म्हणजे सेलेब्रिटी, राजकीय व्यक्तीना जमावाकडून होणाऱ्या संभाव्य त्रासापासून रक्षणासाठी नेमलेले बाऊन्सर आपण नेहमी पाहतो. शिवाय बार, डान्सबार सारख्या ठिकानी ग्राहकांवर एक वचक रहावा म्हणून ही उभे केलेले बाऊन्सर आपण चित्रपटात पाहात असतो. त्यात वावगं असं काहीच नाही. पण शाळेसारख्या पवित्र ठिकाणी बाऊन्सर असा प्रकार पहिल्यांदाच ऐकावयास मिळाला.  खरंच शाळेत त्याची गरज आहे का?

मुलं हि उडान, मस्तीखोर असतातच कारण ते त्यांचं बालपण असतं. जीवनावश्यक शिक्षण, शिस्त आणि संस्कार देताना पालकांना घरी बऱ्याच मर्यादा येतात म्हणून आपण मुलांना शाळेत पाठवतो. पण संस्कार न देता त्यांना बाऊन्सरकडून १०० उठबैठकाची शिक्षा मिळत असेल तर ते किती योग्य? त्यातच जो शिक्षा भोगत होता त्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली नव्हती. अशा असंवेदनशील प्राण्याची विद्येच्या मंदिरात गरजच काय?

डी.एड, बी.एड. पदवीच्या अभ्यासक्रमात शिक्षकांना फक्त     विद्यार्थ्यांना एखादा विषय कसा शिकवावा एव्हडच प्रशिक्षण दिलं जातं नाही तर विद्यार्थ्यांशी कसं वागावं, कसं भावनिक नातं जपावं याचही शिक्षण दिलं जातं. परंतु, सत्य परिस्थिती अशी कि हल्लीचे शालेय शिक्षक स्वतःला एक-दोन विषय व त्या संबंधित प्रश्न-उत्तर आणि परिक्षेपुरतं मर्यादित ठेवतात. मग शिस्त आणि व्यवस्थापन ' नो वन्स कप ऑफ टी' होऊन जातं.  वाढत्या वयात शालेय विद्यार्थ्यांच्या शरीरात बरेच बदल घडत असतात. सभोवतालच्या सर्वच वस्तूबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. काही प्रमाणात संगतीचा परिणाम होत असतो.   त्यात मोबाईल, फिर क्या कहेने! अशा वेळेस विद्यार्थ्याच डोकं टाळ्यावर आणण्यासाठी शिक्षक सौम्य शिक्षा किंवा योग्य समुपदेशन करू शकतात.

थोडक्यात असे अघोरी प्रकार टाळण्यासाठी शाळेंनी बाऊन्सरची नेमणूक करता उत्तम समुपदेशकाची नेमणूक करावी. तसेच शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रम शिकवितानाच विद्यार्थ्यांच्या शिस्त आणि संस्कारावर भर द्यावी.


© प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

No comments:

Post a Comment