ad1

Sunday, 25 November 2018



जीपीएस:  कसं काम करतं ?


       काल विकएन्डला तुम्ही एका आवडीच्या रेस्टारेंटमध्ये पार्टीला गेला होता. सकाळी तुमच्या मोबाईलवर त्या रेस्तारेंटचा संदेश येतो,

' आम्ही आभारी आहोत,  आमच्या रेस्टारेंटची सेवा आपल्याला कशी वाटली, कृपया रेटिंग द्या?' 

सोमवारी ऑफिसला निघण्यापूर्वी तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक पूर्वसूचना मिळते,

'आज ट्राफिक नेहमीपेक्षा जास्त असणार, ऑफिस पोहचण्यासाठी वीस मिनटं जास्त लागतील.'

तुम्ही लगेच आपल्या कारने सुसाट निघता. मधेच एक संदेश येतो,

  'हा रस्ता पुढं बंद आहे, पर्यायी रस्त्याने पुढं जा!' 

आपल्याला प्रश्न पडतो कि आपण काल कुठे पार्टी केली हे कुणालाही सांगितलं नव्हतं, मग या मोबाईलला कसं कळलं ?   पुढे ट्राफिक जास्त आहे, रस्ता बंद आहे, वळण, पूल आहे, अशी पूर्वसूचना हा मोबाईल कसं काय देत असावा ?

वाचक मित्रानों, हि सर्व करामत आहे जीपीएस म्हणजेच 'ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम' ची. प्राचिनकाळी सागरीप्रवासात दिशादर्शकासाठी काही आधुनिक साधन नव्हती. होकायंत्राचा शोध लागण्यापूर्वी नाविक आकाशातील सूर्य तसेच ताऱ्यांचे पुंज आणि त्यांच्या बदलत्या जागा, दिशा यावरून आपल्या सागरी प्रवासाची दिशा ठरवत असत. थोडक्यात पृथ्वीवरील प्रवास आकाशातील तारकापुंजावर आधारित होता. आजच जीपीएससुद्धा आकाशातुनच चालत असतं. फरक एव्हडाच कि वर तारकांचे नव्हे तर अनेक कृत्रिम उपग्रहाचे दाट जाळे असते. मुळात जीपीएसचा शोध 1964 मध्ये अमेरिकेच्या लष्करी सरंक्षण विभागाने लावला. अमेरिकेच्या सरंक्षणविभागाने क्षेपणास्त्र डागण्यासाठी, जहाजे, पाणबुडीला दिशा दर्शविण्यासाठी किंवा एकादया अज्ञात ठिकाणची माहिती घेण्यासाठी 'डॉप्लर' पद्धतीच्या दिशादर्शक जीपीएस वापरण्यास सुरुवात केली. वर्ष 1994 नंतर त्याचा उपयोग नागरीक कामासाठी करण्यास सुरुवात झाली. जीपीएस आज आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. एखाद्या नवीन कॉफी हाऊसला जायचं असेल किंवा दूर एखाद्या नवीन शहरात मनसोक्त भटकायचं झाल्यास जीपीएस तुम्हाला पूर्ण मदत करतो. एकूण अंतर किती कि.मी. पासून रस्त्याची स्थिती कशी, किती वेळ, किती खर्च या सर्वच गोष्टीची पूर्वकल्पना हा जीपीएस निघण्यापूर्वीच देत असतो. आज सर्वच उद्योगधंद्यात ग्राहकांना वेहीकल ट्रेकिंग, कुरियर ट्रेकिंग सारख्या सेवा देण्यासाठी जीपीएस खूपच उपयोगी आहे. लष्करी तसेच नागरी उडान करणारी विमाने, जहाजे, पाणबुडी तसेच खाजगी वाहतुकीसाठी जीपीएस म्हणजे मोठं वरदान आहे. थोडक्यात  जीपीएसमुळे आपण प्रवासाचे योग्य नियोजन करून वारंवार विचारपूस करण्याची कटकट न राहता आपला प्रवास अगदी सुखाचा होतो.  कसं काम करत असावा हा जीपीएस ?

मुळात जीपीएस प्रणालीमध्ये तीन वेगवेगळी उपकरनं आपसात वेळेच  ताळमेळ लावून आपल्याला आपलं लोकेशन माहित करून देत असतात.  हि तीन उपकरण कोणती?  तर  आकाशात सतत फिरणारे अनेक जीपीएस उपग्रह, त्या उपग्रहाची जमीनीवरून अचूक नियंत्रण करणारी नियंत्रण प्रणाली [कंट्रोल सिस्टीम] आणि तिसरं उपकरण म्हणजे आपल्या मोबाईलं किंवा चारचाकीमधील जीपीएसची छोटी चिप म्हणजेच जीपीएस रिसिव्हर. प्रथम आपण या तिन्ही उपकरणाची माहिती करून घेऊ आणि मग त्याच कार्य समजुन घेऊ.

1. जीपीएस सॅटेलाईट:   सॅटेलाईट म्हणजे एका मोठ्या ग्रहाभोवती विशिष्ट कक्षेत फिरणारा उपग्रह.  चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा पृथ्वीचा उपग्रह आहे. अशाच प्रकारे पृथ्वीच्या भोवती फिरणारे अनेक 'कृत्रिम उपग्रह' आहेत जे विकसित देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रांस, जपान सह विकसनशील भारत देश यांनी सोडलेले आहेत. सौरऊर्जेवर स्वयंचलीत हे उपग्रह पृथ्वीच्या भोवती एका विशिष्ट कक्षेत फिरत असतात. प्रसिद्ध भौतिकशास्त्र वैज्ञानिक जॉन केपलरच्या सिध्दांतानुसार त्याच्या विशिष्ट वेगामुळे त्यावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होत नाही. हे उपग्रह अनेक प्रकारचे असतात. पृथ्वीच्या जवळील कक्षेतील इमेज घेणारे उपग्रह अति जास्त वेगाने प्रदक्षिणा घालत असतात, त्यापुढील कक्षेतील जीपीएस उपग्रह, दूरसंचारसाठी उपयुक्त उपग्रह थोड्या कमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतात. या उपग्रहाला संदेशाची आवकजावक करणारे 'ट्रान्स्पोन्डर', कॅमेरे तसेच दिशा-कोन बदलण्यासाठी मोटार लावलेली असते. आज जगात सर्वात पहिल्या अमेरिकेच्या जीपीएस सह आकाशात चार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमच मोठं जाळं आहे. रशियाची ग्लोनास, युरोपची गॅलिलियो, चीनची बीडॉउ तर जपान आणि भारताची स्वतःची  ' नाविक'  नेव्हिगेशन सिस्टम आहे. एकट्या अमेरिकेने 72 जीपीएस उपग्रह पाठविले पैकी बिघाड होऊन 31 कार्यान्वित आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था [इस्रो] ने 7 उपग्रह पाठविले असून देशा च्या 1500 किमी सीमेबाहेरच्या भागावर त्यांचं नियंत्रण आहे.  हे उपग्रह साधारण पृथ्वीपासून 15000 किमी वर नियोजित कक्षेत फिरत असतात.  जेंव्हा आपण एखादं लोकेशन बघतो त्यावेळेस कमीत कमी चार उपग्रहाच्या संपर्कात ती वस्तू आलेली असते. या सर्व उपग्रहाचा आपसातील मेळ साधण्यासाठी त्यामध्ये अचूक असे  'एटोमिक क्लॉक' लावलेले असते.

2. कंट्रोल सेंटर [नियंत्रण केंद्र]: आकाशातील अनेक उपग्रहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर वेगवेळ्या देशाचे एक नियंत्रण केंद्र असतात जे वर फिरणाऱ्या उपग्रहाची आटोमिक क्लॉकद्वारे अचूक वेळ, दिशा, कोन तसेच गति ठरवत असतो. अचूक लोकेशन दाखविण्यासाठी नियंत्रण केंद्र सर्व उपग्रहाच्या वेळेच तालमेळ बसवत असतो. एकंदरीत सर्व उपग्रहाच नियंत्रण जमिनीवरून होत असते. सध्या जीपीएसच नियंत्रण कक्ष अमेरिकेत आहे. याला 'मॉनिटर स्टेशन' असेही म्हणतात.

3. जीपीएस रिसिव्हर:   तिसरं महत्वाचं उपकरण म्हणजे आपल्या मोबाईल किंवा कारच्या आत असलेली जीपीएस चिप म्हणजेच 'जीपीएस रिसिव्हर'.  लाईव्ह लोकेशन बघण्यासाठी हा जीपीएस रिसिव्हर ' चालू असणे आवश्यक आहे. हा जीपीएस रिसिव्हर उपग्रहाकडून माहिती घेऊन 'ट्रीलेटेरेशन' पध्द्तीने निश्चित लोकेशन दाखवतो.

जीपीएस कसं काम करत ?

पृथ्वीवरील एखाद्या वस्तूचं लोकेशन आपल्याला माहित  करून घेण्यासाठी जीपीएस 'ट्रीलेटेरेशन' या गणिती सिद्धांताचा उपयोग करत असतो.  या पद्धतीत तीन माहित असलेल्या ठिकानारून चौथ्या वस्तूच लोकेशन आपल्याला माहित पडतं.  येथे तीन वस्तू म्हणजे उपग्रहाच ठिकाण निश्चित असतं आणि चौथी वस्तू म्हणजे ज्याचं पृथ्वीवरील लोकेशन माहित करायचं आहे तो 'जीपीएस रिसिव्हर' असते. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अनेक उपग्रहापैकी कमीत कमी चार उपग्रहाच्या तरंग कक्षेत आपल्या मोबाईलचा 'जीपीएस रिसिव्हर' येतो.  त्या चार उपग्रहाचे तीन वर्तुळाकार तरंग जेथे भेटतात ते ठिकाण म्हणजेच त्या वस्तूच लोकेशन होय. उपग्रहातून तरंग बाहेर निघून परत उपग्रहात आलेल्या तरंग लहरींच्या फरकाचा काळ [t] आणि लहरींच्या गती [c],  समीकरण c=d/t यावरून उपग्रहाला त्या वस्तूच नेमकं अंतर[d=ct] कळतं.  एकदा हे लोकेशन माहित पडलं की आपल्याजवळ असलेल्या मोबाईल किंवा कारच्या डॅशबोर्डवरील गुगल  मॅपवर ते माहित होत. एव्हडच नाहीतर पृथ्वीपासून मोबाईलग्राहक किंवा जीपीएस रिसिव्हर किती उंचीवर आहे याचेही अंतर कळून जाते. अर्थात त्यासाठी आपल्या मोबाईलचा इंटरनेट व  ' 'जीपीएस रिसिव्हर' चालू असणे आवश्यक असतं. कारण उपग्रह हे कायम आपल्या संपर्कात असतं. आज उपग्रह व विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जीपीएसद्वारे उपग्रह पृथ्वीवरील काही इंचाची हालचाल सहज टिपू शकतात. 

गुगलला ट्राफिक कसं कळत ?

पूर्वी गुगल एखाद्या स्थळी आपण किती वेळेत पोहोचणार आणि जास्त रहदारी असेल तर किती वेळ लागणार याची माहिती जुन्या संग्रहित नोंदीवरून गुगल मॅपवर देत असे.  अशाप्रकारे रहदारी दाखविण्याची जुनी पद्धत अचूक नव्हती. नवीन पद्धतीत करोडो मोबाईल जीपीएसद्वारे आपआपले लोकेशन गुगलला पाठवत असतात. या करोडो वेगवेगळ्या मोबाईलच्या लोकेशनच गुगल एनालिसिस करत असतं. मग मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची एका विशिष्ट रस्त्यावर होणारी हालचाल आणि गतीवरून त्या रस्त्यावर किती रहदारी आहे याचा गुगलला अंदाज येतो आणि तशी माहिती गुगल मॅपवर दिली जाते. तसेच एका मोबाईलच्या गतीची इतर हजारो मोबाईलच्या गतीशी तुलना करून गुगलला रहदारीचा एकूण अंदाज येत असतो. या  गणितात जागोजागी थांबणाऱ्या स्कुलबससारख्या वाहनांना वगळण्यात येते. रस्ता रहदारीने जाम असेल तर गडद तांबडा,  जास्त रहदारीच्या ठिकाणी तांबडा रंग, थोड्याकमी रहदारीच्या ठिकाणी भगवा आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा असेल तर हिरवा रंग दाखविण्यात येतो.

जीपीएसचे सिग्नल हे फोनच्या सिग्नलपेक्षा कमजोर असतात. त्यामुळे पाण्याच्या खाली, झाडाच्या खाली किंवा गजबजलेल्या शहरी ठिकाणी बऱ्याचदा जीपीएस काम करत नाही. तसेच जीपीएसच्या साह्याने प्रवास करणाऱ्यानी आपला मोबाईल बॅटरी तसेच इंटरनेट डाटा कायम चार्जड ठेवावा लागतो. तसेच गरज पडल्यास वेगळा अँटेना लावू शकता. बऱ्याचदा वातावरणातील बदलामुळे जीपीएस चुकीची माहिती देऊ शकतो. तसेच वीजेंच्या कडकडाने, वातावरणातील इतर बदलामुळे जीपीएस चुकीच लोकेशन दाखवू शकतो
.

आजघडीला आपल्या देशात  मोबाईल धारकाची संख्या हि देशाच्या लोकसंख्येइतकीच आहे. त्यामुळे साहजिकच जीपीएसचा वापर करणाऱ्यांची संख्या आता कमी नाही. असं असलं तरी संगणक आणि मोबाईल हाताळण्याच योग्य प्रशिक्षण, सराव नसल्या कारणाने जीपीएस वापरताना बऱ्याच चुका घडत असतात. तसेच बऱ्याच गाव-खेड्यातील तसेच राज्यमार्गाची दुरवस्था असल्याने, इंटरनेटची सोय, लोड-शेडिंगमुले जीपीएस खात्रीशीर सेवा देईलच याची शास्वती नसते. त्यामुळे पूर्णतः जीपीएसवरच अवलंबुन राहणे फायद्याचे नसते. गावखेड्यात फिरताना फक्त जीपीएसद्वारे प्रवास केल्यास कदाचित आपण नको त्या रानावनातील अरुंद गाडीवाटेमध्ये अडकण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच एकच नावाची अनेक गाव-खेडी  जसेकी डीग्रस, माळेगाव, पिंपरी, लिंबी, असल्याने जीपीएसद्वारे प्रवास आपल्याला नको त्या भलत्याच गावी घेऊन जावू शकतो. किंवा इंग्रजीत टाईप केलेलं स्पेल्लींग समान असल्यामुळं आपण  'महड' च्या   गणपतीऐवजी चवदार तळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'महाड' ला पोहचू शकतो. असे अनेक किस्से आपण ऐकलेच असणार, यात शंका नाही.

जीपीएस तंत्रज्ञानमुळे एखादं ठिकाण शोधणे, मनसोक्त फिरणे अगदी सोपं झालं आहे.  उद्योगाचे अनेक द्वार त्यामुळं उघडले आहे. वेहीकल ट्रेकिंग, कुरियर ट्रेकिंगमुळे सुरक्षितता वाढून उद्योगाच्या बऱ्याच अडचणी कमी झाल्या आहेत.  आज गरज आहे ह्या तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात तसेच उद्योग व्यवसायात योग्यप्रकारे उपयोग करून स्वतःची तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची.  

-- प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com

 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट

Tuesday, 20 November 2018


सायबर सेक्युरिटी : गुन्हे आणि प्रतिबंध

आपल्या पारंपरिक व्यवहारात सर्व वस्तू आणि पैसे याची देवाणघेवाण ही प्रत्येक्ष व्हायची. काही व्यवहारात आपण बँकेचे धनादेश/डीडी द्यायचो पण तो धनादेश/डीडी देणाऱ्याच्या सहीची शहानिशा करूनच  बँकेमार्फत वटला जायचा. त्यामुळे आर्थिक गुन्हेगारीवर आपोआप आळा बसत असे. काही तुरलीक धनादेश अनादरचे गुन्हे तेंव्हा घडत असत.

माहिती तंत्रज्ञान आणि आयटी, कम्प्यूटर, इंटरनेटच्या वाढलेल्या जाळ्यामूळ सर्व आर्थिक व्यवहार खूपच सोपे झाले आहे. तसेच प्रभावी समाजमाध्यमामुळे एका क्लिकवर व्हाटसप, फेसबुक, इंस्ट्र्ग्रामद्वारे आपण फोटो, ग्रीटिंग, ऑडिओक्लिप, व्हिडीओ अख्या जगात व्हायरल करू शकतो. मुख्य म्हणजे लाखो करोडोचे आर्थिक देवाण-घेवाण काही क्षणात होत आहे. माहिती तंत्रज्ञानामूळ व्यवस्थापन तसेच राजकीय क्षेत्रात भरपूर बदलं झाले आहे. प्रसार आणि प्रचाराची परिभाषा बदलली आहे. जगाच्या पाठीवरील अनेक देशाची सरकार स्थापण किंवा पाडण्यात माहिती तंत्रज्ञानाचा खूप उपयोग झाला आहे. सर्वत्र ऑनलाईन आणि इ-कॉमर्सचा बोलबाला असल्यामुळं पारंपरिक मार्केटिंग आऊटडेट होऊन त्याची जागा आता डिजिटल मार्केटिंगन घेतली आहे. एकंदरीत जगात अस कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथे आमूलाग्र बदल घडले नाहीत.

अस असताना या क्षेत्रापासून गुन्हेगारी जगत मागे कसे राहणार. बदलते पैशाचे व्यवहार आणि आर्थिक उलाढाल लक्षात ठेवून आता गुन्ह्याचे स्वरूपही बदलले आहे. गुन्हेगार 'हायटेक' झाले आहेत.  कुणाला हात न लावता, न धमकवता करोडो रुपये बँक खात्यातून परस्पर लंपास, पासवर्ड विचारून एटीएम मधुन काढणे, डुप्लिकेट कार्ड वापरून पैसे काढणे, सॉफ्टवेअर हॅक करून बॅंकेतील खाते रिकामे करणे किंवा रक्कम इतर देशात वळती करणे, वृद्ध नागरिकांना पासवर्ड, ओटीपी, सीव्हीव्ही विचारून फसवणे असे अनेक हायटेक गुन्हे हल्ली सररास घडत आहेत. याच संगणक, मोबाईल, इंटरनेट संबंधित गुन्हयासच आपण सायबर क्राईम असे म्हणतो.

तसे सायबर क्राइम् म्हणचे फक्त आर्थिक गुन्हे नसून मेसेज, फोटो, ऑडिओ, विडिओची कॉपी करणे, मूळ प्रतीची विकृती हे सुद्धा सायबर गुन्हेच्या अंतर्गत येतात. वाढत्या मोबाईलच्या वापरामुळं अख्ख जग आता ऑनलाईन झालं आहे त्यामुळं एका क्षणात संदेश करोडो लोकांना पाठवणे संभव झाले आहे. समाजमाध्यमामुळे तर राजकीय पक्षाची मोठी सोय झाली आहे.  प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष समाजमाध्यमाचा भरपूर उपयोग करून घेत आहे. आज जवळजवळ सर्वच पक्षाचा आयटी सेलं आहेत जिथे हजारो युवक मेसेज व्हायरल करण्याचं काम करत आहे. मग या सोशलमेडिया युद्धात विरुद्ध पक्ष एकदुसऱ्याचा अपप्रचार, खोटे मेसेज टाकणे असे गुन्हे घडत आहेत. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत तर या सायबर युद्धाने तर कळस गाठला होता असे म्हणतात.

अमेरिकी आणि रशिया या जगातील मोठया दोन महासत्ता. या दोहि देशातील स्पर्धा आणि धोरणाचा सर्व जगावर परीणाम होत असतो.  असं म्हणतात कि रशियाचे अध्यक्ष पुतीन याना या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्पना  जिंकवायचे होते. डोनाल्ड ट्रम्प याच्या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंक्टन उभ्या होत्या, आणि त्या निवडून येतीलच असा सर्वांना विश्वास होता. पण झालं भलतंच, ट्रम्प निवडून आले. कारण, रशियाचे हॅकर जगप्रसिद्ध. त्यांनी काय करावं? हिलरी क्लिंटनच्या प्रचार कार्यालयातील सर्व मुख्य प्रचारक व्यक्तीच्या कम्प्युटरचा त्यांनी ताबा मिळवला. त्यामुळे हिलरी क्लिंटनच्या सर्व प्रचाराची दिशा, प्रचारतंत्र, मंत्र,  स्ट्रॅटेजी आणि सर्व माहिती काही तासात डोनाल्ड ट्रम्पच्या रिपलीकन पक्षाला पुरविण्यात आली, अर्थात ट्रम्पने त्यानुसार प्रचाराची दिशा बदलली आणि विजय मिळवला. कंप्युटर हॅकिंग आणि सायबर हल्ल्यामुळं एखाद्या देशाचा राष्ट्रध्यक्ष बदलू शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे शक्य झालं. अशा सायबर युद्धात ज्याचे हॅकर चांगले अर्थात त्यांची बाजू जड असते.  या वरून संगणक क्षेत्रातील हॅकर काय काय करू शकतात याचा अंदाज आपण बंधू शकतो.

संभाषण असो की आर्थिक व्यवहार त्यामध्ये प्रायव्हसी आणि सेक्युरिटी हि खुप महत्वाची असते. दोघांमधील व्यवहार तिसऱ्यास कळता कामा नये.  पण ऑन-लाईन व्यवहारचा अर्थ असा की त्यामध्ये सर्व व्यवहार हे सोफ्टवेअर आणि हार्डवेअर होत असतात.  काही पासवर्ड सोडले तर इतर काही सेक्युरिटी नसते.  आपल्या व्यवहाराची शहानिशा आपली आपणच करायची असते.  ऑन-लाईनमध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे याही क्षेत्राला आता गुन्हेगारानी ग्रासलं आहे. कितीतरी बँकेचे करोडो-अब्जो रक्कम रात्रीत गायब झाली आहे. असे गुन्हे घडून लोकांचं नुकसान होऊ नये म्हणूनच 'सायबर सेक्युरिटी'  हि संकल्पना पुढं आली आहे. ज्याप्रमाणे इतर गुन्हेगारी जगतात गुन्हेगार वेगवेगळ्या कल्पत्या वापरून गुन्हे करतात त्याचप्रमाने सायबर गुन्हेगारीमध्ये गुन्हेगार वेगवेगळी क्लपत्या वापरून संगणकावर सायबर हल्ला करत असतात. त्यामुळं असे हल्ले परतून लावण्यासाठी  आपल्याकडेही तेव्हडी सक्षम उपाययोजना म्हणजेच सॉफ्टवेअर सेक्युरिटी विकसित करणे आवश्यक असते.

या सायबर क्राईमचे  अनेक प्रकार आहेत. झपाट्याने होणारे आयटीमधील बदल आणि नवनवीन अँप यामुळे गुन्हेगाराला गुन्हे करने सोपे झाले आहे आणि ते वेगवेगळ्या क्लुप्त्या अवलंबत असतात. तरी सर्व गुन्हे खालील प्रकारात मोडतात -

1 फिशिंग : या प्रकारात गुन्हेगार  आपल्याला फसवा इमेल पाठवून आपली सर्व गोपनीय माहिती हॅकर माहित करून घेत असतात. एकदाका त्यांना आवश्यक माहिती  मिळाली  की ती वापरून ते आपल्या बॅंकेतील व्यवहारात शिरू शकतात. हल्ली दररोज असे गुन्हे घडताना दिसत आहे

2  आपल्या व्ययक्तिक माहितीचा दुरुपयोग : आपण कुठे दिलेली व्ययक्तिक माहितीचा दुर्योपयोग करणे.

3 हॅकिंग :  हा खुप गंभीर प्रकार आहे.  वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून हॅकर आपल्या संगणकच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करतात. आपली गोपनीय माहिती काढून घेतात, आपले संगणक, वेबसाईट, नेटवर्क बंद करू शकतात, किंवा आपल्या वेबसाईटचा दुरुपयोग  करतात.  उद्योगधंद्यात, राजकारणात तसेच इतर स्पर्धक देशाची लष्करी, नागरिक धोरण माहित करण्यासाठी या हॅकिंगचा उपयोग होतो.

4  इंटरनेटद्वारे दुष्परचार : एखाद्या समूह, समाजाबद्दल दुष्परचार करणे, अराजकता निर्माण करने. धार्मिक तेढ निर्माण करण्यासठी,  तसेच राजकारणात स्पर्धक पक्ष याचा उपयोग करतात.

5  अश्लील साईटचा प्रसार करणे.  अशा वेबसाईट बघण्यासाठी ठराविक वयाची अट असते, पण या नियमाला न जुमानता त्या साईट चा प्रसार करणे हा एक मोठा सायबर क्राईम आहे.

आज संगणक वापरणाऱ्या सर्व खाजगी तसेच सरकारी यंत्रणेला कायम सायबर हल्ल्याचा धोका सतावत असतो. या सायबर हल्ल्यामुळं एका क्षणात देशाची पूर्ण यंत्रणा अर्धांगवायूसारखी पेरालाईझ होऊ शकते. एका रात्रीत बॅंकेतील करोडो रुपये चोरले जातात आणि कुणाचं आयुष्य उदवस्त होत. त्यामुळे काही घडण्याआधीच योग्य तो प्रतिबंध करून आपलं नुकसान टाळणं गरजेचं आहे. त्यासाठी खालील उपाययोजना करने आवश्यक आहे.

1) प्रशिक्षण : आपल्या भोवताली घडत असलेल्या सायबर क्राईमचा अभ्यास करून आपल्या संस्थेमधील लोकांना प्रशिक्षण देणे. हल्ली हॅकर शासकीय, बँकेची नावे वापरून इमेल, फोन कॉल करून आपली गोपनीय माहिती जसेकी डेबिट/क्रेडिट कार्ड न्मंबर, ओटीपी, सीव्हीव्ही विचारून फसवंतात.  त्यामुळं आपण , मुख्यतः वृद्ध नागरिकांनी, शक्यतो आपले बँककार्ड, सिमकार्डची माहिती कुणाकडेही सामायिक करू नये.

2) फायरवॉलचा उपयोग-  हि एक सॉफ्टवेअर सेक्युरिटी आहे. जसे एखाद्या कंपनीच्या गेटवर मानवी सेक्युरिटी असते  जे आपल्या परिचीतानाच प्रवेश देते त्याचप्रमाणे आपल्या कम्प्युटरमध्ये आपण फायरवॉल नावाचा सॉफ्टवेअर वापरून अनोळखी, अपरिचित, धोकादायक माहिती थोपवू शकतो.

3) विचारपूर्वक क्लिक करणे-  सर्सगट सर्वच वेबसाईट किंवा मेल हे विश्वासू व्यक्ती वा संस्थेकडून आलेले नसतात. कित्येक मेल हे एव्हडे घातक असतात की ते विश्वासू असे भासवतात आणि आपण निसंकोच सर्व माहिती त्यांना देऊन बसतो. त्यामुळे कुठेही क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

4) सेफ सर्फिंगचा सराव -  काही वेबसाईटवर माहिती शोधताना त्या आपल्याला फोन नंबर, ओटीपी विचारून माहिती काढून घेत असतात.  त्यामुळे योग्य सर्च इंजिन वापरून आपण हे प्रकार टाळू शकता. त्यासाठी तुम्ही मॅकफ्री किंवा साईटअडवायझर सारखे सॉफ्वेअर वापरू शकता.

5) सुरक्षित ऑनलाईन शॉपिंग: हल्ली ऑनलाइन शॉपिंग तसेच त्यासंबंधित फसवणुकीच  प्रमाण  प्रचंड वाढलं आहेत. सर्वच इ-शॉपिंग सुरक्षित नसते. काही साईट आपल्या डेबिट कार्ड तसेच बँकेची माहिती आपल्याकडून काढून घेतात आणि धोका होतो. तेंव्हा खरेदी करत असलेल्या साइटची सेक्युरिटी व प्रायव्हसी पॉलिसी बघूनच शॉपिंग करावी. मॅकफ्री सेक्युर वापरून आपण साईट विश्वासू आहे की नाही हे बघू शकता.

6) सेक्युरिटी सॉफ्टवेअरचा उपयोग : योग्य सेक्युरिटी सॉफ्टवेअरचा उपयोग करून, आणि तो योग्यवेळी न चुकता अपडेट करून आपण हॅकर्सचा हल्ला रोकू शकतो. मॅकफ्री सेक्युरिटी वापरून ते टाळू शकतो.

7) वायरलेसची योग्य सुरक्षा  - वायरलेसमध्ये डाटा एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात जात असताना हॅकर मधेच तो बघू किंवा चोरू शकतात तयामुळे आपण वापरत असलेल्या वाय-फायचा नियमित पासवर्ड बदलणे आवश्यक आहे. तसेच तो इतरांना माहित होऊ नये याची काळजी आवश्यक आहे. शिवाय तो स्ट्रॉंग (थोडा अवघड) ठेवणे आवश्यक आहे. शक्ययतो जन्मदिनाक, घरातील सदस्याचे नाव, कुत्राचे नाव वापरणे टाळावे. आणि पासवर्ड सतत बदलला पाहिजे.

9) योग्यप्रकारे माहिती साठवणे -  आपली महत्वाची माहिती कुणीही बघू शकणार नाही अशा उपकरणात साठवून ठेवावी. शक्यतो त्याचा बॅकउप घेऊन योग्य ठिकाणी सुरक्षित ठेवावा.

माहितीची योग्य सुरक्षा हा एखाद्या संस्थेचा प्रश्न नसून देशाचा प्रश्न असतो. त्यामुळं प्रत्येक शासकीय वा खाजगी संस्थने त्यासंबधित योग्य उपाययोजना जसेकी पासवर्ड, फायरवॉल, डिजिटल सिग्नेचर, अँटीव्हायरस, एसएसएल चा उपयोग करून सेक्युरिटी वाढवने आवश्यक आहे. भारत सरकारने याबाबतीत बरेच नियम आणि कायदे लागू केले आहेत. विधी शिक्षणात सायबर लॉचा समावेश झाला आहे. अशा सायबर गुन्ह्याचा योग्य गतीने तपास करण्यासाठी भारत सरकारने 'आयटि ऍक्ट 2000' तयार केला. तसेच मुख्य शहरात 'सायबर क्राईम' या नवीन पोलीसशाखेची सुरु केली आहे. त्यामुळे आज गरज आहे की देशातील सर्व नागरिकांनी संगणक शिक्षणात मागे न राहता हा बदल स्वीकारून संगणक तसेच सायबर सेक्युरिटीचे धडे गिरवने आवश्यक झाले आहे. कारण ' प्रेव्हेन्शन इज बेटर दयान क्युअर'

  प्रेम जैस्वाल  premshjaiswal@gmail.com